शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी ११ कोटींचा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST

संदीप शिंदे लातूर : जिल्ह्यात सध्या टंचाई नसून, पाणीपुरवठा विभागाकडे एकही गावाने प्रस्ताव दाखल केलेला नाही. संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी ...

संदीप शिंदे

लातूर : जिल्ह्यात सध्या टंचाई नसून, पाणीपुरवठा विभागाकडे एकही गावाने प्रस्ताव दाखल केलेला नाही. संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ११ कोटी ७९ लाख ७० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, मार्च ते जूनपर्यंत विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.

गतवर्षी समाधानकारक पाऊस झालेला असल्याने पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. मार्चमध्ये उन्हाचा पारा वाढल्यानंतर पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ११ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ८५५ गाव, वाडी-तांड्यावर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, खाजगी विहीर, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहीर घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, प्रगतिपथावरील योजना पूर्ण करणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, बुडक्या घेणे आदी कामे केली जाणार आहेत. औसा, निलंगा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, लातूर, चाकूर, उदगीर, जळकोट, अहमदपूर आदी तालुक्यांतील गावांमध्ये ही कामे राबविली जाणार आहेत. प्रारंभी ज्या गावात पाणीटंचाईची समस्या आहे, त्यांना तालुकास्तरावर पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर टंचाई निवारण कक्षाच्या वतीने पडताळणी करून उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टँकरसाठी ७६ लाखांची तरतूद...

जिल्ह्यातील काही गावांत मार्चनंतर पाण्याची समस्या निर्माण होते. त्यासाठी जवळील जलस्रोत अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागविली जाते. कृती आराखड्यानुसार ५० हून अधिक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो, त्यासाठी ७६ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

सध्या एकही प्रस्ताव दाखल नाही...

टंचाई निवारणासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून, पंचायत समिती स्तरावरील प्रस्ताव या कक्षाकडे दाखल केले जातात. सध्या मार्च महिना सुरू झाला असला तरी ८५५ गावस्तरावरून प्रस्ताव दाखल झालेला नाही. प्रस्ताव दाखल होताच तात्काळ पडताळणी करून उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

३२० गावांत नवीन विंधन विहिरीचे नियोजन...

जिल्ह्यात जवळपास ३२० गावांत नवीन विंधन विहीर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी ६६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे केली जाणार आहेत. विंधन विहीर घेतल्यानंतर त्याठिकाणावरून पाइपलाइनद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

नळ योजनेची होणार दुरुस्ती...

कृती आराखड्यानुसार ३० गावांत नळ योजनेची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी २ कोटींहून अधिक निधी खर्च केला जाणार आहे. टंचाई काळात प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन, कामांची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील एकूण गावे - ८५५

बोअरवेलची दुरुस्ती होणार - ५१ गावे

विहिरीमधील गाळ काढणार - ४३ गावे

पाणीटंचाई भेडसावणारी गावे - २५५

नवीन विंधन विहिरीची कामे - ३३५ गावे

पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती - २५ गावे