शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी ११ कोटींचा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST

संदीप शिंदे लातूर : जिल्ह्यात सध्या टंचाई नसून, पाणीपुरवठा विभागाकडे एकही गावाने प्रस्ताव दाखल केलेला नाही. संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी ...

संदीप शिंदे

लातूर : जिल्ह्यात सध्या टंचाई नसून, पाणीपुरवठा विभागाकडे एकही गावाने प्रस्ताव दाखल केलेला नाही. संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ११ कोटी ७९ लाख ७० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, मार्च ते जूनपर्यंत विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.

गतवर्षी समाधानकारक पाऊस झालेला असल्याने पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जलस्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. मार्चमध्ये उन्हाचा पारा वाढल्यानंतर पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ११ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ८५५ गाव, वाडी-तांड्यावर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, खाजगी विहीर, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, नवीन विंधन विहीर घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, प्रगतिपथावरील योजना पूर्ण करणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, बुडक्या घेणे आदी कामे केली जाणार आहेत. औसा, निलंगा, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, लातूर, चाकूर, उदगीर, जळकोट, अहमदपूर आदी तालुक्यांतील गावांमध्ये ही कामे राबविली जाणार आहेत. प्रारंभी ज्या गावात पाणीटंचाईची समस्या आहे, त्यांना तालुकास्तरावर पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर टंचाई निवारण कक्षाच्या वतीने पडताळणी करून उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टँकरसाठी ७६ लाखांची तरतूद...

जिल्ह्यातील काही गावांत मार्चनंतर पाण्याची समस्या निर्माण होते. त्यासाठी जवळील जलस्रोत अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागविली जाते. कृती आराखड्यानुसार ५० हून अधिक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो, त्यासाठी ७६ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

सध्या एकही प्रस्ताव दाखल नाही...

टंचाई निवारणासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून, पंचायत समिती स्तरावरील प्रस्ताव या कक्षाकडे दाखल केले जातात. सध्या मार्च महिना सुरू झाला असला तरी ८५५ गावस्तरावरून प्रस्ताव दाखल झालेला नाही. प्रस्ताव दाखल होताच तात्काळ पडताळणी करून उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

३२० गावांत नवीन विंधन विहिरीचे नियोजन...

जिल्ह्यात जवळपास ३२० गावांत नवीन विंधन विहीर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी ६६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे केली जाणार आहेत. विंधन विहीर घेतल्यानंतर त्याठिकाणावरून पाइपलाइनद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.

नळ योजनेची होणार दुरुस्ती...

कृती आराखड्यानुसार ३० गावांत नळ योजनेची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी २ कोटींहून अधिक निधी खर्च केला जाणार आहे. टंचाई काळात प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन, कामांची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील एकूण गावे - ८५५

बोअरवेलची दुरुस्ती होणार - ५१ गावे

विहिरीमधील गाळ काढणार - ४३ गावे

पाणीटंचाई भेडसावणारी गावे - २५५

नवीन विंधन विहिरीची कामे - ३३५ गावे

पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती - २५ गावे