शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘झेडपी’तील तक्रारींची १५ दिवसांत निर्गत

By admin | Updated: April 20, 2017 01:27 IST

शौमिका महाडिक : सर्व विभागांचा घेतला आढावा; स्वतंत्र तक्रारवहीचे नियोजन

कोल्हापूर : जिल्हा परिषदेबाबतच्या सर्व तक्रारींची १५ दिवसांत निर्गत लावली जाईल. त्यासाठी स्वतंत्र तक्रार वही घालून त्या तक्रारी सोडविण्यासाठी जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सलग चार दिवस महाडिक यांनी सर्वच विभागांच्या आढावा बैठका घेतल्या असून, यामध्ये अतिशय तपशीलवार सादरीकरण पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, बाराही तालुक्यांतून लांबून येणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली गेली पाहिजे. त्यासाठी अधिकारी जागेवर नसतील तर किमान त्या विभागाच्या अन्य कुणीतरी त्यांच्या कामाबाबत चर्चा केली पाहिजे. कुणालाही वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सर्वच विभागांच्या एकूण १२२ योजनांबाबत या बैठकांमध्ये सादरीकरण करण्यात आले. अतिशय मूलभूत असा हा आढावा घेण्यात आला. महत्त्वाची कोणतीही कामे प्रलंबित आहेत ती १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचतो का याचीही खात्री करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाबाबत सातत्याने काही तक्रारी असतात. शासनाचे आदेशही सातत्याने बदलत असतात. यामध्ये अधिकाऱ्यांनाही मर्यादा पडतात. परंतु, स्वतंत्र शिबिरे घेऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. कलाकारांच्या मानधनाचा प्रश्नही निकालात काढण्यात येणार आहे. प्रशासनानेही कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी अपेक्षा आहे. पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायकांच्या नेमणुकाही लवकरच होतील. शुक्रवारी पंचगंगा प्रदूषण आणि जिल्ह्यातील पाणीटंचाईसाठी विशेष बैठक आयोजित केली आहे. सोमवारी आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबावे, अशी येथील प्रथा आहे. ती गांभीर्याने पाळण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. जरी अधिकारी फिरतीला, बैठकीला बाहेर गेले असतील तरी त्या विभागाच्या इतरांनी आपल्या कामासाठी येणाऱ्यांना घालवून देण्यापेक्षा त्यांचे काम काय आहे याची चौकशी करून त्याला माहिती दिली पाहिजे.‘आजच्या निवडी सर्वसंमतीने होतील’आज जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्यांच्या निवडी आहेत. त्यामध्ये सर्वसमावेशक धोरण ठेवल्याने या निवडी सर्वसंमतीने होतील. यात काही फार अडचण येणार नाही, असे शौमिका महाडिक यांनी सांगितले.