शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

जिल्हा परिषदेच्या आठ शाळा धोकादायक

By admin | Updated: July 13, 2016 00:41 IST

विद्यार्थ्यांचे हाल : दिंडनेर्ली, इस्पुर्लीमध्येही पडझड, भिंतींना ओलावा; फरशी पुसून बसविले जाते; प्रशासनाचे दुर्लक्ष

दिंडनेर्ली : मुसळधार पावसामुळे दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणाला तळ्याचे स्वरूप आले असून, दोन दिवसांपासून मैदानावरील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्गच नसल्याने पाणी साचून राहिले आहे. या साचलेल्या पाण्यातच मुले खेळतात. याच शाळेच्या जुन्या इमारतीत अंगणवाडीचे वर्ग भरतात. या वर्गांमध्ये गळती सुरू असून, चिमुरड्यांची बसायची अडचण झाली आहे. शाळेच्या वऱ्हांड्यामधील छपरावरील कौले फुटली असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरले असून, भिंती ओलसर झाल्याने भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस सातत्याने फ रशी पुसून मुलांना बसवित आहेत; पण पावसाचे प्रमाण जादा असल्याने पाणी गळती सुरूच आहे. वेळोवेळी अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायतीला व आपल्या विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असूनही कुणीच इकडे लक्ष देत नसल्याने मुलांना ओलसर फरशीवरतीच बसायची वेळ आली आहे. एका अंगणवाडी इमारतीची कौले मंगळवारीच बदलली आहेत. या ठिकाणच्या मैदानात पाणी साचल्याने दुर्गंधी पसरून शाळेच्या मुलांना साथीच्या आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतीने ताबडतोब पाण्याचा निचरा करावा. तसेच अंगणवाडीच्या मुलांना बसायची सोय करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.दरम्यान, इस्पुर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या आर.सी.सी. इमारतींना गळती लागल्याने विद्यार्थ्यांना बसायची मोठी अडचण झाली आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या षट्कोनी पाच खोल्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून पाणी ठिबकत असून, याच परिस्थितीत मुले बसविली आहेत. मुख्याध्यापकांनी गेल्या दोन वर्षांपासून वेळोवेळी प्रशासनाला कळविले आहे. तसेच यावर्षीही एप्रिलमध्ये कळविले आहे; पण या गळतीकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. कार्यालयात व विजेच्या मीटरवर देखील पाणी ठिबकत आहे. त्यामुळे वर्गांची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे. चालूवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी एक लाख रुपये मंजूर झाल्याचे पत्र शिक्षण खात्याकडून आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले; पण दुरुस्तीला ग्रामशिक्षण समिती व प्रशासनाला मुहूर्त कधी सापडतोय, हेच पाहावे लागणार आहे.करपेवाडी, हालेवाडीतही गळती सुरूच; दुरुस्तीला मुहूर्त नाहीरवींद्र येसादे ल्ल उत्तूरउत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात करपेवाडी, हालेवाडी (ता. आजरा) येथील शाळेच्या इमारती या अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. एखादी मोठी जीवितहानी घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून होत आहे.करपेवाडीत पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून, जुनी इमारत पडत आली आहे. पाच वर्षांपासून इमारतीचे निर्लेखन करून मिळत नाही. इमारतीच्या भिंतीची दगडे पडत आहेत. कैची तुटल्यामुळे छप्पर वाकले आहे. इमारतीत पाणी पडत आहे. शेजारीच असलेली अंगणवाडीची इमारतही धोकादायक बनली असून, मुलांना मंदिरात बसविण्यात येत आहे.