शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जिल्हा परिषदेच्या आठ शाळा धोकादायक

By admin | Updated: July 13, 2016 00:41 IST

विद्यार्थ्यांचे हाल : दिंडनेर्ली, इस्पुर्लीमध्येही पडझड, भिंतींना ओलावा; फरशी पुसून बसविले जाते; प्रशासनाचे दुर्लक्ष

दिंडनेर्ली : मुसळधार पावसामुळे दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणाला तळ्याचे स्वरूप आले असून, दोन दिवसांपासून मैदानावरील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्गच नसल्याने पाणी साचून राहिले आहे. या साचलेल्या पाण्यातच मुले खेळतात. याच शाळेच्या जुन्या इमारतीत अंगणवाडीचे वर्ग भरतात. या वर्गांमध्ये गळती सुरू असून, चिमुरड्यांची बसायची अडचण झाली आहे. शाळेच्या वऱ्हांड्यामधील छपरावरील कौले फुटली असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाचे पाणी भिंतीमध्ये मुरले असून, भिंती ओलसर झाल्याने भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस सातत्याने फ रशी पुसून मुलांना बसवित आहेत; पण पावसाचे प्रमाण जादा असल्याने पाणी गळती सुरूच आहे. वेळोवेळी अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायतीला व आपल्या विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असूनही कुणीच इकडे लक्ष देत नसल्याने मुलांना ओलसर फरशीवरतीच बसायची वेळ आली आहे. एका अंगणवाडी इमारतीची कौले मंगळवारीच बदलली आहेत. या ठिकाणच्या मैदानात पाणी साचल्याने दुर्गंधी पसरून शाळेच्या मुलांना साथीच्या आजाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायतीने ताबडतोब पाण्याचा निचरा करावा. तसेच अंगणवाडीच्या मुलांना बसायची सोय करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.दरम्यान, इस्पुर्ली (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेच्या आर.सी.सी. इमारतींना गळती लागल्याने विद्यार्थ्यांना बसायची मोठी अडचण झाली आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या या षट्कोनी पाच खोल्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून पाणी ठिबकत असून, याच परिस्थितीत मुले बसविली आहेत. मुख्याध्यापकांनी गेल्या दोन वर्षांपासून वेळोवेळी प्रशासनाला कळविले आहे. तसेच यावर्षीही एप्रिलमध्ये कळविले आहे; पण या गळतीकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. कार्यालयात व विजेच्या मीटरवर देखील पाणी ठिबकत आहे. त्यामुळे वर्गांची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे. चालूवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी एक लाख रुपये मंजूर झाल्याचे पत्र शिक्षण खात्याकडून आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले; पण दुरुस्तीला ग्रामशिक्षण समिती व प्रशासनाला मुहूर्त कधी सापडतोय, हेच पाहावे लागणार आहे.करपेवाडी, हालेवाडीतही गळती सुरूच; दुरुस्तीला मुहूर्त नाहीरवींद्र येसादे ल्ल उत्तूरउत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात करपेवाडी, हालेवाडी (ता. आजरा) येथील शाळेच्या इमारती या अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. एखादी मोठी जीवितहानी घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून होत आहे.करपेवाडीत पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून, जुनी इमारत पडत आली आहे. पाच वर्षांपासून इमारतीचे निर्लेखन करून मिळत नाही. इमारतीच्या भिंतीची दगडे पडत आहेत. कैची तुटल्यामुळे छप्पर वाकले आहे. इमारतीत पाणी पडत आहे. शेजारीच असलेली अंगणवाडीची इमारतही धोकादायक बनली असून, मुलांना मंदिरात बसविण्यात येत आहे.