शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कोरोनातही जिल्हा परिषद शाळांचा गुणवत्तेचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:24 IST

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनामुळे शाळा ओस पडल्या. ऑनलाईन शिक्षणाची आपल्याकडे आलेली नवी पद्धत स्वीकारावी लागली. शाळाच बंद ...

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनामुळे शाळा ओस पडल्या. ऑनलाईन शिक्षणाची आपल्याकडे आलेली नवी पद्धत स्वीकारावी लागली. शाळाच बंद राहिल्याने साहजिकच शिक्षकांची ‘चैनी’ आहे असे टोमणेही मारले गेले. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणामध्येही आपले कसब दाखवून दिले. त्यामुळेच जुलै २०२१ मध्ये करण्यात आलेल्या बाह्यमूल्यांकनामध्ये १९० पैकी १६१ शाळांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिष्यवृत्तीमध्ये राज्यात दबदबा निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या १९३५ शाळांनी स्वयंमूल्यांकन केले होते. शाळांनीच आपल्या कामगिरीसाठी गुण देऊन ते जिल्हा परिषदेकडे पाठविले होते. परंतु, केवळ स्वयंमूल्यांकनावर अवलंबून न राहता कोरोना काळात नेमके अध्यापन कसे केले जाते याची खातरजमा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बाह्यमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सहकार्य घेतले. त्यानुसार स्वयंमूल्यांकनामध्ये ‘अ’ दर्जाच्या शाळांचे बाह्यमूल्यांकन करण्यात आले.

कोरोनाच्या काळामध्ये बहुतांशी शाळांमध्ये ऑनलाईन आणि दुर्गम भागामध्ये जेथे मोबाईलला रेंज नाही, तेथे सामाजिक अंतर राखून प्रत्यक्ष अध्यापन करण्यात आले. ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ हे उद्दिष्ट समोर ठेवून दीक्षा ॲपवरून दर आठवड्याला अभ्यासक्रम दिला गेला. दर शनिवारी इयत्तानिहाय विद्यार्थ्यांना प्रश्न दिले जातात. त्यासाठीचा दिलेला प्रतिसादही नोंदविण्यात आला. त्यामुळे अध्यापन, नंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून तो विषय विद्यार्थ्यांना किती समजला याचीही खातरजमा करण्यात आली.

चौकट

२५ पथकांद्वारे मूल्यांकन

हे बाह्यमूल्यांकन करण्यासाठी अन्य तालुक्यातील विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांची २५ पथके तयार करण्यात आली. शाळांच्या ऑनलाईन अध्यापनासह अन्य बाबींचेही मूल्यांकन करण्यात आले.

चौकट

१९० पैकी १६१ शाळांच्या गुणवत्तेत वाढ

जिल्ह्यातील स्वयंमूल्यांकनामध्ये ‘अ’ दर्जा मिळविलेल्या १९० शाळांपैकी १६१ शाळांच्या गुणांमध्ये बाह्यमूल्यांकनामध्ये वाढ झाली. २५ शाळांच्या गुणांमध्ये घट झाली आणि चार शाळांचे गुण स्थिर राहिले. शाळेतील सोयी-सुविधा, अध्यापन, अध्ययन, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशिक्षणे, शालेय नेतृत्व, व्यवस्थापन समिती, लोकसहभाग या माध्यमातून हे शाळासिद्धी बाह्यमूल्यांकन करण्यात आले.

कोट

महाराष्ट्रामध्ये केवळ सातारा जिल्हा परिषदेने अशा प्रकारचे बाह्यमूल्यांकन करून घेतले आहे. याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला, ज्यामध्ये शाळांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

डॉ. आय. सी. शेख

प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर

कोट

कोरोना काळामध्ये शाळा बंद असल्याने प्रत्यक्ष अध्यापनच ठप्प झाले. ऑनलाईन शिक्षणाचे वास्तव कळण्यासाठी बाह्यमूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्ता वाढ करून दाखवली आहे.

संजयसिंह चव्हाण

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर