शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

आंदोलनामुळे जिल्हा परिषद ठप्प

By admin | Updated: August 12, 2016 00:09 IST

औरंगाबाद घटनेचा निषेध : हल्ले रोखण्यासाठी एकजुटीची हाक

कोल्हापूर : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले. या आंदोलनामध्ये सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या. यानिमित्त राजर्षी शाहू सभागृहात घेतलेल्या निषेध सभेत, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत अनेकांनी निषेध नोंदवीत अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे हल्लेखोर सदस्य संभाजी डोणगावकर यांंच्या अटकेची मागणी करण्यात आली.औरंगाबाद जिल्हा परिषदेत सिंचनाच्या कामाच्या वाटपावरून ८ आॅगस्टला सदस्य डोणगावकर यांनी बेदमुथा यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेमध्येही ‘बंद’मुळे गुरुवारी कामकाज ठप्प झाले. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या निषेध सभेत अनेकांनी डोणगावकर यांच्या अटकेची मागणी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख म्हणाले, ‘मी कर्मचाऱ्यांचा सेवक आणि पालक या नात्याने नेहमीच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वयाची बैठक बोलावून विचार करायला हवा. प्रत्येकाने स्वत:बरोबर समोरच्या व्यक्तीशीही आदर, विवेक, सभ्यता आणि न्यायाने वागल्यास अशा घटना टाळता येतील.’उपमुख्य कार्यकारी अधिकारी व राजपत्रित अधिकारी महासंघाचे शाखाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी मारहाणीची घटना लांच्छनास्पद असून, राज्य कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे सांगितले.याप्रसंगी कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य वित्त व लेखाधिकारी बाळासाहेब पाटील, समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंग वसावे, मनीषा गुर्जर, यांच्यासह कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव, लिपिक वर्गीकरण कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय शिंदे, आबासाहेब दिंडे, आदींनीही या घटनेचा निषेध केला. संजय लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. फारुख देसाई, माध्यमिक शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप यांच्यासह सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)सर्व ंविभागांत शुकशुकाटअधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी अचानक काम बंद पुकारल्याने जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प झाले. जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी काम बंद ठेवून संपात सहभागी झाल्याने सर्वच विभागांत शुकशुकाट होता. नागरिकांची गैरसोय‘काम बंद’ पुकारल्याने ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत कामांसाठी आलेल्या अनेकांची गैरसोय झाली. या नागरिकांना काम न होताच रिकाम्या हाताने पुन्हा गावी परतावे लागले.