शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

जिल्ह्यात १७ विंधन विहिरींना मंजुरी जिल्हा परिषद वृत्त : आणखी ९६ विंधन विहिरींचा प्रस्ताव पाठवणार

By admin | Updated: May 10, 2014 00:16 IST

कोल्हापूर : जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यातून केवळ १७ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. एप्रिलनंतरच्या तिसर्‍या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून

 कोल्हापूर : जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यातून केवळ १७ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. एप्रिलनंतरच्या तिसर्‍या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून त्यातून ९६ विंधन विहिरींचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करून सादर केला जातो. साधारणत: जानेवारी महिन्यातच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावे आपला आराखडा सादर करतात. त्याचबरोबर खासगी विहिरींचे अधिग्रहण (ताब्यात घेणे) करणे, ट्रॅक्टर/बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, ‘नपापु’ची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक योजना करणे आदी मागण्याही जिल्ह्यातून येतात. त्यानंतर भूवैज्ञानिक अधिकारी आलेल्या प्रस्तावांच्या ठिकाणी जाऊन सर्व्हेक्षण करतात. जिथे पाणीटंचाई जाणवते, तिथेच विंधन विहिरीसह विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक योजनेला मंजुरी देतात. यंदा जिल्ह्यातून २९३ नवीन विंधन विहिरींसह २ कोटी ९४ लाखांचा पाणीटंचाई आराखडा सादर करण्यात आला होता. त्याचे सर्व्हेक्षण होऊन ८९ विंधन विहिरींचे प्रस्ताव योग्य ठरविण्यात आले तर उर्वरित ११३ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. तेथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात ८९ विंधन विहिरींच्या प्रस्तावांपैकी ३८ प्रस्तावांना प्राधान्यक्रमाने मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले होते. त्यातील १७ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी साडेआठ लाख रुपये मंजूर झाले आहेत. एप्रिल ते जूनअखेर टंचाईचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये ९६ विंधन विहिरींचा प्रस्ताव तयार केला असून मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला जाणार आहे. त्यामध्ये १७ गावे व ७९ वाड्यांचा समावेश आहे.