शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७ विंधन विहिरींना मंजुरी जिल्हा परिषद वृत्त : आणखी ९६ विंधन विहिरींचा प्रस्ताव पाठवणार

By admin | Updated: May 10, 2014 00:16 IST

कोल्हापूर : जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यातून केवळ १७ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. एप्रिलनंतरच्या तिसर्‍या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून

 कोल्हापूर : जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यातून केवळ १७ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. एप्रिलनंतरच्या तिसर्‍या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून त्यातून ९६ विंधन विहिरींचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा तयार करून सादर केला जातो. साधारणत: जानेवारी महिन्यातच संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावे आपला आराखडा सादर करतात. त्याचबरोबर खासगी विहिरींचे अधिग्रहण (ताब्यात घेणे) करणे, ट्रॅक्टर/बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, ‘नपापु’ची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक योजना करणे आदी मागण्याही जिल्ह्यातून येतात. त्यानंतर भूवैज्ञानिक अधिकारी आलेल्या प्रस्तावांच्या ठिकाणी जाऊन सर्व्हेक्षण करतात. जिथे पाणीटंचाई जाणवते, तिथेच विंधन विहिरीसह विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक योजनेला मंजुरी देतात. यंदा जिल्ह्यातून २९३ नवीन विंधन विहिरींसह २ कोटी ९४ लाखांचा पाणीटंचाई आराखडा सादर करण्यात आला होता. त्याचे सर्व्हेक्षण होऊन ८९ विंधन विहिरींचे प्रस्ताव योग्य ठरविण्यात आले तर उर्वरित ११३ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. तेथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात ८९ विंधन विहिरींच्या प्रस्तावांपैकी ३८ प्रस्तावांना प्राधान्यक्रमाने मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले होते. त्यातील १७ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी साडेआठ लाख रुपये मंजूर झाले आहेत. एप्रिल ते जूनअखेर टंचाईचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये ९६ विंधन विहिरींचा प्रस्ताव तयार केला असून मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला जाणार आहे. त्यामध्ये १७ गावे व ७९ वाड्यांचा समावेश आहे.