शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

झिरो बॅलन्सला बँकांकडून ठेंगा

By admin | Updated: March 25, 2016 23:32 IST

खातेदारांची लूट : बचत खात्यात रक्कम नसेल तर सर्व्हिस चार्जेस

प्रकाश पाटील -- कोपार्डे --शहराबरोबरच गावागावांत आर्थिक विकासाची चक्रे गतिमान व्हावीत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाव तिथे बँकेची घोषणा केली होती. प्रत्येक नागरिक बँकेशी जोडला जावा म्हणून राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच नागरी सहकारी बँकांना झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडून देण्याचे धोरण राबविले.बँकांनी प्रत्येक खात्यात ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत किमान शिल्लक असावी, अन्यथा खाते बंद केले जाईल, असे संदेश पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खातेदारांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. देशातील काळा पैसा बाहेर निघावा, विविध योजनेतील अनुदान नागरिकांच्या खात्यावर जमा व्हावे, यातूनच प्रत्येक गाव बँकिंग व्यवहाराने जोडले जावे म्हणून सर्व बँकांनी प्रत्येक नागरिकांचे झिरो बॅलन्सवर खाते उघडावे, असे धोरण जाहीर केले. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे बचत खाते उघडण्यात आले आहे.मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रीयीकृत बँकांसह नागरी सहकारी बँकांतूनही प्रत्येक खातेदाराच्या नावावर किमान ५०० ते १५०० रुपये शिल्लक असायलाच हवेत, अन्यथा असे खाते एक तर बंद केले जाईल अथवा अशा खात्यावर असणाऱ्या शिल्लक रकमेतून सर्व्हिस चार्जेस वसूल केले जाईल, असे संदेश पाठविले जात आहेत. प्रत्यक्षात असे सेवा कर कपात करण्यासही सुरुवात झाली आहे. हे सेवा कर १५ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत आहेत. यामुळे सेवा कराच्या नावाखाली खातेदारांची आर्थिक लूट सुरू असल्याची प्रतिक्रिया मिळत आहेत. ग्रामीण भागात दारिद्र्यरेषे-खालील भूमिहीन शेतमजुरांनी शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बँक खाती उघडली आहेत. दररोजचा रोजगारच एवढा तुटपुंजा आहे की, किमान बँक बॅलन्सची रक्कम भरणे या कुटुंबांसाठी अग्निदिव्यच आहे. त्यामुळे त्यांची बँक खाती बंद होण्याची शक्यता असून, अनुदानाचा लाभ कसा घ्यावयाचा, असे प्रश्नचिन्ह या कुटुंबांसमोर आहे. पैसे अडकून पडणारत्यातच अन्नसुरक्षा योजनेचे अनुदान घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे खाते उघडावे लागत आहे. जर चार माणसांचे कुटुंब असेल, तर किमान दोन हजार रुपये केवळ बचत खात्यात या पोटावर हात असणाऱ्या लोकांचे अडकून पडणार आहेत. किमान बॅलन्सची अट रद्द करून पूर्वीप्रमाणे झिरो बॅलन्सवर बँकिंग व्यवहार सुरू राहावेत, तसेच बँका खात्यावर रक्कम ठेवण्याची मनमानी करीत असतील तर त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.