शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
2
झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
3
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
4
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
5
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
6
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
7
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
8
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
9
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
10
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
11
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
12
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
13
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
14
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
15
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
16
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
17
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
18
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
20
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

झिरो बॅलन्सला बँकांकडून ठेंगा

By admin | Updated: March 25, 2016 23:32 IST

खातेदारांची लूट : बचत खात्यात रक्कम नसेल तर सर्व्हिस चार्जेस

प्रकाश पाटील -- कोपार्डे --शहराबरोबरच गावागावांत आर्थिक विकासाची चक्रे गतिमान व्हावीत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाव तिथे बँकेची घोषणा केली होती. प्रत्येक नागरिक बँकेशी जोडला जावा म्हणून राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच नागरी सहकारी बँकांना झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडून देण्याचे धोरण राबविले.बँकांनी प्रत्येक खात्यात ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत किमान शिल्लक असावी, अन्यथा खाते बंद केले जाईल, असे संदेश पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खातेदारांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. देशातील काळा पैसा बाहेर निघावा, विविध योजनेतील अनुदान नागरिकांच्या खात्यावर जमा व्हावे, यातूनच प्रत्येक गाव बँकिंग व्यवहाराने जोडले जावे म्हणून सर्व बँकांनी प्रत्येक नागरिकांचे झिरो बॅलन्सवर खाते उघडावे, असे धोरण जाहीर केले. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे बचत खाते उघडण्यात आले आहे.मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रीयीकृत बँकांसह नागरी सहकारी बँकांतूनही प्रत्येक खातेदाराच्या नावावर किमान ५०० ते १५०० रुपये शिल्लक असायलाच हवेत, अन्यथा असे खाते एक तर बंद केले जाईल अथवा अशा खात्यावर असणाऱ्या शिल्लक रकमेतून सर्व्हिस चार्जेस वसूल केले जाईल, असे संदेश पाठविले जात आहेत. प्रत्यक्षात असे सेवा कर कपात करण्यासही सुरुवात झाली आहे. हे सेवा कर १५ रुपयांपासून ७० रुपयांपर्यंत आहेत. यामुळे सेवा कराच्या नावाखाली खातेदारांची आर्थिक लूट सुरू असल्याची प्रतिक्रिया मिळत आहेत. ग्रामीण भागात दारिद्र्यरेषे-खालील भूमिहीन शेतमजुरांनी शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बँक खाती उघडली आहेत. दररोजचा रोजगारच एवढा तुटपुंजा आहे की, किमान बँक बॅलन्सची रक्कम भरणे या कुटुंबांसाठी अग्निदिव्यच आहे. त्यामुळे त्यांची बँक खाती बंद होण्याची शक्यता असून, अनुदानाचा लाभ कसा घ्यावयाचा, असे प्रश्नचिन्ह या कुटुंबांसमोर आहे. पैसे अडकून पडणारत्यातच अन्नसुरक्षा योजनेचे अनुदान घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे खाते उघडावे लागत आहे. जर चार माणसांचे कुटुंब असेल, तर किमान दोन हजार रुपये केवळ बचत खात्यात या पोटावर हात असणाऱ्या लोकांचे अडकून पडणार आहेत. किमान बॅलन्सची अट रद्द करून पूर्वीप्रमाणे झिरो बॅलन्सवर बँकिंग व्यवहार सुरू राहावेत, तसेच बँका खात्यावर रक्कम ठेवण्याची मनमानी करीत असतील तर त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.