शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

लोकशाहीसाठी युवकांनी संघर्ष कायम ठेवावा

By admin | Updated: February 28, 2016 00:37 IST

विश्वजित कुमार : ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ परिषद

कोल्हापूर : देशात मागासांना मिळणारे आरक्षण हटविण्याची भाषा सरकारकडून सुरू आहे; त्यामुळे संविधान व मूलभूत अधिकार अडचणीत येत आहेत. सद्य:परिस्थितीत निर्माण झालेल्या झुंडशाहीतून लोकशाही वाचविण्यासाठी युवकांकडे मोठी जबाबदारी आली आहे. यासाठी मशालींनी मशाली पेटवून युवकांनी संघर्ष तेवत ठेवावा, असे आवाहन ‘एआयएसएफ’चे राष्ट्रीय सचिव विश्वजित कुमार यांनी व्यक्त केले. आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, विद्रोही संघटना, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन आॅफ इंडिया, आॅल इंडिया यूथ फेडरेशन, युनायटेड बी स्टँड, पुरोगामी युवक व विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे शनिवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ ही परिषद झाली. यात प्रमुख पाहुणे म्हणून कुमार बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या मुक्ता मनोहर होत्या. विश्वजित कुमार म्हणाले, गोविंद पानसरे, दाभोलकर व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. याच्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाप्रमाणेच दिल्लीतील संघर्षही तितकाच महत्त्वाचा आहे. संविधानाची शपथ घेऊन आलेले हे सरकार सध्या जातिपातीचे राजकारण करीत आहे. ‘जेएनयू’च्या प्रतिष्ठेला बाधा आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात उठलेल्या संघर्षाचा आवाज तीव्र होत आहे. ज्येष्ठ नेत्या मुक्ता मनोहर म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण २६ टक्क्यांनी वाढले असतानाही सरकारच्या आदेशावरून राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्योगपतींची कर्जे माफ केली आहेत. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारही केलेला नाही. सरकारच्या या प्रवृत्तीविरोधात लोकशाही मार्गाने लढण्याची गरज आहे. यावेळी पंकज चव्हाण, गिरीश फोंडे यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी अनिल चव्हाण, बाबासाहेब देवकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)