शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीसाठी युवकांनी संघर्ष कायम ठेवावा

By admin | Updated: February 28, 2016 00:37 IST

विश्वजित कुमार : ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ परिषद

कोल्हापूर : देशात मागासांना मिळणारे आरक्षण हटविण्याची भाषा सरकारकडून सुरू आहे; त्यामुळे संविधान व मूलभूत अधिकार अडचणीत येत आहेत. सद्य:परिस्थितीत निर्माण झालेल्या झुंडशाहीतून लोकशाही वाचविण्यासाठी युवकांकडे मोठी जबाबदारी आली आहे. यासाठी मशालींनी मशाली पेटवून युवकांनी संघर्ष तेवत ठेवावा, असे आवाहन ‘एआयएसएफ’चे राष्ट्रीय सचिव विश्वजित कुमार यांनी व्यक्त केले. आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, विद्रोही संघटना, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन आॅफ इंडिया, आॅल इंडिया यूथ फेडरेशन, युनायटेड बी स्टँड, पुरोगामी युवक व विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे शनिवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ ही परिषद झाली. यात प्रमुख पाहुणे म्हणून कुमार बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या मुक्ता मनोहर होत्या. विश्वजित कुमार म्हणाले, गोविंद पानसरे, दाभोलकर व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. याच्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाप्रमाणेच दिल्लीतील संघर्षही तितकाच महत्त्वाचा आहे. संविधानाची शपथ घेऊन आलेले हे सरकार सध्या जातिपातीचे राजकारण करीत आहे. ‘जेएनयू’च्या प्रतिष्ठेला बाधा आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात उठलेल्या संघर्षाचा आवाज तीव्र होत आहे. ज्येष्ठ नेत्या मुक्ता मनोहर म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण २६ टक्क्यांनी वाढले असतानाही सरकारच्या आदेशावरून राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्योगपतींची कर्जे माफ केली आहेत. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारही केलेला नाही. सरकारच्या या प्रवृत्तीविरोधात लोकशाही मार्गाने लढण्याची गरज आहे. यावेळी पंकज चव्हाण, गिरीश फोंडे यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी अनिल चव्हाण, बाबासाहेब देवकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)