शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

भ्रष्टाचाराच्या निपटाऱ्यासाठी तरुणांनी पुढे यावे

By admin | Updated: October 6, 2015 00:28 IST

तौसिफ मडिकेरी : विद्यापीठातील नेहरू अभ्यास केंद्राचा राष्ट्रीय परिसंवाद

कोल्हापूर : दहशतवादाचा मुद्दासुद्धा धर्माशी कमी आणि आर्थिक बाबींशी अधिक निगडित आहे. व्यवस्थांमधील भ्रष्टाचार हा सुद्धा अशा गोष्टींना खतपाणी घालणारा ठरतो. त्याचा निपटारा करण्यासाठी तरुणांनीच पुढे यायला हवे, असे आवाहन विचारवंत तौसिफ मडिकेरी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे आयोजित ‘मॉडर्न इंडियन आयडिया आॅफ स्टेट अँड पॉलिटिक्स’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.मडिकेरी म्हणाले, धार्मिक सहिष्णुता व सामाजिक सलोखा ही भारतीय समाजाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. तथापि, ब्रिटिशांनी भारतीय वसाहतीचा विस्तार करून तिला स्थैर्य प्राप्तीसाठी ‘फोडा व राज्य करा’ या नीतीचा अवलंब केला. त्याला पूरक अशी शिक्षणपद्धती येथे रूजवली आणि ब्रिटिश वसाहतवादी नीतीला पूरक असा इतिहास निर्माण केला. त्या इतिहासाचा राजकारणासाठी जाणीवपूर्वक वापर केला जातो आहे. इतिहास हा भावनाप्रधानतेची बाब नसून सातत्यपूर्ण संशोधनाची गोष्ट आहे. संवाद, चर्चा आणि संशोधन यांच्या बळावरच भारतीय इतिहासाची पुनर्मांडणी करणे शक्य आहे. जातीयवाद, भांडवलशाही ही भारतीय समाजासमोरील आजघडीची सर्वांत महत्त्वाची दोन आव्हाने आहेत. भारताच्या तथाकथित प्रगतीचे, वृद्धीचे लाभ तळागाळांतील वंचित, शोषित, अल्पसंख्याक, शेतकरी-कष्टकरी समाजापर्यंत पोहोचत नाहीत. त्याचा फायदा भांडवलदारांना होतो. डॉ. शिंदे म्हणाले, प्राचीन भारताच्या इतिहासाच्या बहुसांस्कृतिकतेचा, त्यातील सहिष्णुतेच्या बीजांचा अभ्यास करायला हवा. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याची आपली संस्कृती आहे. ती पुढे न्यायला हवी. कार्यक्रमास राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील, डॉ. प्रकाश पवार, भगवान माने, केतन गोवेकर उपस्थित होते. नेहरू अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. वासंती रासम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)साखरेच्या बाहुल्यांची गरजमातीची बाहुली पाण्यात ठेवली, तर ती पाणी गढूळ करते. कापसाची बाहुली सारे पाणी शोषून घेते. साखरेची बाहुली सारे पाणी गोड बनविते. या पहिल्या दोन बाहुल्या अनुक्रमे जातीयवाद व भांडवलशाहीचे प्रतीक आहेत, ज्यांच्यामुळे समाजमन कलुषित, समाजाचे शोषण होते. भारतीय समाजाला साखरेच्या बाहुलीसारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत मडिकेरी यांनी व्यक्त केले.