शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

भ्रष्टाचाराच्या निपटाऱ्यासाठी तरुणांनी पुढे यावे

By admin | Updated: October 6, 2015 00:28 IST

तौसिफ मडिकेरी : विद्यापीठातील नेहरू अभ्यास केंद्राचा राष्ट्रीय परिसंवाद

कोल्हापूर : दहशतवादाचा मुद्दासुद्धा धर्माशी कमी आणि आर्थिक बाबींशी अधिक निगडित आहे. व्यवस्थांमधील भ्रष्टाचार हा सुद्धा अशा गोष्टींना खतपाणी घालणारा ठरतो. त्याचा निपटारा करण्यासाठी तरुणांनीच पुढे यायला हवे, असे आवाहन विचारवंत तौसिफ मडिकेरी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे आयोजित ‘मॉडर्न इंडियन आयडिया आॅफ स्टेट अँड पॉलिटिक्स’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.मडिकेरी म्हणाले, धार्मिक सहिष्णुता व सामाजिक सलोखा ही भारतीय समाजाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. तथापि, ब्रिटिशांनी भारतीय वसाहतीचा विस्तार करून तिला स्थैर्य प्राप्तीसाठी ‘फोडा व राज्य करा’ या नीतीचा अवलंब केला. त्याला पूरक अशी शिक्षणपद्धती येथे रूजवली आणि ब्रिटिश वसाहतवादी नीतीला पूरक असा इतिहास निर्माण केला. त्या इतिहासाचा राजकारणासाठी जाणीवपूर्वक वापर केला जातो आहे. इतिहास हा भावनाप्रधानतेची बाब नसून सातत्यपूर्ण संशोधनाची गोष्ट आहे. संवाद, चर्चा आणि संशोधन यांच्या बळावरच भारतीय इतिहासाची पुनर्मांडणी करणे शक्य आहे. जातीयवाद, भांडवलशाही ही भारतीय समाजासमोरील आजघडीची सर्वांत महत्त्वाची दोन आव्हाने आहेत. भारताच्या तथाकथित प्रगतीचे, वृद्धीचे लाभ तळागाळांतील वंचित, शोषित, अल्पसंख्याक, शेतकरी-कष्टकरी समाजापर्यंत पोहोचत नाहीत. त्याचा फायदा भांडवलदारांना होतो. डॉ. शिंदे म्हणाले, प्राचीन भारताच्या इतिहासाच्या बहुसांस्कृतिकतेचा, त्यातील सहिष्णुतेच्या बीजांचा अभ्यास करायला हवा. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याची आपली संस्कृती आहे. ती पुढे न्यायला हवी. कार्यक्रमास राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारती पाटील, डॉ. प्रकाश पवार, भगवान माने, केतन गोवेकर उपस्थित होते. नेहरू अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. वासंती रासम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)साखरेच्या बाहुल्यांची गरजमातीची बाहुली पाण्यात ठेवली, तर ती पाणी गढूळ करते. कापसाची बाहुली सारे पाणी शोषून घेते. साखरेची बाहुली सारे पाणी गोड बनविते. या पहिल्या दोन बाहुल्या अनुक्रमे जातीयवाद व भांडवलशाहीचे प्रतीक आहेत, ज्यांच्यामुळे समाजमन कलुषित, समाजाचे शोषण होते. भारतीय समाजाला साखरेच्या बाहुलीसारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत मडिकेरी यांनी व्यक्त केले.