शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

युथ आयकॉन - भावेश पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST

आपण ज्या वातावरणात वाढतो, जगतो, त्याचे संस्कार आपल्याला आयुष्यभर सावलीसारखी साथ करत असतात. गुजरात कच्छसारख्या प्रदेशातून आलेला कच्छ कडवा ...

आपण ज्या वातावरणात वाढतो, जगतो, त्याचे संस्कार आपल्याला आयुष्यभर सावलीसारखी साथ करत असतात. गुजरात कच्छसारख्या प्रदेशातून आलेला कच्छ कडवा पाटीदार समाज म्हणजे बालपणापासूनच उद्योजकतेचे बाळकडू आणि मुळं रुजलेला समाज. आयुष्यभर दुसऱ्याची नोकरी करून त्यांना मोठं करण्यापेक्षा स्वत: व्यवसायाचे मालक बना.. या संस्कारातच त्यांची जडणघडण झाली. कोल्हापुरातील सॉ मिल इंडस्ट्रीजचे पायोनिअर असलेल्या वाडवडिलांनी लावलेल्या कोल्हापूर सॉ मिल या रोपट्याला आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान, गुणवत्ता, ग्राहकाची गरज ओळखून बदलांचा स्वीकार यांचे खतपाणी घालून भावेश पटेल यांनी त्याचा वटवृक्ष केला. कृषी पंप, ऑटोमोबाईल, फौंड्रीतील स्पेअर पार्टस्, मोठ्या मशिनरी, कंपोनंटस, फॅब्रिकेशन, टेक्सटाईल, फूड इंडस्ट्री, मेडिकल अशा ग्राहकांच्या मोठ्या मशिनरी, वस्तूंचे पॅकिंग करून ते सुस्थितीत देश-परदेशात पोहोचविले जाते. या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने व्यवसाय विस्तार करणाऱ्या उद्योजकांत पश्चिम महाराष्ट्रात भावेश पटेल यांचे नाव अग्रस्थानी आहे.

उद्योगधंद्यासाठी कच्छमधून १९५२ ला कोल्हापुरात व्यवसायासाठी आलेले नावजीभाई पटेल यांनी व्यवसायात श्रीगणेशा केला. पुढे सॉ मिल सुरू केली. लाकडापासून साहित्य बनवून त्याचा व्यापार, कौलं, रूफिंग, शहाबादी, काडाप्पा फरशी असा प्रवास केल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिभाई पटेल यांनी १९७३ ला कोल्हापूर सॉ मिलची स्थापना केली. त्याचा विस्तार १९७८ मध्ये शिरोली एमआयडीसीमध्ये कोल्हापूर वूडन पॅकिंग सॉ मिल आणि १९८२ ला गोकुळ शिरगावमध्ये कोल्हापूर टिंबर अँड फर्निचर अशा तीन युनिटमध्ये झाला. वडील हरिभाई यांनी ठेवलेली ही उद्योगाची चढती कमान पाहत मोठे झालेल्या भावेश यांनी प्रायव्हेट हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल आणि पुढे नागपूरला लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी टेक असा शैक्षणिक प्रवास केआयटीमधील एमबीएने पूर्ण केला. एकत्र कुटुंबातील ते सर्वांत मोठे बंधू असल्याने सॉ मिलची जबाबदारी आली आणि २००७ मध्ये त्यांचा उद्योजक म्हणून प्रवास सुुरू झाला.

आपल्या आधुनिक ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी व्यवसायात बदल घडवायला सुरुवात केली, कामाचे ऑटोमेशन झाले, अकौंटिंगचे संगणकीकरण, ऑनलाईन व्यवहार सुरू झाल्याने अर्थकारणाचा ताळमेळ बसला. किमतीचे मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग झाले. पूर्वी इंडस्ट्रीअल पॅकिंगसाठी आधी कंपन्यांना साहित्य मुंबई-पुण्याला पाठवावे लागायचे. तेथून पुन्हा कोल्हापुरात आणून ग्राहकाला पाठवायचे, असा दुहेरी प्रवास आणि खर्चही व्हायचा. ही अडचण ओळखून भावेश यांनी उत्पादन तयार होते त्याचठिकाणी (सर्व्हिस ऑन प्लान्ट) माणसं पाठवून पॅकेजिंग सुरू केले. त्यामुळे कंपन्यांचा त्रास वाचला. उद्योगाला नवे पंख देत सांगलीला नवीन पद्धतीने बॉक्स बनविण्याचे युनिट उभारले.

प्रवासात मशिनरी-पार्टस् गंजू नये यासाठी आवरणं घातली जातात. वाहतूक करणे सोपे व्हावे यासाठी बेल्टस, पॅलेट लावले जातात. लाकडाला वाळवी, कीड लागू नये यासाठी त्यावर हीट ट्रिटमेंट केली जाते. महाराष्ट्रात मुंबईनंतर केवळ कोल्हापूर सॉ मिलकडे या प्रक्रियेचे हे आयएन४३ कोडचे लायसन्स आहे. ज्याचे मॉनिटरिंग कृषी मंत्रालयाकडून केले जाते. एका युनिटमधून किमान ५० ग्राहकांना सर्व्हिस दिली जाते, इतका त्याचा विस्तार झाला आहे.

----

भावेश पटेल यांच्या या उद्योगाची उलाढाल आता वार्षिक १५ कोटींंच्यावर असून, नऊजणांचा कुशल कर्मचारी वर्ग आहे. त्यांच्या प्लान्टला ग्रीन इनिशिएटिव्ह पुरस्कार मिळाला आहे. ते स्वत: फाईव्ह स्टार एमआयडीसी असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ कागल अशा संस्थांवर कार्यरत आहेत. तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतात. उद्योगात रोज येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बाजारपेठेची गरज ओळखा, व्यवसायातील आधुनिक बदलांचा अभ्यास करा, खाचखळग्यांतून गाठीशी येणारे अनुभव आपले गुरू असतात, त्यांचा सकारात्मक आणि कृतिशील स्वीकार करा, असे ते सांगतात.