शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

युथ आयकॉन - भावेश पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST

आपण ज्या वातावरणात वाढतो, जगतो, त्याचे संस्कार आपल्याला आयुष्यभर सावलीसारखी साथ करत असतात. गुजरात कच्छसारख्या प्रदेशातून आलेला कच्छ कडवा ...

आपण ज्या वातावरणात वाढतो, जगतो, त्याचे संस्कार आपल्याला आयुष्यभर सावलीसारखी साथ करत असतात. गुजरात कच्छसारख्या प्रदेशातून आलेला कच्छ कडवा पाटीदार समाज म्हणजे बालपणापासूनच उद्योजकतेचे बाळकडू आणि मुळं रुजलेला समाज. आयुष्यभर दुसऱ्याची नोकरी करून त्यांना मोठं करण्यापेक्षा स्वत: व्यवसायाचे मालक बना.. या संस्कारातच त्यांची जडणघडण झाली. कोल्हापुरातील सॉ मिल इंडस्ट्रीजचे पायोनिअर असलेल्या वाडवडिलांनी लावलेल्या कोल्हापूर सॉ मिल या रोपट्याला आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान, गुणवत्ता, ग्राहकाची गरज ओळखून बदलांचा स्वीकार यांचे खतपाणी घालून भावेश पटेल यांनी त्याचा वटवृक्ष केला. कृषी पंप, ऑटोमोबाईल, फौंड्रीतील स्पेअर पार्टस्, मोठ्या मशिनरी, कंपोनंटस, फॅब्रिकेशन, टेक्सटाईल, फूड इंडस्ट्री, मेडिकल अशा ग्राहकांच्या मोठ्या मशिनरी, वस्तूंचे पॅकिंग करून ते सुस्थितीत देश-परदेशात पोहोचविले जाते. या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने व्यवसाय विस्तार करणाऱ्या उद्योजकांत पश्चिम महाराष्ट्रात भावेश पटेल यांचे नाव अग्रस्थानी आहे.

उद्योगधंद्यासाठी कच्छमधून १९५२ ला कोल्हापुरात व्यवसायासाठी आलेले नावजीभाई पटेल यांनी व्यवसायात श्रीगणेशा केला. पुढे सॉ मिल सुरू केली. लाकडापासून साहित्य बनवून त्याचा व्यापार, कौलं, रूफिंग, शहाबादी, काडाप्पा फरशी असा प्रवास केल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिभाई पटेल यांनी १९७३ ला कोल्हापूर सॉ मिलची स्थापना केली. त्याचा विस्तार १९७८ मध्ये शिरोली एमआयडीसीमध्ये कोल्हापूर वूडन पॅकिंग सॉ मिल आणि १९८२ ला गोकुळ शिरगावमध्ये कोल्हापूर टिंबर अँड फर्निचर अशा तीन युनिटमध्ये झाला. वडील हरिभाई यांनी ठेवलेली ही उद्योगाची चढती कमान पाहत मोठे झालेल्या भावेश यांनी प्रायव्हेट हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल आणि पुढे नागपूरला लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी टेक असा शैक्षणिक प्रवास केआयटीमधील एमबीएने पूर्ण केला. एकत्र कुटुंबातील ते सर्वांत मोठे बंधू असल्याने सॉ मिलची जबाबदारी आली आणि २००७ मध्ये त्यांचा उद्योजक म्हणून प्रवास सुुरू झाला.

आपल्या आधुनिक ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी व्यवसायात बदल घडवायला सुरुवात केली, कामाचे ऑटोमेशन झाले, अकौंटिंगचे संगणकीकरण, ऑनलाईन व्यवहार सुरू झाल्याने अर्थकारणाचा ताळमेळ बसला. किमतीचे मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग झाले. पूर्वी इंडस्ट्रीअल पॅकिंगसाठी आधी कंपन्यांना साहित्य मुंबई-पुण्याला पाठवावे लागायचे. तेथून पुन्हा कोल्हापुरात आणून ग्राहकाला पाठवायचे, असा दुहेरी प्रवास आणि खर्चही व्हायचा. ही अडचण ओळखून भावेश यांनी उत्पादन तयार होते त्याचठिकाणी (सर्व्हिस ऑन प्लान्ट) माणसं पाठवून पॅकेजिंग सुरू केले. त्यामुळे कंपन्यांचा त्रास वाचला. उद्योगाला नवे पंख देत सांगलीला नवीन पद्धतीने बॉक्स बनविण्याचे युनिट उभारले.

प्रवासात मशिनरी-पार्टस् गंजू नये यासाठी आवरणं घातली जातात. वाहतूक करणे सोपे व्हावे यासाठी बेल्टस, पॅलेट लावले जातात. लाकडाला वाळवी, कीड लागू नये यासाठी त्यावर हीट ट्रिटमेंट केली जाते. महाराष्ट्रात मुंबईनंतर केवळ कोल्हापूर सॉ मिलकडे या प्रक्रियेचे हे आयएन४३ कोडचे लायसन्स आहे. ज्याचे मॉनिटरिंग कृषी मंत्रालयाकडून केले जाते. एका युनिटमधून किमान ५० ग्राहकांना सर्व्हिस दिली जाते, इतका त्याचा विस्तार झाला आहे.

----

भावेश पटेल यांच्या या उद्योगाची उलाढाल आता वार्षिक १५ कोटींंच्यावर असून, नऊजणांचा कुशल कर्मचारी वर्ग आहे. त्यांच्या प्लान्टला ग्रीन इनिशिएटिव्ह पुरस्कार मिळाला आहे. ते स्वत: फाईव्ह स्टार एमआयडीसी असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ कागल अशा संस्थांवर कार्यरत आहेत. तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतात. उद्योगात रोज येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बाजारपेठेची गरज ओळखा, व्यवसायातील आधुनिक बदलांचा अभ्यास करा, खाचखळग्यांतून गाठीशी येणारे अनुभव आपले गुरू असतात, त्यांचा सकारात्मक आणि कृतिशील स्वीकार करा, असे ते सांगतात.