शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

तरुणपणीच वृद्धापकाळाचे आर्थिक नियोजन करावे

By admin | Updated: December 31, 2014 23:55 IST

मानसिंग जगताप : ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, विविध विषयांवर चर्चासत्र

कोल्हापूर : घरी पाहुणे येणार म्हटल्यावर आपण जुने पेपर अडगळीत ठेवतो, त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची स्थिती झाली आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकच स्वत: दोषी आहेत. आपण तरुणपणातच वृद्धापकाळाचे आर्थिक नियोजन केले पाहिजे, असा सूर आज, बुधवारी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यशाळेतून उमटला. सायबर येथे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन ‘सायबर’चे सल्लागार चेअरमन डॉ. व्ही. एम. हिलगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. मानसिंग जगताप उपस्थित होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘ज्येष्ठ नागरिक धोरण’ या विषयावर बोलताना डॉ. व्ही. एम. हिलगे म्हणाले, सध्या महाराष्ट्र शासनाने १४ जून २००४ पासून ज्येष्ठ नागरिकांविषयीचे धोरण जाहीर केल्यानुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक समजले जाते; तर केंद्र शासनामार्फत ६० वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ समजल्या जातात. त्यामुळे आपल्याच देशात ही मोठी तफावत आहे. ‘इच्छामरण’ या विषयावर बोलताना नीळकंठ कोडोलीकर म्हणाले, इच्छामरणबाबत अजूनही आपल्याकडे वाद चालू आहे. शासनाने याबाबत ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करून हा कायद्याबाबत विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात ‘ज्येष्ठ नागरिक - एन. एस. एस. समन्वय-सहयोग’ या विषयावर प्राचार्य व्ही. डी. माने म्हणाले, एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांमार्फत ग्रामसफाई, सांस्कृतिक कार्यक्रम , उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्या सोडविण्यासाठी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. ‘वैद्यकशास्त्राचा इतिहास’ या विषयावर बोलताना डॉ. मंदार बेडेकर म्हणाले, मानवाचे आरोग्य निसर्ग आणि आहार या गोष्टींवर अवंलबून असते. यामुळे या गोष्टी जपणे गरजेचे आहे. यासाठी सकस आहार व आहाराचे नियोजन करावे. ‘ज्येष्ठ नागरिक सेवा संघ : संघटन व व्यवस्थापन’ या विषयावर अशोकराव केसरकर म्हणाले, दोन भिन्न स्वभावांच्या व्यक्ती एकत्र आल्यानंतरच संसार चांगला होतो. जर एकसारख्या स्वभावाचे लोक एकत्र आले तर त्यांच्यामध्ये भांडणे होतात आणि जर दोन मूर्ख स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आल्या तर त्यांच्या संसाराची वाट लागते. त्याचप्रमाणे सर्वसमावेशक व्यक्ती एकत्र आल्यानंतरच संघ किंवा संघटना व्यवस्थितरीत्या चालते. समारोपप्रसंगी डॉ. मानसिंग जगताप म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम ज्येष्ठ नागरिक एकत्र आले पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठी विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रम सुरू करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कार्यशाळेत २०० ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. दीपक भोसले, श्रीनिवास कुरणे, पी. टी. पाटील, विलास पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी )