शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

तरुणपणीच वृद्धापकाळाचे आर्थिक नियोजन करावे

By admin | Updated: December 31, 2014 23:55 IST

मानसिंग जगताप : ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, विविध विषयांवर चर्चासत्र

कोल्हापूर : घरी पाहुणे येणार म्हटल्यावर आपण जुने पेपर अडगळीत ठेवतो, त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची स्थिती झाली आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकच स्वत: दोषी आहेत. आपण तरुणपणातच वृद्धापकाळाचे आर्थिक नियोजन केले पाहिजे, असा सूर आज, बुधवारी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यशाळेतून उमटला. सायबर येथे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन ‘सायबर’चे सल्लागार चेअरमन डॉ. व्ही. एम. हिलगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. मानसिंग जगताप उपस्थित होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘ज्येष्ठ नागरिक धोरण’ या विषयावर बोलताना डॉ. व्ही. एम. हिलगे म्हणाले, सध्या महाराष्ट्र शासनाने १४ जून २००४ पासून ज्येष्ठ नागरिकांविषयीचे धोरण जाहीर केल्यानुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक समजले जाते; तर केंद्र शासनामार्फत ६० वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ समजल्या जातात. त्यामुळे आपल्याच देशात ही मोठी तफावत आहे. ‘इच्छामरण’ या विषयावर बोलताना नीळकंठ कोडोलीकर म्हणाले, इच्छामरणबाबत अजूनही आपल्याकडे वाद चालू आहे. शासनाने याबाबत ज्येष्ठ नागरिक यांच्याशी चर्चा करून हा कायद्याबाबत विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात ‘ज्येष्ठ नागरिक - एन. एस. एस. समन्वय-सहयोग’ या विषयावर प्राचार्य व्ही. डी. माने म्हणाले, एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांमार्फत ग्रामसफाई, सांस्कृतिक कार्यक्रम , उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्या सोडविण्यासाठी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. ‘वैद्यकशास्त्राचा इतिहास’ या विषयावर बोलताना डॉ. मंदार बेडेकर म्हणाले, मानवाचे आरोग्य निसर्ग आणि आहार या गोष्टींवर अवंलबून असते. यामुळे या गोष्टी जपणे गरजेचे आहे. यासाठी सकस आहार व आहाराचे नियोजन करावे. ‘ज्येष्ठ नागरिक सेवा संघ : संघटन व व्यवस्थापन’ या विषयावर अशोकराव केसरकर म्हणाले, दोन भिन्न स्वभावांच्या व्यक्ती एकत्र आल्यानंतरच संसार चांगला होतो. जर एकसारख्या स्वभावाचे लोक एकत्र आले तर त्यांच्यामध्ये भांडणे होतात आणि जर दोन मूर्ख स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आल्या तर त्यांच्या संसाराची वाट लागते. त्याचप्रमाणे सर्वसमावेशक व्यक्ती एकत्र आल्यानंतरच संघ किंवा संघटना व्यवस्थितरीत्या चालते. समारोपप्रसंगी डॉ. मानसिंग जगताप म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम ज्येष्ठ नागरिक एकत्र आले पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठी विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रम सुरू करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कार्यशाळेत २०० ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. दीपक भोसले, श्रीनिवास कुरणे, पी. टी. पाटील, विलास पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी )