शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

कौशल्य विकासास तरूणांनी प्राधान्य द्यावे

By admin | Updated: April 27, 2015 00:15 IST

नरेंद्र जाधव : जयसिंगपुरात श्री रवळनाथ संस्थेच्या शाखेचे उद्घाटन

जयसिंगपूर : कायदा व अर्थशास्त्र या दोन गोष्टींचे ज्ञान मनुष्यास असणे गरजेचे आहे. देशाच्या विकासात आर्थिक बलस्थान महत्त्वाचे असून, शिक्षण व कौशल्य विकासास आजच्या तरुण युवा पिढीने प्राधान्य देणे गरजेचे आहे. शासनानेही नवनवे उपक्रम राबवून त्यादृष्टीने योग्य पावले उचलली तरच भारत महासत्ता बनेल, यासाठी इच्छाशक्तीची खरी गरज आहे, असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी मांडले. श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटी आजरा (मल्टी-स्टेट) या संस्थेच्या जयसिंगपूर येथील शाखा उद्घाटनप्रसंगी भारतीय ‘अर्थकारण : दशा आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. जाधव बोलत होते. तत्पूर्वी, संस्थेच्या येथील शाखेचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा सुनीता खामकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, उपाध्यक्ष प्राचार्य आर. एस. निळपणकर, शाखाध्यक्ष महावीर चौगुले, अनिल घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय व्यवस्थेतील विकासाच्या दराबाबत बोलताना डॉ. जाधव म्हणाले, १९७४ ला हरितक्रांतीच्या माध्यमातून विकासाला खरी सुरुवात झाली. त्यानंतर १९९१ साली संगणक, टेलिकॉम या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलाच्या प्रक्रियेला आणखी चालना मिळाली. गेल्या शंभर वर्षांत जेवढा बदल झाला नाही तो १९९१ नंतर झाला आहे. ‘अच्छे दिन’ येणार यातून केंद्र सरकारने मांडलेले बजेट तितकेच चांगले व वाईटही दिसून येत आहे. यामध्ये कृषी क्षेत्राची बोळवणच दिसून आली, शिक्षण व कौशल्य विकासाला प्राधान्य दिले गेले नाही. एकीकडे गुंतवणुकीला चालना दिली, तर दुसरीकडे बचत वाढीसाठी चालना दिली गेली नाही. आर्थिक विकासाचा दर टिकविणे हेच भारतासमोर आव्हान आहे. आज युवाशक्तीचे बलस्थान मोठ्या प्रमाणात आहे. या युवाशक्तीच्या माध्यमातून आर्थिक विकासास चालना देण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलून, येत्या १५ वर्षांत आर्थिक विकासाचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.प्रारंभी दीपप्रज्वलन व इशस्तवनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. स्वागत आर. एस. निळपणकर यांनी केले. प्रास्ताविकात अध्यक्ष चौगुले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली. यावेळी कुलगुरू मुळे यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महावीर चौगुले, संजय पाटील, निशिकांत गोरुले, विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेच्या गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, आजरा या शाखांतील अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. माणिक घुमाई यांनी आभार मानले. डॉ. समिधा चौगुले यांच्या पसायदानाने सांगता झाली. (प्रतिनिधी)