कोल्हापूर : रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाही झाल्याने पोहण्यासाठी नदीत गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. अथर्व विजय गायकवाड (वय २८, रा. प्लॉट नं. २८, ए, शिवराम पोवार हौसिंग सोसायटी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्यासुमारास शिंगणापूर बंधारा येथे पंचगंगा नदीत घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कडक उन्हामुळे उकाडा वाढला आहे. त्यामुळे अथर्व गायकवाड हा तरुण रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्यासुमारास शिंगणापूर बंधारा येथे पोहण्यासाठी गेला होता. महादेव मंदिर येथे पंचगंगा नदीत पोहण्यासाठी उतरला असता, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्यात उडी मारल्यानंतर तो पाण्यातून वर न आल्याने परिसरातील त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडा-ओरडा केला. त्यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.