शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

आवळीनजीक कारच्या धडकेत चिकुर्डेचा तरुण जागीच ठार

By admin | Updated: May 15, 2014 01:05 IST

देवाळे : कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर आवळी (ता. पन्हाळा) येथील खिंडीजवळ मारुती गाडीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार संतोष शामराव पाटील

देवाळे : कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर आवळी (ता. पन्हाळा) येथील खिंडीजवळ मारुती गाडीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार संतोष शामराव पाटील (वय ३३, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) हे जागीच ठार झाले. हा अपघात आज, बुधवारी सकाळी झाला. घटनास्थळ व कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संतोष पाटील हे चरण (ता. शाहूवाडी) येथे आपल्या मामाच्या लग्नानिमित्त गोंधळाचे जेवण जेवून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून ड्यूटीवर जाण्यासाठी निघाले. याचवेळी आवळी खिंडीजवळ आले असता समोरून येणार्‍या चारचाकी गाडीचे उजव्या बाजूचे दोन्ही टायर (पुढील व मागील) फुटून भरधाव वेगात असणार्‍या या गाडीची (एमएच ५० ए ४१३४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. चारचाकी गाडी दाऊद याकूब आंबेकरी (मु.पो. खोडशी, ता. कºहाड) यांच्या मालकीची असून, ते स्वत: गाडी चालवत होते. दुचाकीला धडक दिल्यानंतर गाडी रस्त्यावर उलटली व डाव्या बाजूला थांबली. यामध्ये दाऊद आंबेकरी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. आंबेकरी हे इचलकरंजी येथून कुटुंबीयांसह विशाळगडकडे चालले होते. या अपघाताची माहिती सरपंच तानाजी मदने यांनी कोडोली पोलिसांना दिली. उपसरपंच अनिल पाटील यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. ड्यूटी संपवून शाहूवाडीकडे जाणारे कोडोली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संग्राम शिंदे व श्रीकांत शिंदे यांनी घटनेचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.