शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

तुम्हीच सांगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:28 IST

लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची पातळी याचबरोबर पाच वर्षांत लोकसभेत प्रतिनिधीने केलेल्या कामकाजाचा अहवाल, या अनुषंगाने निवडणूक प्रचारात विविध मुद्द्यांचा समावेश ...

लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची पातळी याचबरोबर पाच वर्षांत लोकसभेत प्रतिनिधीने केलेल्या कामकाजाचा अहवाल, या अनुषंगाने निवडणूक प्रचारात विविध मुद्द्यांचा समावेश असतो. प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करण्याची एकही संधी सोडली जात नाही. जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोषणा आणि आपल्या कामगिरीसंदर्भात उमेदवार प्रभावीपणे मांडणी करीत असतात. खासदार उदयसिंगराव गायकवाड यांनी सलग पाचवेळा संसदेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांच्या कर्तृत्वाची नोंद पक्षाने घेतली होती. राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम पाहिले होते, अशी पार्श्वभूमी असली, तरी मौनी खासदार अशा स्वरूपाची बोचरी टीका निवडणूक प्रचाराच्या काळात विरोधकांकडून सातत्याने होत असे. त्याला उदयसिंगराव यांनी तेवढ्याच ताकदीने दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे.मौनी खासदार म्हणून माझ्यावर टीका-टिप्पणी केली जाते. मधु दंडवते संसदेत सातत्याने लोकशाहीने दिलेल्या संसदेतील आयुधांचा वापर करून प्रश्न मांडत असतात. त्यांची संख्या शेकड्यात असते. त्याचा संदर्भ देऊन उदयसिंगराव यांनी प्रश्न केला की, माझ्यावर मौनी खासदार म्हणून टीका होते. खासदार मधु दंडवते यांनी संसदेत १00 प्रश्न विचारले. मी फक्त पाचच प्रश्न विचारले. माझे सर्व प्रश्न मार्गी लागले. मधु दंडवतेंचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. आता मला सांगा दोघांपैकी जनतेच्या हितासाठी कोणता खासदार महत्त्वाचा. अधिक प्रश्न विचारून त्यातील एकही प्रश्न सुटत नसेल, तर त्याचा जनतेला फायदा काय? उलट जनतेच्या जिव्हाळ्याचे काही मोजके प्रश्न मांडून ते मार्गी लावले, तर जनतेला दिलासा मिळू शकतो. मौनी खासदार म्हणून टीका करणाऱ्यांनी वरील वास्तव लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.उदयसिंगरावांनी मौनी खासदार या टीकेला वरीलप्रमाणे प्रभावी उत्तर देऊन आपल्यावरील आरोप परतवून लावले होते. यापूर्वीच्या निवडणुकीत होणारी राष्ट्रीय चर्चा, आंतरराष्ट्रीय प्रश्न, शासनाचे धोरण या अनुषंगाने प्रबोधनात्मक होत असे. भाषणांना मोठी गर्दी असायची. अलीकडे मात्र जनतेचे प्रश्न आणि प्रबोधनाचा विषय प्रचारातून गायब झालेला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना वापरण्यात येणाºया भाषेचा स्तरही इतका खालावला आहे की, कोणी कोणाचा मान-सन्मान ठेवायला तयारच नाही; त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनासुद्धा प्रतिनिधी निवडताना एक प्रकारचे आव्हान वाटते आहे.लोकशाहीत मताचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेतून तो मिळाला आहे. त्याचा योग्य वापर करून योग्य प्रतिनिधीची निवड करणे आजच्या निवडणूक काळातील प्रचाराच्या गदारोळात कठीण होऊन बसल्याची सामान्य मतदारांची प्रतिक्रिया आहे.सुभाष धुमे, ज्येष्ठ पत्रकार