शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

तुम्हीच सांगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:28 IST

लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची पातळी याचबरोबर पाच वर्षांत लोकसभेत प्रतिनिधीने केलेल्या कामकाजाचा अहवाल, या अनुषंगाने निवडणूक प्रचारात विविध मुद्द्यांचा समावेश ...

लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची पातळी याचबरोबर पाच वर्षांत लोकसभेत प्रतिनिधीने केलेल्या कामकाजाचा अहवाल, या अनुषंगाने निवडणूक प्रचारात विविध मुद्द्यांचा समावेश असतो. प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करण्याची एकही संधी सोडली जात नाही. जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोषणा आणि आपल्या कामगिरीसंदर्भात उमेदवार प्रभावीपणे मांडणी करीत असतात. खासदार उदयसिंगराव गायकवाड यांनी सलग पाचवेळा संसदेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांच्या कर्तृत्वाची नोंद पक्षाने घेतली होती. राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम पाहिले होते, अशी पार्श्वभूमी असली, तरी मौनी खासदार अशा स्वरूपाची बोचरी टीका निवडणूक प्रचाराच्या काळात विरोधकांकडून सातत्याने होत असे. त्याला उदयसिंगराव यांनी तेवढ्याच ताकदीने दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे.मौनी खासदार म्हणून माझ्यावर टीका-टिप्पणी केली जाते. मधु दंडवते संसदेत सातत्याने लोकशाहीने दिलेल्या संसदेतील आयुधांचा वापर करून प्रश्न मांडत असतात. त्यांची संख्या शेकड्यात असते. त्याचा संदर्भ देऊन उदयसिंगराव यांनी प्रश्न केला की, माझ्यावर मौनी खासदार म्हणून टीका होते. खासदार मधु दंडवते यांनी संसदेत १00 प्रश्न विचारले. मी फक्त पाचच प्रश्न विचारले. माझे सर्व प्रश्न मार्गी लागले. मधु दंडवतेंचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. आता मला सांगा दोघांपैकी जनतेच्या हितासाठी कोणता खासदार महत्त्वाचा. अधिक प्रश्न विचारून त्यातील एकही प्रश्न सुटत नसेल, तर त्याचा जनतेला फायदा काय? उलट जनतेच्या जिव्हाळ्याचे काही मोजके प्रश्न मांडून ते मार्गी लावले, तर जनतेला दिलासा मिळू शकतो. मौनी खासदार म्हणून टीका करणाऱ्यांनी वरील वास्तव लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.उदयसिंगरावांनी मौनी खासदार या टीकेला वरीलप्रमाणे प्रभावी उत्तर देऊन आपल्यावरील आरोप परतवून लावले होते. यापूर्वीच्या निवडणुकीत होणारी राष्ट्रीय चर्चा, आंतरराष्ट्रीय प्रश्न, शासनाचे धोरण या अनुषंगाने प्रबोधनात्मक होत असे. भाषणांना मोठी गर्दी असायची. अलीकडे मात्र जनतेचे प्रश्न आणि प्रबोधनाचा विषय प्रचारातून गायब झालेला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना वापरण्यात येणाºया भाषेचा स्तरही इतका खालावला आहे की, कोणी कोणाचा मान-सन्मान ठेवायला तयारच नाही; त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनासुद्धा प्रतिनिधी निवडताना एक प्रकारचे आव्हान वाटते आहे.लोकशाहीत मताचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेतून तो मिळाला आहे. त्याचा योग्य वापर करून योग्य प्रतिनिधीची निवड करणे आजच्या निवडणूक काळातील प्रचाराच्या गदारोळात कठीण होऊन बसल्याची सामान्य मतदारांची प्रतिक्रिया आहे.सुभाष धुमे, ज्येष्ठ पत्रकार