शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:28 IST

लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची पातळी याचबरोबर पाच वर्षांत लोकसभेत प्रतिनिधीने केलेल्या कामकाजाचा अहवाल, या अनुषंगाने निवडणूक प्रचारात विविध मुद्द्यांचा समावेश ...

लोकसभा निवडणुकीतील प्रचाराची पातळी याचबरोबर पाच वर्षांत लोकसभेत प्रतिनिधीने केलेल्या कामकाजाचा अहवाल, या अनुषंगाने निवडणूक प्रचारात विविध मुद्द्यांचा समावेश असतो. प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करण्याची एकही संधी सोडली जात नाही. जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोषणा आणि आपल्या कामगिरीसंदर्भात उमेदवार प्रभावीपणे मांडणी करीत असतात. खासदार उदयसिंगराव गायकवाड यांनी सलग पाचवेळा संसदेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांच्या कर्तृत्वाची नोंद पक्षाने घेतली होती. राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम पाहिले होते, अशी पार्श्वभूमी असली, तरी मौनी खासदार अशा स्वरूपाची बोचरी टीका निवडणूक प्रचाराच्या काळात विरोधकांकडून सातत्याने होत असे. त्याला उदयसिंगराव यांनी तेवढ्याच ताकदीने दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे.मौनी खासदार म्हणून माझ्यावर टीका-टिप्पणी केली जाते. मधु दंडवते संसदेत सातत्याने लोकशाहीने दिलेल्या संसदेतील आयुधांचा वापर करून प्रश्न मांडत असतात. त्यांची संख्या शेकड्यात असते. त्याचा संदर्भ देऊन उदयसिंगराव यांनी प्रश्न केला की, माझ्यावर मौनी खासदार म्हणून टीका होते. खासदार मधु दंडवते यांनी संसदेत १00 प्रश्न विचारले. मी फक्त पाचच प्रश्न विचारले. माझे सर्व प्रश्न मार्गी लागले. मधु दंडवतेंचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. आता मला सांगा दोघांपैकी जनतेच्या हितासाठी कोणता खासदार महत्त्वाचा. अधिक प्रश्न विचारून त्यातील एकही प्रश्न सुटत नसेल, तर त्याचा जनतेला फायदा काय? उलट जनतेच्या जिव्हाळ्याचे काही मोजके प्रश्न मांडून ते मार्गी लावले, तर जनतेला दिलासा मिळू शकतो. मौनी खासदार म्हणून टीका करणाऱ्यांनी वरील वास्तव लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.उदयसिंगरावांनी मौनी खासदार या टीकेला वरीलप्रमाणे प्रभावी उत्तर देऊन आपल्यावरील आरोप परतवून लावले होते. यापूर्वीच्या निवडणुकीत होणारी राष्ट्रीय चर्चा, आंतरराष्ट्रीय प्रश्न, शासनाचे धोरण या अनुषंगाने प्रबोधनात्मक होत असे. भाषणांना मोठी गर्दी असायची. अलीकडे मात्र जनतेचे प्रश्न आणि प्रबोधनाचा विषय प्रचारातून गायब झालेला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना वापरण्यात येणाºया भाषेचा स्तरही इतका खालावला आहे की, कोणी कोणाचा मान-सन्मान ठेवायला तयारच नाही; त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनासुद्धा प्रतिनिधी निवडताना एक प्रकारचे आव्हान वाटते आहे.लोकशाहीत मताचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेतून तो मिळाला आहे. त्याचा योग्य वापर करून योग्य प्रतिनिधीची निवड करणे आजच्या निवडणूक काळातील प्रचाराच्या गदारोळात कठीण होऊन बसल्याची सामान्य मतदारांची प्रतिक्रिया आहे.सुभाष धुमे, ज्येष्ठ पत्रकार