शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

समाजकार्य करायला पदाची गरज नसते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:28 IST

सांगरुळ : समाजकार्य करायला पद किंवा सत्ता असावीच असे नाही. समाजकार्य रक्तात असावे लागते. सर्वसामान्य लोकांची नाळ असावी लागते, ...

सांगरुळ : समाजकार्य करायला पद किंवा सत्ता असावीच असे नाही. समाजकार्य रक्तात असावे लागते. सर्वसामान्य लोकांची नाळ असावी लागते, असे प्रतिपादन देवराज नरके यांनी केले. सांगरुळ (ता. करवीर) येथे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगरुळ गावातील पूरग्रस्त नागरिक ज्यांच्या घरात पुराचे पाणी आले होते. अशा सर्व लोकांना संसार उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर होते.

यावेळी देवराज नरके म्हणाले करवीर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यापुढे महापूर दरवर्षी येणारच त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे. आम्ही चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्य व लागेल ती मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नरके यांनी सांगितले. यावेळी कुमार कपडे म्हणाले माजी आमदार चंद्रदीप नरके हे नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिले आहेत मतदारसंघात मदत करत असताना गट-तट बाजूला ठेवून ते सर्वसामान्य माणसात मिसळून काम करतात. ही त्यांची वेगळी ओळख असून आता त्यांनी पदावर नसतानाही प्रत्येक गावातील पूरग्रस्तांना मदत करण्याचा लावलेला सपाटा लक्षात घेता त्यांचे समाजाभिमुख काम आदर्शवत असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच सुशांत नाळे, तंटामुक्त अध्यक्ष कृष्णात खाडे, जनार्दन खाडे, प्रशांत नाळे, प्रशांत खाडे, आनंदा इंगळे, दत्तात्रय सुतार, सर्जेराव मगदूम, ग्राम विकास अधिकारी पांडुरंग बिडकर यांच्यासह पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळी

सांगरूळ येथे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना संसारोपयोगी साहित्य वाटप करताना युवा नेते देवराज नरके कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर उपसरपंच सुशांत नाळे, कृष्णात खाडे आदी.