शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

होय, आम्हाला सुरक्षाच हवी..!

By admin | Updated: May 20, 2015 00:44 IST

कोल्हापूरकरांची अपेक्षा : गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे असुरक्षिततेचे वातावरण

एकनाथ पाटील - कोल्हापूर -गेल्या तीन वर्षांमध्ये भरदिवसा गोळीबार, खून, चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लूटमारीच्या वाढत्या प्रकारांनी त्रस्त झालेले असुरक्षित कोल्हापूरकर... जयंती, उत्सवांच्या नावाखाली सक्तीच्या वर्गणीमुळे बेजार झालेले व्यापारी... किरकोळ कारणावरून संवेदनशील, अतिसंवेदनशील भागांत होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांनी भयभीत झालेले रहिवासी... असे चित्र कोल्हापूरचे झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक स्वत:ला सुरक्षित समजत नसल्याचे चित्र आहे. त्यावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला असता ‘होय, आम्हाला सुरक्षाच हवी...!’ अशी अपेक्षा अनेक कोल्हापूरकरांनी व्यक्त केली. खून, खुनाचा प्रयत्न, चेन स्नॅचिंग, घरफोडी, हाणामाऱ्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, धार्मिक तेढ, आदी घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर खुनांची मालिकाच सुरू झाली आहे. धडावेगळे शिर नसलेले मुडदे माळरानावर टाकले जात आहेत. घरफोड्यांच्या प्रमाणात तर मोठी वाढ झाली आहे. सोनसाखळी पळविण्याच्या घटना तर नित्याच्याच आहेत. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारांचे प्रमाणही वाढू लागले आहे. शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्या युवतींचे अपहरण हीसुद्धा एक चिंतेची बाब बनली आहे. पीडित युवतींचे माता-पिता आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा अथवा आशेचा किरणही पोलीस ठाण्यात, चौकीत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. एखादी घटना घडल्यानंतर तत्काळ फिर्याद नोंदवून घेण्याचे कष्ट कोणी घेताना दिसत नाहीत. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस ठाण्यांची बांधणी करताना सर्वच पोलीस ठाण्यांत नवे अधिकारी नियुक्त केले आहेत. अधिकारी नवे आणि कर्मचारी जुने अशा परिस्थितीत अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न काही जुन्या कर्मचाऱ्यांना खटकत आहेत. वरकमाई पूर्णत: बंद झाल्याने ही फळी अधिकाऱ्यांच्या विरोधात गेली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसू लागल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले. काही अधिकाऱ्यांत गुन्हे उघडकीस आणण्यावरून एकमेकांत स्पर्धा सुरू आहे. चांगले काम करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पाय ओढणारीही यंत्रणा पोलीस दलात कार्यरत आहे. पोलीस दलातील या अंतर्गत कुरघोड्यांमुळे सुरक्षेचे बारा वाजले आहेत. निर्मनुष्य वसाहतीत ‘नो सायरन’शहराचा विस्तार वाढलेला आहे. चारही बाजूंनी वसाहती वाढत चालल्या आहेत. बऱ्याच वसाहती, नगरांमध्ये अपार्टमेंट परिसरात दिव्यांची सोय नाही. या भागातील नागरिकांनी रात्रगस्त करणाऱ्या गाड्यांचे सायरन कधी ऐकलेच नसतील. रात्रगस्तीच्या पोलिसांनी ज्या-त्या भागात फिरत असताना सायरन वाजवून नागरिकांना जागरूक करावे, अशी अपेक्षा आहे.रात्रगस्तीची रचना बदलण्याची गरजसध्या रात्रगस्त अकरा ते पहाटे पाच अशी आहे. वास्तविक रात्री १२ पर्यंत बहुतांश लोक जागे असतात. चित्रपटगृहांमधून बाहेर पडलेले रसिक, कंपनी, कारखान्यांमधून घरी परतणारे कामगार अथवा रात्री मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्थानकामधून बाहेर पडणारे प्रवासी यांची वर्दळ सुरू असते. घरफोडीची वेळ ही मध्यरात्री एक ते पहाटे चार अशी आहे.यावेळी पोलीस रस्त्यावर नसून ठाण्यात किंवा जीपमध्ये साखरझोपेत असतात. या वेळेतच रात्रगस्त घालण्याची सक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर केली पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. ५नको तिथे नाकाबंदी जिथे नाकाबंदी हवी, तिथे जरूर केली पाहिजे; परंतु ज्या ठिकाणी नाकाबंदीची गरज नाही, अशा ठिकाणी ती केली जात आहे. पोलीस कोणत्या ठिकाणी नाकाबंदी करतात त्याची माहिती गुन्हेगारांना आहे. त्यामुळे नाकाबंदी करूनही चेन स्नॅचर किंवा चोरटे सापडत नाहीत.