शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

होय, आम्हाला सुरक्षाच हवी..!

By admin | Updated: May 20, 2015 00:44 IST

कोल्हापूरकरांची अपेक्षा : गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे असुरक्षिततेचे वातावरण

एकनाथ पाटील - कोल्हापूर -गेल्या तीन वर्षांमध्ये भरदिवसा गोळीबार, खून, चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लूटमारीच्या वाढत्या प्रकारांनी त्रस्त झालेले असुरक्षित कोल्हापूरकर... जयंती, उत्सवांच्या नावाखाली सक्तीच्या वर्गणीमुळे बेजार झालेले व्यापारी... किरकोळ कारणावरून संवेदनशील, अतिसंवेदनशील भागांत होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांनी भयभीत झालेले रहिवासी... असे चित्र कोल्हापूरचे झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक स्वत:ला सुरक्षित समजत नसल्याचे चित्र आहे. त्यावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला असता ‘होय, आम्हाला सुरक्षाच हवी...!’ अशी अपेक्षा अनेक कोल्हापूरकरांनी व्यक्त केली. खून, खुनाचा प्रयत्न, चेन स्नॅचिंग, घरफोडी, हाणामाऱ्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, धार्मिक तेढ, आदी घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर खुनांची मालिकाच सुरू झाली आहे. धडावेगळे शिर नसलेले मुडदे माळरानावर टाकले जात आहेत. घरफोड्यांच्या प्रमाणात तर मोठी वाढ झाली आहे. सोनसाखळी पळविण्याच्या घटना तर नित्याच्याच आहेत. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारांचे प्रमाणही वाढू लागले आहे. शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्या युवतींचे अपहरण हीसुद्धा एक चिंतेची बाब बनली आहे. पीडित युवतींचे माता-पिता आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा अथवा आशेचा किरणही पोलीस ठाण्यात, चौकीत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. एखादी घटना घडल्यानंतर तत्काळ फिर्याद नोंदवून घेण्याचे कष्ट कोणी घेताना दिसत नाहीत. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस ठाण्यांची बांधणी करताना सर्वच पोलीस ठाण्यांत नवे अधिकारी नियुक्त केले आहेत. अधिकारी नवे आणि कर्मचारी जुने अशा परिस्थितीत अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न काही जुन्या कर्मचाऱ्यांना खटकत आहेत. वरकमाई पूर्णत: बंद झाल्याने ही फळी अधिकाऱ्यांच्या विरोधात गेली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसू लागल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले. काही अधिकाऱ्यांत गुन्हे उघडकीस आणण्यावरून एकमेकांत स्पर्धा सुरू आहे. चांगले काम करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पाय ओढणारीही यंत्रणा पोलीस दलात कार्यरत आहे. पोलीस दलातील या अंतर्गत कुरघोड्यांमुळे सुरक्षेचे बारा वाजले आहेत. निर्मनुष्य वसाहतीत ‘नो सायरन’शहराचा विस्तार वाढलेला आहे. चारही बाजूंनी वसाहती वाढत चालल्या आहेत. बऱ्याच वसाहती, नगरांमध्ये अपार्टमेंट परिसरात दिव्यांची सोय नाही. या भागातील नागरिकांनी रात्रगस्त करणाऱ्या गाड्यांचे सायरन कधी ऐकलेच नसतील. रात्रगस्तीच्या पोलिसांनी ज्या-त्या भागात फिरत असताना सायरन वाजवून नागरिकांना जागरूक करावे, अशी अपेक्षा आहे.रात्रगस्तीची रचना बदलण्याची गरजसध्या रात्रगस्त अकरा ते पहाटे पाच अशी आहे. वास्तविक रात्री १२ पर्यंत बहुतांश लोक जागे असतात. चित्रपटगृहांमधून बाहेर पडलेले रसिक, कंपनी, कारखान्यांमधून घरी परतणारे कामगार अथवा रात्री मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्थानकामधून बाहेर पडणारे प्रवासी यांची वर्दळ सुरू असते. घरफोडीची वेळ ही मध्यरात्री एक ते पहाटे चार अशी आहे.यावेळी पोलीस रस्त्यावर नसून ठाण्यात किंवा जीपमध्ये साखरझोपेत असतात. या वेळेतच रात्रगस्त घालण्याची सक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर केली पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. ५नको तिथे नाकाबंदी जिथे नाकाबंदी हवी, तिथे जरूर केली पाहिजे; परंतु ज्या ठिकाणी नाकाबंदीची गरज नाही, अशा ठिकाणी ती केली जात आहे. पोलीस कोणत्या ठिकाणी नाकाबंदी करतात त्याची माहिती गुन्हेगारांना आहे. त्यामुळे नाकाबंदी करूनही चेन स्नॅचर किंवा चोरटे सापडत नाहीत.