शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

होय, मी प्रेमात आहे!

By admin | Updated: May 13, 2015 23:33 IST

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच रणबीरने मात्र याचा इन्कार केला आहे. मात्र त्याने प्रेमात

जयसिंगपूर : शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील साखर कारखानदारांनी २१ मेच्या आत थकीत असलेली एफआरपीची रक्कम द्यावी, या मागणीसाठी दत्त, गुरुदत्त, पंचगंगा, जवाहर व शरद या साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने कारखान्यावर जाऊन निवेदन देण्यात आले. एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील पाच साखर कारखान्यांचे दोन महिने झाले तरीही एफआरपीचे ३१४ कोटी रुपये थकीत आहेत. सन २०१४-१५चा गळीत हंगाम संपला आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे व लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडले आहेत. ऊस साखर कारखान्याला गाळपाला गेल्यापासून १४ दिवसांच्या आत पहिली उचल एफआरपीप्रमाणे देणे कायद्याने बंधनकारक आहे. तरीही मार्च, एप्रिल व मे महिन्यात गाळप झालेल्या उसाचे बिल अद्यापही साखर कारखान्यांनी दिले नाही. येत्या २१ मे २०१५ पर्यंत संबंधित साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले द्यावीत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच शिरोळ व हातकणंगलेचे तहसीलदार यांना या संदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.यावेळी आण्णासो चौगुले, जि. प. सदस्य सावकर मादनाईक, आदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, विठ्ठल मोरे, प्रकाश गावडे, म्हादगोंडा पाटील, भीमगोंडा पाटील, सचिन शिंदे, महेश पाटील, शहाजी गावडे, शिवाजी माने, अरुण मगदूम, संतोष जाधव, सागर चिपरगे, सागर संभूशेटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)