शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पिवळाधमक ‘तोतापुरी’ बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 01:11 IST

डाळींच्या दरात वाढ सुरूच : भाजीपालाही वधारला, कलिंगडांची आवक वाढली

कोल्हापूर : यंदा हापूसबरोबर तोतापुरी आंब्यांची आवक थोडी लवकरच झाली असून, बाजारात पिवळाधमक तोतापुरी आंबा ग्राहकांना भुरळ पाडत आहे. डाळींच्या दरात दर आठवड्याला थोडी-थोडी वाढ होऊ लागली असून, तूरडाळ व हरभरा डाळींचे दर ऐंशीच्या वर गेले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी दर काहीसे वधारले आहेत. रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हापूसच्या दीड हजारांपेक्षा अधिक पेट्या, तर रोज बाजार समितीत आठ हजार बॉक्सची आवक होत आहे. त्याशिवाय रायवळ व पायरी आंब्यांची आवकही सुरू आहे. घाऊक बाजारात हापूस पेटी (चार डझन) सरासरी १५००, तर बॉक्सचा (दोन डझन) दर ३०० रुपये असला तरी किरकोळ बाजारात अजूनही दर चढाच आहे. किरकोळ बाजारात दर ४०० रुपये डझन आहे. त्यामुळे अजून तरी हापूस सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. पायरी व रायवळ आंब्यांची आवकही चांगली आहे. साधारणत: ३० पासून ६० रुपये किलोपर्यंत याचे दर आहेत. कलिंगडांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात काळ्या पाठीची कलिंंगडे २० रुपये, तर हिरव्या पट्ट्याचा दर ४० रुपयांपर्यंत आहे. लिंबूंच्या मागणीत वाढ झाली तरी आवकही चांगली असल्याने १० रुपयांना पाच लिंबू असा दर आहे. एरव्ही मे महिन्यात दाखल होणारा तोतापुरी आंबा यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात आला आहे. पिवळ्याधमक तोतापुरीने ग्राहकांना भुरळ घातली आहे. पाणीटंचाई व कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी दर वाढण्यास सुरुवात झाली असून, ओला वाटाणा यंदा पहिल्यांदाच ६५ रुपयांपर्यंत धडकला आहे. भेंडी, दोडका, कारली, वरण्याचा दर ४० पासून ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. काकडीची आवक वाढल्याने दर ४० रुपयांपर्यंत स्थिर आहे. चटणीचा हंगाम जोरात सुरू असल्याने कोथिंबिरीच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात २० रुपये पेंढी, तर मेथी, पालक पाच रुपये पेंढी आहे. वांगी २० रुपये किलो, तर टोमॅटो १० ते १५ रुपयांपर्यंत आहे. तूरडाळ, हरभरा डाळींच्या दरांत आठवड्याला वाढ होत असून किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे. मसूरडाळ, मटकीचे दर मात्र स्थिर आहेत. सरकी तेल, साखरेच्या दरांत फारसा चढउतार झालेला नाही. लाल मिरचीची आवक यंदा चांगली असली तरी तिच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. ब्याडगीबरोबर घंटुर मिरचीला अधिक मागणी आहे. ज्वारीचे दर काहीसे स्थिर आहेत. किलोचा दर २२ ते ३० रुपये आहे.