शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

पिवळाधमक ‘तोतापुरी’ बाजारात दाखल

By admin | Updated: April 9, 2017 16:30 IST

डाळींच्या दरात वाढ सुरूच : भाजीपालाही वधारला

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : यंदा हापूसबरोबर तोतापुरी आंब्यांची आवक थोडी लवकरच झाली असून, बाजारात पिवळाधमक तोतापुरी आंबा ग्राहकांना भुरळ पाडत आहे. डाळींच्या दरात दर आठवड्याला थोडी-थोडी वाढ होऊ लागली असून, तूरडाळ व हरभरा डाळींचे दर ऐंशीच्या वर गेले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी दर काहीसे वधारले आहेत.

रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हापूसच्या दीड हजारांपेक्षा अधिक पेट्या, तर रोज बाजार समितीत आठ हजार बॉक्सची आवक होत आहे. त्याशिवाय रायवळ व पायरी आंब्यांची आवकही सुरू आहे. घाऊक बाजारात हापूस पेटी (चार डझन) सरासरी १५००, तर बॉक्सचा (दोन डझन) दर ३०० रुपये असला तरी किरकोळ बाजारात अजूनही दर चढाच आहे. किरकोळ बाजारात दर ४०० रुपये डझन आहे. त्यामुळे अजून तरी हापूस सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. पायरी व रायवळ आंब्यांची आवकही चांगली आहे. साधारणत: ३० पासून ६० रुपये किलोपर्यंत याचे दर आहेत.कलिंगडांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात काळ्या पाठीची कलिंंगडे २० रुपये, तर हिरव्या पट्ट्याचा दर ४० रुपयांपर्यंत आहे. लिंबूंच्या मागणीत वाढ झाली तरी आवकही चांगली असल्याने १० रुपयांना पाच लिंबू असा दर आहे.

एरव्ही मे महिन्यात दाखल होणारा तोतापुरी आंबा यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात आला आहे. पिवळ्याधमक तोतापुरीने ग्राहकांना भुरळ घातली आहे. पाणीटंचाई व कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी दर वाढण्यास सुरुवात झाली असून, ओला वाटाणा यंदा पहिल्यांदाच ६५ रुपयांपर्यंत धडकला आहे. भेंडी, दोडका, कारली, वरण्याचा दर ४० पासून ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. काकडीची आवक वाढल्याने दर ४० रुपयांपर्यंत स्थिर आहे. चटणीचा हंगाम जोरात सुरू असल्याने कोथिंबिरीच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात २० रुपये पेंढी, तर मेथी, पालक पाच रुपये पेंढी आहे. वांगी २० रुपये किलो, तर टोमॅटो १० ते १५ रुपयांपर्यंत आहे

तूरडाळ, हरभरा डाळींच्या दरांत आठवड्याला वाढ होत असून किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे.मसूरडाळ, मटकीचे दर मात्र स्थिर आहेत. सरकी तेल, साखरेच्या दरांत फारसा चढउतार झालेला नाही. लाल मिरचीची आवक यंदा चांगली असली तरी तिच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. ब्याडगीबरोबर घंटुर मिरचीला अधिक मागणी आहे. ज्वारीचे दर काहीसे स्थिर आहेत. किलोचा दर २२ ते ३० रुपये आहे. कांदा घसरला! कांद्याची आवक वाढली आहे. बाजार समितीत रोज २६ हजार पिशव्यांची आवक होत असून सरासरी दर प्रतिकिलो ५५ रुपये आहे. बटाट्याची आवक कमी असल्याने दरात थोडी वाढ झाली असली तरी लसणाचे दर मात्र स्थिर आहेत.