शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पिवळाधमक ‘तोतापुरी’ बाजारात दाखल

By admin | Updated: April 9, 2017 16:30 IST

डाळींच्या दरात वाढ सुरूच : भाजीपालाही वधारला

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : यंदा हापूसबरोबर तोतापुरी आंब्यांची आवक थोडी लवकरच झाली असून, बाजारात पिवळाधमक तोतापुरी आंबा ग्राहकांना भुरळ पाडत आहे. डाळींच्या दरात दर आठवड्याला थोडी-थोडी वाढ होऊ लागली असून, तूरडाळ व हरभरा डाळींचे दर ऐंशीच्या वर गेले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी दर काहीसे वधारले आहेत.

रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हापूसच्या दीड हजारांपेक्षा अधिक पेट्या, तर रोज बाजार समितीत आठ हजार बॉक्सची आवक होत आहे. त्याशिवाय रायवळ व पायरी आंब्यांची आवकही सुरू आहे. घाऊक बाजारात हापूस पेटी (चार डझन) सरासरी १५००, तर बॉक्सचा (दोन डझन) दर ३०० रुपये असला तरी किरकोळ बाजारात अजूनही दर चढाच आहे. किरकोळ बाजारात दर ४०० रुपये डझन आहे. त्यामुळे अजून तरी हापूस सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे. पायरी व रायवळ आंब्यांची आवकही चांगली आहे. साधारणत: ३० पासून ६० रुपये किलोपर्यंत याचे दर आहेत.कलिंगडांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात काळ्या पाठीची कलिंंगडे २० रुपये, तर हिरव्या पट्ट्याचा दर ४० रुपयांपर्यंत आहे. लिंबूंच्या मागणीत वाढ झाली तरी आवकही चांगली असल्याने १० रुपयांना पाच लिंबू असा दर आहे.

एरव्ही मे महिन्यात दाखल होणारा तोतापुरी आंबा यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात आला आहे. पिवळ्याधमक तोतापुरीने ग्राहकांना भुरळ घातली आहे. पाणीटंचाई व कडाक्याच्या उन्हामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी दर वाढण्यास सुरुवात झाली असून, ओला वाटाणा यंदा पहिल्यांदाच ६५ रुपयांपर्यंत धडकला आहे. भेंडी, दोडका, कारली, वरण्याचा दर ४० पासून ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. काकडीची आवक वाढल्याने दर ४० रुपयांपर्यंत स्थिर आहे. चटणीचा हंगाम जोरात सुरू असल्याने कोथिंबिरीच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात २० रुपये पेंढी, तर मेथी, पालक पाच रुपये पेंढी आहे. वांगी २० रुपये किलो, तर टोमॅटो १० ते १५ रुपयांपर्यंत आहे

तूरडाळ, हरभरा डाळींच्या दरांत आठवड्याला वाढ होत असून किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे.मसूरडाळ, मटकीचे दर मात्र स्थिर आहेत. सरकी तेल, साखरेच्या दरांत फारसा चढउतार झालेला नाही. लाल मिरचीची आवक यंदा चांगली असली तरी तिच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. ब्याडगीबरोबर घंटुर मिरचीला अधिक मागणी आहे. ज्वारीचे दर काहीसे स्थिर आहेत. किलोचा दर २२ ते ३० रुपये आहे. कांदा घसरला! कांद्याची आवक वाढली आहे. बाजार समितीत रोज २६ हजार पिशव्यांची आवक होत असून सरासरी दर प्रतिकिलो ५५ रुपये आहे. बटाट्याची आवक कमी असल्याने दरात थोडी वाढ झाली असली तरी लसणाचे दर मात्र स्थिर आहेत.