शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

यावर्षीही विद्यार्थ्यांना मारावे लागणार हेलपाटे

By admin | Updated: June 1, 2015 00:19 IST

सातारा, सांगलीचा समावेश : अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया नाही

संतोष मिठारी - कोल्हापूर -नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे इचलकरंजी, सांगली, कराड आणि सातारा या ठिकाणी अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू केली जाणार नाही. त्यामुळे येथील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना यावर्षी विविध महाविद्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागणार आहेत. कोल्हापूर शहरात २००८ पर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारी होती. त्यात गोंधळाची परिस्थिती होती. ही प्रक्रिया सोयीस्कर करण्यासह गोंधळ बंद व्हावा, या उद्देशाने २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून तत्कालीन शिक्षण उपसंचालक सर्जेराव जाधव यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालकांचा होणारा त्रास, धावपळ थांबली. त्यामुळे प्रक्रियेला कोल्हापूर शहरातील विद्यार्थी, पालकांनी स्वीकारले. अकरावीच्या प्रवेशात या प्रक्रियेमुळे सुसूत्रता आली. कोल्हापूर विभागातील इचलकरंजी, सांगली, कराड आणि सातारामधील महाविद्यालयांत अकरावी प्रवेशात सुसूत्रता आणण्यासाठी गेल्यावर्षी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे निश्चित केले. त्यानुसार याबाबतची प्राथमिक माहितीदेखील घेण्यात आली. संबंधित प्रवेश प्रक्रिया यंदापासून याठिकाणी सुरू केली जाणार होती. मात्र, त्याचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने यावर्षी ती सुरू होणार नाही. त्यामुळे इचलकरंजी, सांगली, कराड आणि सातारातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागणार आहे शिवाय त्यांचा वेळ आणि पैसादेखील वाया जाणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून सुरू करणे अधिक सोयीस्कर ठरणारे होते.या प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी नियोजनाबाबत पुरेसा वेळ उपलब्ध नाही हे शिक्षण विभागाकडून सांगितले जाणारे कारण अयोग्य आहे. विभागाने दोन महिन्यांपूर्वीचे नियोजन करणे गरजेचे होते. प्रक्रिया यावर्षीपासून सुरू करण्याबाबत प्रयत्न करावेत.- रोहित पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपुरेसा वेळ मिळाला नाहीअकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी आणि प्रशासनाच्यादृष्टीने सोयीस्कर ठरणार आहे. मात्र, एखाद्या शहरात सुरू करावयाची असल्यास त्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शिक्षण विभागाला सादर करावा लागतो. त्याला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रिया सुरू करता येते शिवाय त्यासाठी पालक, विद्यार्थी व शिक्षकांची तयारी आवश्यक आहे. चार-पाच दिवसांत दहावीचा निकाल जाहीर होईल. ते लक्षात घेता इचलकरंजी, सांगली, कराड व सातारा येथे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक वेळ मिळणार नाही. त्यामुळे पुढील वर्षापासून प्रक्रिया राबविण्याचा विचार केला जाईल, असे कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले.