शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

यंदा स्थलांतरित, परदेशी पक्ष्यांनी पाठ फिरवली

By admin | Updated: December 15, 2015 00:25 IST

कळंबा तलावाला प्रदूषणाची दृष्ट : गाळाची दुर्गंधी, बेसुमार वृक्षतोडीमुळे रया गेली...

कळंबा : अथांग साचलेल्या उथळ पाण्यात फ्लेमिंगोसह हजारो पाणपक्ष्यांचे थवे, घरट्यांमध्ये चिमुकल्या पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याशी साद घालत किनाऱ्यावर येऊन थडकणाऱ्या लाटा, कळंबा तलावाचे काही वर्षांपूर्वीचे हे चित्र. जैवविविधतेने नटलेल्या या चित्रावर सुशोभीकरणाच्या नावाखाली उठाव न झालेल्या गाळाच्या दुर्गंधीचा, बेसुमार वृक्षतोडीचा बोळा फिरला व ‘पक्षी गेले दूर देशी’ अशी स्थिती आज निर्माण झाली. कळंबा तलाव परिसर हा एकेकाळी पशू-पक्षी, वनस्पतीबाबत अतिशय समृद्ध होता. उत्तम हवामान, मुबलक पर्जन्य, भौगोलिक स्थान व चांगल्या जमिनीमुळे येथे नंदनवन होते. त्याकाळी गावकावळा, घुबड, सुतार, पिंगळे, घार, कबूतर, गावबगळा, कोकीळ, सुगरण, गिधाड यांसारखे स्थानिक पक्षी, फ्लेमिंगो, पेंटेड स्टार्क, स्पून बिल हे परदेशी पाहुणे, याशिवाय विविध जातींच्या बदकांचा विहार पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी होत होती. पाणलोट व सायलेंट झोनमध्ये उभ्या इमारती, पेट्रोल पंप, हॉटेल्सची बांधकामे, कात्यायनी डोंगर परिसरातील वृक्षतोडीने पाण्याचा नैसर्गिक स्रोत बंद होऊन प्रदूषणात वाढ झाली. पाण्यातील फॉस्फेट वाढल्याने तलावाकाठी जलपर्णी फोफावली.पाण्याचा वापर अंघोळ, जनावरे धुण्यासाठी झाल्याने, गाळाचा उठाव न झाल्याने तलावातील जलचरांचे खाद्य कमी झाले. हे खाद्य कमी झाल्याने पक्ष्यांची संख्या घटली. तलावाकाठचे विविध प्रजातींचे वृक्ष तोडल्याने हजारोंच्या संख्येने दिसणारे स्थलांतरित पक्षी नगण्य झाले.थंडीच्या दिवसांत हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन होत असे. अनेक दुर्मीळ पाणवनस्पतींचे या तलावात अस्तित्व होते. वाढत्या प्रदूषणाने, बेसुमार वृक्षतोडीने हा वारसा नष्ट झाला. सध्या जरी सुशोभीकरणाचे काम सुरू असले, तरी शंभर वर्षांपूर्वीची जैवविविधता निर्माण करण्यासाठी आता तेवढीच वर्षे द्यावी लागतील.++तलावाकाठी पूर्वी तब्बल २०० प्रकारच्या प्रजातींचे पक्षी आढळून येत होते. वाढत्या प्रदूषणाने, नागरी वस्त्यांमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. तलाव संवर्धनाची जबाबदारी सामूहिकरीत्या स्वीकारल्यास येत्या काळात हे चित्र नक्की बदलेल.- श्रद्धानंद रणदिवे, पक्षी निरीक्षक