शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सरकारची वर्षपूर्ती अन कोल्हापूर...

By admin | Updated: October 26, 2015 00:09 IST

एलबीटी, जाचक परवाने रद्दचा दिलासा

अच्छे दिनच्या अपेक्षेने कोल्हापुरातील उद्योजक भाजप-शिवसेनेच्या पाठीशी राहिले. मात्र, सत्तेत येण्यापूर्वी उद्योजकांना वीज दरवाढ कमी करणे, पायाभूत सुविधांची पूर्तता करणे, आदींबाबत आश्वासनांच्या माध्यमातून दिलेला ‘शब्द,’ भाजप-सेना सरकारने वर्ष उलटले तरी, पाळलेला नाही. केवळ एलबीटी हटविण्यासह काही जाचक परवाने रद्द करून दिलासा दिला. ठोस असे काही झाले नसल्याने उद्योजकांत नाराजी आहे.या सरकारकडूनही उद्योजकांचा अपेक्षाभंग झाला. त्यांना केवळ एलबीटी हटविण्यासह काही जाचक परवाने रद्द करून दिलासा देण्याचा सरकारने प्रयत्न केला. पण, प्रमुख मागण्यांबाबत त्यांच्या पदरात केवळ आश्वासने पडली. स्थलांतरणाच्या निर्णयावर उद्योगांसाठी कर्नाटक सरकारने पायघड्या अंथरल्या आहेत. त्याची दखल घेत युती सरकारच्या पाठीशी राहिलेल्या उद्योजकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी २९ डिसेंबर २०१४ रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात बैठक घेतली. यावेळी त्यांनी उद्योजकांना ‘सरकारवर विश्वास ठेवा, स्थलांतरणाचा विचार सोडा,’ असे आवाहन केले. त्यानंतर आता सरकारची वर्षपूर्ती झाली तरी, उद्योग क्षेत्राबाबत ठोस अशी काहीच कार्यवाही झालेली नाही. वाढीव वीज दरवाढ कमी व्हावी, भूखंड मिळावेत, टोल हटवावा, बी-टेन्युअरचा प्रश्न सोडवावा, ईएसआयसी रुग्णालय सुरू करावे, अशा मागण्यांच्या पूर्ततेच्या प्रतीक्षेत अजूनही उद्योजक आहेत.वीजदराबाबतचा ‘शब्द’ पाळला नाही; उद्योजकांत नाराजीअवघे चार आणे कमी केलेवीज दरवाढ कमी करण्यासाठी सरकार बदलल्यावरदेखील कोल्हापुरातील उद्योजकांनी आंदोलन केले. त्याचे पडसाद राज्यात उमटले. त्याची दखल घेऊन सरकारने युनिटमागे अवघे चार आणे कमी केले. इतर राज्यांप्रमाणे दर ठेवण्याची कार्यवाही सरकारकडून झाली नाही. उद्योजकांना दिलेला शब्द सरकारला पाळता आला नसल्याची प्रतिक्रिया उद्योजक उदय दुधाणे यांनी दिली. ते म्हणाले, एकीकडे वीजदर चार आण्यांनी कमी केला आणि दुसरीकडे एका अश्वशक्तीला मॅक्झिमम डिमांड चार्जेस (एमडीसी) ३० रुपयांनी वाढविला आहे. त्यामुळे दर कमी करणे केवळ नावापुरते झाले.