शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सरकारची वर्षपूर्ती अन कोल्हापूर...

By admin | Updated: October 26, 2015 00:09 IST

एलबीटी, जाचक परवाने रद्दचा दिलासा

अच्छे दिनच्या अपेक्षेने कोल्हापुरातील उद्योजक भाजप-शिवसेनेच्या पाठीशी राहिले. मात्र, सत्तेत येण्यापूर्वी उद्योजकांना वीज दरवाढ कमी करणे, पायाभूत सुविधांची पूर्तता करणे, आदींबाबत आश्वासनांच्या माध्यमातून दिलेला ‘शब्द,’ भाजप-सेना सरकारने वर्ष उलटले तरी, पाळलेला नाही. केवळ एलबीटी हटविण्यासह काही जाचक परवाने रद्द करून दिलासा दिला. ठोस असे काही झाले नसल्याने उद्योजकांत नाराजी आहे.या सरकारकडूनही उद्योजकांचा अपेक्षाभंग झाला. त्यांना केवळ एलबीटी हटविण्यासह काही जाचक परवाने रद्द करून दिलासा देण्याचा सरकारने प्रयत्न केला. पण, प्रमुख मागण्यांबाबत त्यांच्या पदरात केवळ आश्वासने पडली. स्थलांतरणाच्या निर्णयावर उद्योगांसाठी कर्नाटक सरकारने पायघड्या अंथरल्या आहेत. त्याची दखल घेत युती सरकारच्या पाठीशी राहिलेल्या उद्योजकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी २९ डिसेंबर २०१४ रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात बैठक घेतली. यावेळी त्यांनी उद्योजकांना ‘सरकारवर विश्वास ठेवा, स्थलांतरणाचा विचार सोडा,’ असे आवाहन केले. त्यानंतर आता सरकारची वर्षपूर्ती झाली तरी, उद्योग क्षेत्राबाबत ठोस अशी काहीच कार्यवाही झालेली नाही. वाढीव वीज दरवाढ कमी व्हावी, भूखंड मिळावेत, टोल हटवावा, बी-टेन्युअरचा प्रश्न सोडवावा, ईएसआयसी रुग्णालय सुरू करावे, अशा मागण्यांच्या पूर्ततेच्या प्रतीक्षेत अजूनही उद्योजक आहेत.वीजदराबाबतचा ‘शब्द’ पाळला नाही; उद्योजकांत नाराजीअवघे चार आणे कमी केलेवीज दरवाढ कमी करण्यासाठी सरकार बदलल्यावरदेखील कोल्हापुरातील उद्योजकांनी आंदोलन केले. त्याचे पडसाद राज्यात उमटले. त्याची दखल घेऊन सरकारने युनिटमागे अवघे चार आणे कमी केले. इतर राज्यांप्रमाणे दर ठेवण्याची कार्यवाही सरकारकडून झाली नाही. उद्योजकांना दिलेला शब्द सरकारला पाळता आला नसल्याची प्रतिक्रिया उद्योजक उदय दुधाणे यांनी दिली. ते म्हणाले, एकीकडे वीजदर चार आण्यांनी कमी केला आणि दुसरीकडे एका अश्वशक्तीला मॅक्झिमम डिमांड चार्जेस (एमडीसी) ३० रुपयांनी वाढविला आहे. त्यामुळे दर कमी करणे केवळ नावापुरते झाले.