शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

धर्मनिरपेक्षता संकल्पनेबाबत चुकीचा प्रचार--अवि पानसरे व्याख्यानमाला

By admin | Updated: December 9, 2014 23:54 IST

झहीर अली : धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व हा भारतीय लोकशाहीचा आत्मा

कोल्हापूर : धर्मनिरपेक्षता ही संकल्पना कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. विशिष्ट घटकांकडून धर्मनिरपेक्षता या संकल्पनेबाबत चुकीचा प्रचार केला जात आहे. भारत हा विविध जाती-धर्माचा देश असल्यामुळे धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे धर्मावर आधारित राष्ट्रनिर्मितीचा प्रयत्न झाल्यास या देशातील जनता स्वस्थ बसणार नाही. कारण धर्मनिरपेक्षतेमुळेच भारताची अखंडता टिकली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक झहीर अली यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने येथील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेत ते बोलत होते. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार होते. अली म्हणाले, भारतीय घटनेचे स्वरूप समाजवादी लोकशाहीचे आहे. भारताने १९५० मध्ये स्वीकारलेल्या घटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द नमूद केला नसला तरी तिचा आत्मा हा धर्मनिरपेक्षतावादी होता. सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या घटकांना घटनेने बंदी घातली असली तरी, एखाद्या धर्माच्या आचार-विचारांमध्ये घटनेने हस्तक्षेप केलेला नाही. देशात अनेक ठिकाणी मंदिरे ही पब्लिक बजेटतून बांधली आहेत. मंदिरांसाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांत अनेक धर्मियांचाही पैसा असतो अशावेळी घटनेने कधी हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे घटनेतील धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व कोणत्याही धर्माच्या आचरणामध्ये हस्तक्षेप करते, असे म्हणणे हा अप्प्रचार आहे. या देशातील सर्वसामान्य जनता ही धार्मिक आहे. त्यांच्या धार्मिकतेचा आदर घटनाकारांनी केला आहे. विशिष्ट जात, धर्म, वंश, प्रांत आणि भाषा यांचा पुरस्कार न करता देशाची अखंडता टिकवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. धर्माच्या आधारावर या देशाची अखंडता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास, आपण संघर्षासाठी तयार राहिले पाहिजे. भाजपच्या भांडवलधार्जिण्या आणि फसव्या आश्वासनांवर टीका करताना अली म्हणाले, भांडवलदारांना आणि मध्यमवर्गीयांना हाताशी धरून गोबेल्स पद्धतीच्या प्रचाराने लोकसभा निवडणूक जिंकली आहे. सत्तेवर येताच १०० दिवसांत काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. शंभर दिवस संपून सहा महिने होत आले, तरी काळा पैसा परत आणलेला नाही. देशाचा विकास हा सामाजिक दृष्टिकोनातून व्हायला हवा. त्यातून रोजगारनिर्मिती व्हायला हवी, यंत्राचा वापर वाढवून उच्चशिक्षितांनाच नोकऱ्या देऊन गोरगरिबांना रोजगारच न देण्याचे षङ्यंत्र सुरू आहे. सेझ, माध्यमे आणि मध्यमवर्गीयांच्या आडून भांडवलशाहीच्या पाठिंब्यावरची लोकशाही या सरकारला उभी करायची आहे. जनतेचा सहभाग केवळ मतदानापुरता राहिला आहे, हे आपण ओळखले पाहिजे, असे मतही अली यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात श्रीराम पवार म्हणाले, धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याआड राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांचे थोतांड धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांनी उघड केले पाहिजे.