शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

वळवाचा तडाखा नुकसानदायी

By admin | Updated: May 10, 2014 20:27 IST

राधानगरी : एप्रिल - मेच्या उकाड्याने हैरान झाल्यावर एखादा वळीव पाऊस व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. जेणेकरून उष्णता कमी होऊन उन्हास सुस‘ होतो. यावर्षी वळीव पावसाने मात्र माणसांचे जगणे अस‘ केले आहे. गारपीट, वादळाचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसाचे वातावरण पाहता हा पाऊस वळवाचा की मृगाचा असा प्रश्न पडतो. जणू महिनाभर अगोदर मृग नक्षत्र सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.

राधानगरी : एप्रिल - मेच्या उकाड्याने हैरान झाल्यावर एखादा वळीव पाऊस व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. जेणेकरून उष्णता कमी होऊन उन्हास सुस‘ होतो. यावर्षी वळीव पावसाने मात्र माणसांचे जगणे अस‘ केले आहे. गारपीट, वादळाचा तडाखा बसला आहे. गेल्या चार दिवसाचे वातावरण पाहता हा पाऊस वळवाचा की मृगाचा असा प्रश्न पडतो. जणू महिनाभर अगोदर मृग नक्षत्र सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.गेल्या दीड -दोन महिन्यापासून राज्याच्या काही भागात गारपीटीसह वादळ व पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पीकांसह घरांचेही प्रचंड नुकसान झाले. एरवी हंगामात एक दोन वेळा होणारा वळीव पाऊस सर्वांनाच दिलासा देतो. वाढलेली उष्णता कमी करण्याचे काम हा पाऊस करतो. त्यामुळे थोडे फार नुकसान झाले तरी त्याची प्रतिक्षा केली जाते. यावर्षी प्रचंड गारपीट, वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. पावसाळ्यासातही पाऊस पडत नाही, अशा भागातही त्याचा कहर झाला. कोल्हापूर जिल्हा व आसपासचा भाग निसर्गाच्या कृपेमुळे भाग्यवान समजला जातो. पण या वर्षीच्या वळीवाने येथेही आपले उग्र रुप दाखविले आहे. मालमत्तांच्या मोठ्या नुकसानीबरोबर वीज कोसळून काहीना जीवही गमवावा लागला. गेल्या पंधरा दिवसात जिल्‘ाच्या कोणत्या ना कोणत्या भागात पावसाची हजेरी राहिली आहे. खरीपाच्या काढणीला आलेल्या भात, सोयाबीन, सुर्यफुल, भुईमुग अशा पिकाना याचा फटका बसत आहे. उन्हाळी हंगामात कलिंगड पिकाची लागवडी मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीच्या प्रतिकुल हवामानामुळे हे पीक यंदा शेतकर्‍यांच्या अंगलट आले आहे. दोन-तीन दिवसापासून विचित्र प्रकारचे हवामान सर्वत्र आहे. ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरण नाही. राहून राहून पावसाचा होणारा शिडकावा यामुळे मृग नक्षत्राचा अनुभव महिनाभर आदी येत आहे. शेतीसह सर्वच कामकाजाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अशा प्रकारचे हवामान पुर्वी कधीही पाहिले नसल्याचे ज्येष्ठ मंडळींकडून सांगितले जात आहे. प्रतिनिधी चौकटमार्चअखेर व निवडणुकीमुळे अडलेली रस्त्यांची कामे आता सर्वत्र सुरू आहेत. या रोजच्या पावसातही डांबरीकरण सुरू आहे. याचा डांबरावर होणारा विपरीत परिणाम पाहता अशा रस्त्यांच्या टिकण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.