शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा... कोल्हापूरचे शेतकरी आता चक्क गॅस पिकवणार सांबरे येथे शुक्रवारी भूमिपूजन : एक हजार टन गॅस निर्मिती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST

कोल्हापूर : अरे व्वा... कोल्हापूरचे शेतकरी आता चक्क गॅस पिकवणार आहेत. गवतापासून गॅस निर्मिताचा देशातील पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील ...

कोल्हापूर : अरे व्वा... कोल्हापूरचे शेतकरी आता चक्क गॅस पिकवणार आहेत. गवतापासून गॅस निर्मिताचा देशातील पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरीजवळील सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे होत आहे. त्याचे भूमिपूजन येत्या शुक्रवारी अक्षयतृतीयेला होणार आहे. शेतकऱ्यांकडून एक हजार रुपये टन या दराने हत्ती गवत खरेदी करून त्यापासून प्रतिदिन एक हजार टन गॅस निर्मिती करण्याचे नियोजन आहे. कोविड स्थिती आटोक्यात आली तर दि‌वाळीपासून अन्यथा २६ जानेवारी २०२२पासून कोणत्याही स्थितीत गॅस उत्पादन सुरु करण्याचे प्रयत्न आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील प्रकल्प येथे प्रत्यक्षात आकार घेणार आहे.

मुंबईच्या मीरा क्लिन फ्युएल्स (एमसीएल) या मुख्य कंपनीतर्फे प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये गडहिंग्लज फार्मर प्रोड्युसर कंपनी ही शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करण्यात येईल. त्यामार्फत गवत उत्पादन होईल. व्हेंचुरिक एनर्जी प्रा. कंपनीतर्फे प्रत्यक्ष गॅस उत्पादन करण्यात येईल. ग्रामीण भागात शेतकरी आता जनावरांचा ओला चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर हत्ती गवताचे उत्पादन घेत आहेत. त्यातील ‘सुपर नेपिअर’ म्हणून विकसित वाण यासाठी वापरण्यात येणार आहे. त्याचे बियाणे कंपनी पुरवणार आहे. या पिकाला फारसे कष्ट लागत नाहीत, खतेही फार लागत नाहीत. जमीन हलक्या प्रतीची असेल तरी चालते. अडीच महिन्यात एकरी ४० टन गवताचे उत्पादन होते. वर्षात ५ कंपन्या होतात. कंपनी एक हजार रुपये टन या दराने ते शेतकऱ्यांकडून विकत घेईल. वार्षिक १५० टन उत्पादन अपेक्षित धरले तरी दीड लाख रुपये शेतकऱ्याला मिळतील.

तालुकास्तरावर अडीच हजार रोजगार

प्रत्यक्ष कारखान्यात दीड हजार आणि फिल्डवर एक हजार कर्मचारी या तालुकास्तरावरील प्रकल्पासाठी लागणार आहेत. त्यामुळे एका तालुक्यातील अडीच हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.

८८ गॅस पंप

महाराष्ट्रात आता ८८ सीएनजी गॅस पंप मंजूर झाले आहेत. त्यांना या प्रकल्पातून गॅस पुरवठा करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून सीएनजी, पीएनजी व बायो फर्टिलायझर अशी उत्पादने घेतली जाणार आहेत.

सध्या भारत दैनंदिन इंधन ८२ टक्के आयात करतो. त्यामध्ये ४० टक्के एलपीजी गॅस असतो. या प्रकल्पामध्ये आम्ही शेतकऱ्यालाच गॅस उत्पादन करायला शिकवणार आहोत. पर्यावरण रक्षण, कॅन्सरमुक्त शेतीकडे नेणारा व इंधनामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवणारा हा प्रकल्प आहे.

- सुधीर फडके

मुख्य प्रवर्तक

व्हेंचुरिक एनर्जी प्रा. लिमिटेड

फोटो : ०८०५२०२१-कोल-गॅस प्रोजेक्ट (पीडीएफ आहे)