शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

‘वर्ल्डकप’चा फिव्हर काही केल्या चढेनाच !

By admin | Updated: February 10, 2015 00:37 IST

टष्ट्वेंटी-२०सारख्या स्पर्धांमुळे क्रिकेटचा फिव्हर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान कुठेही दिसत नाही.

कोल्हापूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, सबकुछ क्रिकेट समजल्या जाणाऱ्या देशात अजूनही ‘क्रिकेटचा फिव्हर’ जाणवेनाच झाला आहे. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही. गतवेळेचा विश्वविजेत्या असणाऱ्या भारतीय संघाच्या समर्थनात कोठेही चिअरअप करण्यासाठी ना पोस्टरबाजी, ना रॅली काढण्यात आली आहे. याशिवाय जाहिरातींमधूनही भारतीय क्रिकेटपटूंना मोठे स्थान दिल्याचे जाणवत नाही. गतवेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर शेवटचा विश्वचषक खेळणार होता म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय संघ कोण-कोणत्या संघांना हरवून अंतिम फेरी गाठतो की अन्य स्थानावरच राहतो याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, यंदा असा हुकमी एक्का भारतीय संघात नसल्याने व टष्ट्वेंटी-२०सारख्या स्पर्धांमुळे क्रिकेटचा फिव्हर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान कुठेही दिसत नाही. जखमी खेळाडूंना घेऊन यंदाची विश्वचषक स्पर्धा आपला संघ खेळणार आहे. यासह अन्य कारणांमुळे यंदा विश्वचषक क्रिकेटचा फिव्हर दिसेनासा झाला आहे.- बाळू पसारे,माजी क्रिकेटपटू बाऊन्सी खेळपट्टीमुळे भारतीय फलंदाजी न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियात चालणे कठीण आहे. याशिवाय नवोदित संघाची कामगिरी गेल्या तीन महिन्यांत सर्वांनाच दिसली आहे. अतिक्रिकेट आणि टीव्हीवरील अतिदर्शनही विश्वचषकाचा फिव्हर कमी करण्यास कारणीभूत आहे.रमेश कदम, माजी रणजीपटूअलिकडील मालिकेतील कामगिरीमुळे चाहत्यांचा संघावरील विश्वास उडाला आहे. त्यात सचिन तेंडुलकर खेळत नसल्यामुळे काहींनी पाठ फिरविली आहे. पण जस जसी स्पर्धा पुढे सरकेल तसे आकर्षण वाढेल. - सुधर्म वाझे,माजी क्रिकेटपटूभारतीय क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या सुविधा आणि टीव्हीच्या ग्लॅमरमुळे क्रिकेटपटूंचे किंवा एकूणच क्रिकेटमधील नावीन्य कमी झाले आहे. याशिवाय यंदा सचिन संघात नाही. त्यामुळे यंदा वर्ल्ड कपचा फिव्हर दिसेनासा झाला आहे.- नंदकुमार बामणे, माजी क्रिकेटपटू