शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

‘दौलत’ विक्रीला कामगारांचा पाठिंबा

By admin | Updated: August 8, 2015 00:43 IST

हक्क शाबूत ठेवण्याची मागणी : कारखाना विक्री करू नये : रवींद्र पाटील

चंदगड : दौलत कारखान्याच्या विक्रीला किंवा चालवायला येणाऱ्या कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका कामगारांनी घेतली. थकीत कर्जापोटी हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखान्याची विक्री करण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली आहे. निविदाही प्रसिद्धीस दिल्या आहेत. या प्रश्नावर विचार करण्यासाठी शुक्रवारी कामगार संघटनेची बैठक हलकर्णी (ता. चंदगड) येथील गणेश मंदिरात आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.हणमंत पाटील यांनी स्वागत करून कामगारांची आजची स्थिती कथन करून ‘दौलत’ची विक्री झाल्यास काय करावे लागेल याबाबत चर्चा करावी, असे आवाहन केले.यावेळी दौलत कारखाना चार हंगाम बंद असल्याने मशिनरी गंजल्या आहेत. काही पार्ट चोरीला गेले आहेत. त्यामुळे या हंगामात ‘दौलत’ सुरू झाला नाही, तर पुन्हा कधीच सुरू होणार नाही. यासाठी कामगारांचे हक्क शाबूत ठेवून मागील देण्याविषयी जी कंपनी चांगला निर्णय घेईल त्याला पाठिंबा देण्याचा ठराव करण्यात आला.यावेळी ‘सिटू’चे प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी कामगारांच्या मागील येण्यासंदर्भात जिल्हा बँकेला निवेदन द्यावे लागणार आहे. यासाठी एक समिती स्थापन करावी लागणार आहे, असे सांगितले.अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी ‘दौलत’ची वाताहत करण्यात नरसिंगराव पाटील व गोपाळराव पाटील यांचाच हात आहे. ‘दौलत’ राजकारणाचा अड्डा बनविल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगार आर्थिक अडचणीत आले. शेतकरी भिकेला लागले. त्यामुळे कामगार, शेतकरी यांच्या हितासाठी जर जिल्हा बँकेने योग्य निर्णय घेतल्यास त्यांना पाठिंबा देऊ, असे सांगितले.यावेळी प्रभाकर खांडेकर, जे. जी. पाटील, प्रदीप पवार, केराप्पा पाटील, एस. आर. पाटील, शिवाजी घोळसे, पांडुरंग पाष्टे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.बाबू फगरे, नामदेव कुट्रे, रमेश नाकाडी, गावडू पाटील, नामदेव फाटक, सुरेश सावंत-भोसले, देमाणा पाटील, अनंत पाटील, चंद्रकांत तांबे, मल्लाप्पा केसरकर, धोंडीबा बळजकर, रामचंद्र सांबरेकर, संजय गावडे, मारुती नागुर्डेकर, कॉ. अण्णा शिंदे, विष्णू कडोळकर, राजू पाटील,अर्जुन कुंभार, कामगार उपस्थित होते. कारखाना विक्रीला ‘शेकाप’चा विरोधदरम्यान, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ‘दौलत’ विक्रीच्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष गडहिंग्लज जिल्हा न्यायालयात जिल्हा बँकेविरोधात आव्हान देणार असल्याची माहिती ‘शेकाप’चे जिल्हा संघटक रवींद्र पाटील यांनी दिली. ते म्हणाले, २२० कोटी रुपयाला दौलत विक्री केल्यास यामध्ये जिल्हा बँक, एनसीडीसी, सह्याद्री, नवहिंद पतसंस्था व इतर बँका यांचीच कर्जे फेडली जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूकदार यांना काहीच मिळणार नाही. बाजारभावाप्रमाणे अंदाजे ५०० कोटींची ‘दौलत’ची मालमत्ता असताना कवडीमोल किमतीला ही मालमत्ता विक्री करायला शेकाप व सभासद संघटना देणार नाही.