शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्यटन’ माहिती केंद्राचे काम रिसॉर्ट बुकिंगपुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:08 IST

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी एकीकडे नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात असताना शासनाचे पर्यटन विकास महामंडळ मात्र पिछाडीवर आहे. सुटीच्या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरचे पर्यटन घडविण्यासाठी कार्यालयातून व अंबाबाई मंदिराच्या परिसरातील माहिती केंद्रातून पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वाटप आणि रिसॉर्ट बुकिंगपुरतेच या महामंडळाचे कार्य मर्यादित राहिले आहे.धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी एकीकडे नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात असताना शासनाचे पर्यटन विकास महामंडळ मात्र पिछाडीवर आहे. सुटीच्या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरचे पर्यटन घडविण्यासाठी कार्यालयातून व अंबाबाई मंदिराच्या परिसरातील माहिती केंद्रातून पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वाटप आणि रिसॉर्ट बुकिंगपुरतेच या महामंडळाचे कार्य मर्यादित राहिले आहे.धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आणि निसर्गाचे वरदान लाभलेले कोल्हापूर म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम ठिकाण. अंबाबाई आणि जोतिबा या मंदिरांची ख्याती जगभर पोहोचल्याने कोल्हापूरला येणाºया भाविकांची संख्या वर्षागणिक वाढली आहे. कोल्हापूरला वर्षाकाठी किमान ५० लाख भाविक भेट देतात. येथे आलेल्या भाविकांचे पर्यटकांत रूपांतर व्हावे, त्यांनी केवळ देवीचे दर्शन घेऊन न परतता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहावीत, दोन-तीन दिवस वास्तव्य करावे आणि पर्यायाने कोल्हापूरची पर्यटनवृद्धी व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्वत: पुढाकार घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ ही सहल उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहे.एकीकडे हे प्रयत्न होत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात पर्यटनवृद्धीची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने कांहीही केले जात नसल्याचे उदासवाणे चित्र आहे. कोल्हापुरातील उद्योग भवनच्या इमारतीत पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय आहे; पण सर्वांत जास्त भाविकांची संख्या अंबाबाई मंदिर परिसरातच असल्याने येथे २०१६ च्या नवरात्रौत्सवात पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यात आले. येथे येणाºया भाविकांना या माहिती केंद्रातर्फे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती असलेले माहितीपत्रक दिले जाते. ज्यांची इच्छा असेल त्यांना महामंडळाच्या रिसॉर्टचे बुकिंग करून दिले जाते. एवढेच काय ते महामंडळाचे आणि माहिती केंद्राचे काम! कोल्हापुरातील पर्यटन स्थळांचीही माहिती येथून दिली जाते; पण शहरातून त्या ठिकाणी कसे जायचे, वाहतुकीची सोय कशी आहे, माफक दरांत निवासासह हॉटेल, खाद्यपदार्थांची उपलब्धता, खरेदीची योग्य ठिकाणे यांबाबत पर्यटकांना काहीच माहिती नसते.तशी कोणतीही सोय पर्यटन विकास महामंडळाकडून केलीजात नाही. त्यामुळे फार-फार तर न्यू पॅलेस, रंकाळासारखी जवळची ठिकाणे पाहून भाविक परतीच्या प्रवासाला लागतात.स्थानिक नागरिकांकडून बुकिंगया माहिती केंद्राचा सर्वाधिक उपयोग स्थानिक नागरिकांना होतो. त्यांना सुटीच्या कालावधीत पर्यटनाला जायचे असेल तर ते या केंद्रातून माहिती पुस्तिका नेतात आणि रिसॉर्टचे बुकिंग करतात. अशा रीतीने गेल्या वर्षभरात केंद्रातर्फे १०० ते १२५ स्थानिक नागरिकांनी रिसॉर्टचे बुकिंग केले आहे.बससेवा बंद : वास्तविक कोल्हापूरला पर्यटकांची मोठी पसंती मिळत असल्याने पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना अधिक सोईसुविधा देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास पर्यटनस्थळांपर्यंत नेऊन परत आणण्यासाठी विशेष बससेवा सुरू करणे गरजेचे आहे. दहा वर्षांपूर्वी भवानी मंडपातून अशी बससेवा दिली जात होती. मात्र ती बंद करण्यात आली.