शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

‘पर्यटन’ माहिती केंद्राचे काम रिसॉर्ट बुकिंगपुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:08 IST

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी एकीकडे नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात असताना शासनाचे पर्यटन विकास महामंडळ मात्र पिछाडीवर आहे. सुटीच्या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरचे पर्यटन घडविण्यासाठी कार्यालयातून व अंबाबाई मंदिराच्या परिसरातील माहिती केंद्रातून पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वाटप आणि रिसॉर्ट बुकिंगपुरतेच या महामंडळाचे कार्य मर्यादित राहिले आहे.धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी एकीकडे नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात असताना शासनाचे पर्यटन विकास महामंडळ मात्र पिछाडीवर आहे. सुटीच्या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरचे पर्यटन घडविण्यासाठी कार्यालयातून व अंबाबाई मंदिराच्या परिसरातील माहिती केंद्रातून पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वाटप आणि रिसॉर्ट बुकिंगपुरतेच या महामंडळाचे कार्य मर्यादित राहिले आहे.धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आणि निसर्गाचे वरदान लाभलेले कोल्हापूर म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम ठिकाण. अंबाबाई आणि जोतिबा या मंदिरांची ख्याती जगभर पोहोचल्याने कोल्हापूरला येणाºया भाविकांची संख्या वर्षागणिक वाढली आहे. कोल्हापूरला वर्षाकाठी किमान ५० लाख भाविक भेट देतात. येथे आलेल्या भाविकांचे पर्यटकांत रूपांतर व्हावे, त्यांनी केवळ देवीचे दर्शन घेऊन न परतता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहावीत, दोन-तीन दिवस वास्तव्य करावे आणि पर्यायाने कोल्हापूरची पर्यटनवृद्धी व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्वत: पुढाकार घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ ही सहल उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहे.एकीकडे हे प्रयत्न होत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात पर्यटनवृद्धीची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने कांहीही केले जात नसल्याचे उदासवाणे चित्र आहे. कोल्हापुरातील उद्योग भवनच्या इमारतीत पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय आहे; पण सर्वांत जास्त भाविकांची संख्या अंबाबाई मंदिर परिसरातच असल्याने येथे २०१६ च्या नवरात्रौत्सवात पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यात आले. येथे येणाºया भाविकांना या माहिती केंद्रातर्फे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती असलेले माहितीपत्रक दिले जाते. ज्यांची इच्छा असेल त्यांना महामंडळाच्या रिसॉर्टचे बुकिंग करून दिले जाते. एवढेच काय ते महामंडळाचे आणि माहिती केंद्राचे काम! कोल्हापुरातील पर्यटन स्थळांचीही माहिती येथून दिली जाते; पण शहरातून त्या ठिकाणी कसे जायचे, वाहतुकीची सोय कशी आहे, माफक दरांत निवासासह हॉटेल, खाद्यपदार्थांची उपलब्धता, खरेदीची योग्य ठिकाणे यांबाबत पर्यटकांना काहीच माहिती नसते.तशी कोणतीही सोय पर्यटन विकास महामंडळाकडून केलीजात नाही. त्यामुळे फार-फार तर न्यू पॅलेस, रंकाळासारखी जवळची ठिकाणे पाहून भाविक परतीच्या प्रवासाला लागतात.स्थानिक नागरिकांकडून बुकिंगया माहिती केंद्राचा सर्वाधिक उपयोग स्थानिक नागरिकांना होतो. त्यांना सुटीच्या कालावधीत पर्यटनाला जायचे असेल तर ते या केंद्रातून माहिती पुस्तिका नेतात आणि रिसॉर्टचे बुकिंग करतात. अशा रीतीने गेल्या वर्षभरात केंद्रातर्फे १०० ते १२५ स्थानिक नागरिकांनी रिसॉर्टचे बुकिंग केले आहे.बससेवा बंद : वास्तविक कोल्हापूरला पर्यटकांची मोठी पसंती मिळत असल्याने पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना अधिक सोईसुविधा देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास पर्यटनस्थळांपर्यंत नेऊन परत आणण्यासाठी विशेष बससेवा सुरू करणे गरजेचे आहे. दहा वर्षांपूर्वी भवानी मंडपातून अशी बससेवा दिली जात होती. मात्र ती बंद करण्यात आली.