शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘पर्यटन’ माहिती केंद्राचे काम रिसॉर्ट बुकिंगपुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:08 IST

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी एकीकडे नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात असताना शासनाचे पर्यटन विकास महामंडळ मात्र पिछाडीवर आहे. सुटीच्या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरचे पर्यटन घडविण्यासाठी कार्यालयातून व अंबाबाई मंदिराच्या परिसरातील माहिती केंद्रातून पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वाटप आणि रिसॉर्ट बुकिंगपुरतेच या महामंडळाचे कार्य मर्यादित राहिले आहे.धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी एकीकडे नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात असताना शासनाचे पर्यटन विकास महामंडळ मात्र पिछाडीवर आहे. सुटीच्या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरचे पर्यटन घडविण्यासाठी कार्यालयातून व अंबाबाई मंदिराच्या परिसरातील माहिती केंद्रातून पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वाटप आणि रिसॉर्ट बुकिंगपुरतेच या महामंडळाचे कार्य मर्यादित राहिले आहे.धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आणि निसर्गाचे वरदान लाभलेले कोल्हापूर म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम ठिकाण. अंबाबाई आणि जोतिबा या मंदिरांची ख्याती जगभर पोहोचल्याने कोल्हापूरला येणाºया भाविकांची संख्या वर्षागणिक वाढली आहे. कोल्हापूरला वर्षाकाठी किमान ५० लाख भाविक भेट देतात. येथे आलेल्या भाविकांचे पर्यटकांत रूपांतर व्हावे, त्यांनी केवळ देवीचे दर्शन घेऊन न परतता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहावीत, दोन-तीन दिवस वास्तव्य करावे आणि पर्यायाने कोल्हापूरची पर्यटनवृद्धी व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्वत: पुढाकार घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ ही सहल उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहे.एकीकडे हे प्रयत्न होत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात पर्यटनवृद्धीची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने कांहीही केले जात नसल्याचे उदासवाणे चित्र आहे. कोल्हापुरातील उद्योग भवनच्या इमारतीत पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय आहे; पण सर्वांत जास्त भाविकांची संख्या अंबाबाई मंदिर परिसरातच असल्याने येथे २०१६ च्या नवरात्रौत्सवात पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यात आले. येथे येणाºया भाविकांना या माहिती केंद्रातर्फे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती असलेले माहितीपत्रक दिले जाते. ज्यांची इच्छा असेल त्यांना महामंडळाच्या रिसॉर्टचे बुकिंग करून दिले जाते. एवढेच काय ते महामंडळाचे आणि माहिती केंद्राचे काम! कोल्हापुरातील पर्यटन स्थळांचीही माहिती येथून दिली जाते; पण शहरातून त्या ठिकाणी कसे जायचे, वाहतुकीची सोय कशी आहे, माफक दरांत निवासासह हॉटेल, खाद्यपदार्थांची उपलब्धता, खरेदीची योग्य ठिकाणे यांबाबत पर्यटकांना काहीच माहिती नसते.तशी कोणतीही सोय पर्यटन विकास महामंडळाकडून केलीजात नाही. त्यामुळे फार-फार तर न्यू पॅलेस, रंकाळासारखी जवळची ठिकाणे पाहून भाविक परतीच्या प्रवासाला लागतात.स्थानिक नागरिकांकडून बुकिंगया माहिती केंद्राचा सर्वाधिक उपयोग स्थानिक नागरिकांना होतो. त्यांना सुटीच्या कालावधीत पर्यटनाला जायचे असेल तर ते या केंद्रातून माहिती पुस्तिका नेतात आणि रिसॉर्टचे बुकिंग करतात. अशा रीतीने गेल्या वर्षभरात केंद्रातर्फे १०० ते १२५ स्थानिक नागरिकांनी रिसॉर्टचे बुकिंग केले आहे.बससेवा बंद : वास्तविक कोल्हापूरला पर्यटकांची मोठी पसंती मिळत असल्याने पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना अधिक सोईसुविधा देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास पर्यटनस्थळांपर्यंत नेऊन परत आणण्यासाठी विशेष बससेवा सुरू करणे गरजेचे आहे. दहा वर्षांपूर्वी भवानी मंडपातून अशी बससेवा दिली जात होती. मात्र ती बंद करण्यात आली.