शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

सयाजीराव गायकवाड यांचे कार्य दुर्लक्षित

By admin | Updated: January 12, 2017 01:17 IST

बाबा भांड : देशातील इतिहासकारांकडून बडोदा नरेशांवर अन्याय झाल्याची व्यक्त केली खंत

कोल्हापूर : साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, प्रशासन, सामाजिक सुधारणेला प्राधान्य देत स्वातंत्र्यलढ्याला बळ देणाऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कार्य इतिहासकारांकडून दुर्लक्षिले गेले, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी व्यक्त केले. येथील करवीरनगर वाचन मंदिरातर्फे आयोजित ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्काराचे मराठीतील प्रथम मानकरी ‘पद्मभूषण’ कै. वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर स्मृती व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव गायकवाड महाराज (बडोदा) आणि राजर्षी शाहू छत्रपती’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाभाऊ जोशी होते. महापौर हसिना फरास यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. भांड म्हणाले, शिक्षण हा एकमेव परिवर्तन व प्रगतीचा मार्ग आहे हे ओळखून सयाजीराव गायकवाड यांनी सन १८९२मध्ये सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. शिक्षण, उद्योग व विज्ञानाची कास ही विकासाची मुख्य साधने आहेत याची जाण असलेल्या गायकवाड यांनी लेखन, वाचन, ग्रंथालयाची साखळी सुरू केली. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रत्येक गावात ग्रामपंचायती स्थापन केल्या. या काळात ७५ हजारांहून अधिक कायदे त्यांनी केले. पंगती भेद दूर करण्यासाठी सर्व लोकांत ते मिसळत असत. महाराष्ट्रातील सर्व धर्म, जातीच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. बहुजनांची माणसे शिकली पाहिजेत यासाठी समाजशिक्षणाचे मोठे कार्य त्यांनी सुरू केले. सहकाराचे महत्त्व त्या काळी त्यांनी ओळखले व आशिया खंडातील पहिली सहकारी पेढी व साखर कारखाना सुरू केला. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांना मदत केली. अशा सामाजिक कार्याबरोबरच ८१७ ग्रंथांच्या प्रकाशनासाठी त्यांनी मदत केली. जनकल्याणासाठी झटणारा हा विचारवंत राजा आणि राजर्षी शाहू महाराज यांचे कार्यकर्तृत्व अफाट आहे. दोन्ही राजांनीही समाजक्रांती घडवून आणली; परंतु बडोदा संस्थान गुजरातमध्ये गेल्याने असेल वा इतिहास दुर्लक्षित राहिल्याने असेल गायकवाड यांचे कार्य शाहू, फुले, आंबेडकर यांच्या रांगेत घेतले गेले नाही हे दुर्दैव. ग्रंथपाल मनीषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी स्वागत केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उदय सांगवडेकर यांनी आभार मानले.