शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पुणे विद्यापीठातच काम करणार

By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST

पवार : अन्य विद्यापीठांमध्ये कुलगुरूपदी कार्यरत होण्याच्या चर्चेला पूर्णविराम

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील कार्यकाल संपल्यानंतर पुणे विद्यापीठातील माझ्या भूगर्भशास्त्र विभागात पुन्हा प्राध्यापक म्हणून काम करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शिवाय राज्यातील अन्य विद्यापीठांमध्ये कुलगुरू म्हणून कार्यरत राहण्याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पस्मध्ये सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.कुलगुरू डॉ. पवार यांचा विद्यापीठातील कार्यकाल २५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी कुलपती कार्यालयाला पत्राद्वारे कळविली आहे. त्यानुसार कुलगुरू निवडीची प्रक्रिया कुलपती कार्यालयाकडून सुरू झाली आहे. मात्र, ही प्रक्रिया संथपणे सुरू आहे. डॉ. पवार यांचा कार्यकाल संपण्यासाठी अवधी बाकी असतानाच विद्यापीठाच्या कॅम्पस्सह संलग्नित महाविद्यालयांच्या वर्तुळात ते केंद्रीय विद्यापीठ, मुंबई, पुणे विद्यापीठात कुलगुरू अथवा भूगर्भशास्त्राशी संबंधित राष्ट्रीय संशोधन संस्थेत संचालकपदी कार्यरत राहणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ. पवार म्हणाले, पाच वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर येथील संशोधनाला चालना देणे आणि ‘नॅक’चे अव्वल मानांकन मिळविणे ही ध्येय बाळगली. सर्वांच्या सहकार्याने ती साध्यदेखील केली. विद्यापीठातील माझा कुलगुरूपदाचा कार्यभार दोन आठवड्यांनी संपणार आहे. अन्य संस्थेमध्ये कुलगुरू अथवा संचालक म्हणून काम करण्याचा निर्णय मी अजून घेतलेला नाही. भूगर्भशास्त्रात संशोधन करण्याचे मी ठरविले आहे. त्यानुसार या महिन्याच्या अखेरीस अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागात रूजू होईन. त्यानंतर चांगली संधी मिळाल्यास अन्य पर्यायांचा विचार करणार आहे. (प्रतिनिधी)अन्य लाभांसाठी मूळ पदावर येणे गरजेचे...विद्यापीठ, महाविद्यालय पातळीवर मूळ पद कायम ठेवून ठरावीक कालावधीसाठी एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रशासनातील पदावर काम करण्याच्या प्रक्रिया म्हणजे ‘लीन’. त्यानुसार डॉ. पवार हे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कार्यरत राहिले. संबंधित पदाची मुदत संपल्यानंतर मूळ पदावर रूजू होणे आवश्यक असते. त्यामुळे निवृत्तिवेतन आदी लाभ मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत होते. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे आपला कार्यकाल संपण्यापूर्वी केंद्रीय विद्यापीठ राजस्थानमध्ये रूजू झाले.मूळ पदावर रूजू होण्यापूर्वीच ते याठिकाणी गेल्याने त्यांना निवृत्तिवेतन तसेच अन्य लाभांबाबत अडचणी निर्माण झाल्या. हे लक्षात घेवून डॉ. पवार यांनी पहिल्यांदा मूळ पदावर रूजू होण्याचे ठरविले असल्याचे समजते.