शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

‘ना-हरकत’विना पुलाचे काम रेंगाळले

By admin | Updated: October 1, 2015 00:58 IST

केंद्र-राज्याकडे प्रस्ताव पडून : महामार्ग प्रशासनाकडून ‘पुरातत्त्व’कडे पाठपुरावा; पंचगंगेवरील शिवाजी पुलाला पर्याय; अडीच वर्षे काम सुरू

कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला पर्यायी असलेल्या नवीन पुलाचे काम अडीच वर्षांपासून सुरू आहे. पुरातत्त्व विभागाकडून ‘ना हरकत’ दाखला मिळाला नसल्यामुळे काम पूर्ण होण्यात अडचण आली आहे. हा दाखला मिळविण्यासाठी येथील राष्ट्रीय महामार्ग (विभाग क्रमांक सात) प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. केंद्र आणि राज्य स्तरांवरील पुरातत्त्व प्रशासनाकडे ना-हरकतीसाठी प्रस्तावाचा प्रवास सुरू असल्यामुळे विलंब होत आहे. परिणामी काम रेंगाळले आहे.शहरातील पंचगंगा नदीवर शंभर वर्षांपूर्वी शिवाजी पूल बांधण्यात आला. तो केवळ सहा मीटर रुंद आहे. पुरातत्त्व वास्तूंत त्याचा समावेश आहे. कोल्हापूर-रत्नागिरी प्रमुख मार्गावर हा पूल असल्यामुळे वाहतूक प्रचंड वाढली आहे. पुलावर दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर चालकांना कसरत करावी लागते. यामुळे आणि पुलाला शंभर वर्षे पूर्ण होऊन गेल्याने ३० मार्च २०१२ रोजी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाकडून नवीन पर्यायी पुलासाठी १३ कोटी ४ हजार रुपये मंजूर झाले. १३४.८० मीटर लांबीचा आणि १४.८० मीटर रुंदीचा हा पूल मंजूर झाला. मात्र, कामाला त्वरित सुरुवात न झाल्याने मूल्यांकन वाढले. परिणामी १३ मार्च २०१३ रोजी पुलाच्या कामाच्या वाढीव १५ कोटी ७४ लाख रुपये आराखड्यास मंजुरी मिळाली.बंका कन्स्ट्रक्शनने कामाचा ठेका घेतला. १२ सप्टेंबर २०१३ रोजी प्रत्यक्ष पुलाच्या कामाला प्रारंभ झाला. कोल्हापूरच्या बाजूकडील ब्रह्मपुरी परिसरात पुलाचा काही भाग येतो. हा परिसर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. त्या परिसरात १३ मोठी झाडे आहेत. काम करण्यासाठी ती तोडावी लागणार आहेत. महामार्ग प्रशासनाकडून वृक्षतोडीची परवानगी महानगरपालिकेकडे २८ मार्च २०१३ रोजी मागितली. त्यानंतर वृक्षतोडीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर गेला. त्यावेळी सहायक नगरचना आणि पुरातत्त्व विभागाचा ‘ना-हरकत दाखला’ लागणार असल्याचे समोर आले. सहायक नगररचना विभागाकडून ना-हरकत दाखला त्वरित मिळाला; पण पुरातत्त्व विभागाकडून अद्याप मिळालेला नाही. सध्या पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. ‘ना-हरकत’ नसल्याने झाडे तोडता येत नाहीत. झाडे न तोडल्यामुळे उर्वरित ३० टक्के काम पूर्ण होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. वेळोवेळी पाठपुरावा केल्याने राज्याचे पुरातत्त्व विभागाचे अधिकारी रेंधे-पाटील यांनी २५ आॅगस्ट २०१५ रोजी पाहणी केली. वस्तुस्थितिजन्य अहवालासह ना-हरकतीचा प्रस्ताव त्यांनी राष्ट्रीय स्मारक समितीकडे दिला आहे. नागपूर येथे १० आॅक्टोबर २०१५ रोजी या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत ना-हरकतीसंबंधी चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)