शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

‘ना-हरकत’विना पुलाचे काम रेंगाळले

By admin | Updated: October 1, 2015 00:58 IST

केंद्र-राज्याकडे प्रस्ताव पडून : महामार्ग प्रशासनाकडून ‘पुरातत्त्व’कडे पाठपुरावा; पंचगंगेवरील शिवाजी पुलाला पर्याय; अडीच वर्षे काम सुरू

कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला पर्यायी असलेल्या नवीन पुलाचे काम अडीच वर्षांपासून सुरू आहे. पुरातत्त्व विभागाकडून ‘ना हरकत’ दाखला मिळाला नसल्यामुळे काम पूर्ण होण्यात अडचण आली आहे. हा दाखला मिळविण्यासाठी येथील राष्ट्रीय महामार्ग (विभाग क्रमांक सात) प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. केंद्र आणि राज्य स्तरांवरील पुरातत्त्व प्रशासनाकडे ना-हरकतीसाठी प्रस्तावाचा प्रवास सुरू असल्यामुळे विलंब होत आहे. परिणामी काम रेंगाळले आहे.शहरातील पंचगंगा नदीवर शंभर वर्षांपूर्वी शिवाजी पूल बांधण्यात आला. तो केवळ सहा मीटर रुंद आहे. पुरातत्त्व वास्तूंत त्याचा समावेश आहे. कोल्हापूर-रत्नागिरी प्रमुख मार्गावर हा पूल असल्यामुळे वाहतूक प्रचंड वाढली आहे. पुलावर दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर चालकांना कसरत करावी लागते. यामुळे आणि पुलाला शंभर वर्षे पूर्ण होऊन गेल्याने ३० मार्च २०१२ रोजी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाकडून नवीन पर्यायी पुलासाठी १३ कोटी ४ हजार रुपये मंजूर झाले. १३४.८० मीटर लांबीचा आणि १४.८० मीटर रुंदीचा हा पूल मंजूर झाला. मात्र, कामाला त्वरित सुरुवात न झाल्याने मूल्यांकन वाढले. परिणामी १३ मार्च २०१३ रोजी पुलाच्या कामाच्या वाढीव १५ कोटी ७४ लाख रुपये आराखड्यास मंजुरी मिळाली.बंका कन्स्ट्रक्शनने कामाचा ठेका घेतला. १२ सप्टेंबर २०१३ रोजी प्रत्यक्ष पुलाच्या कामाला प्रारंभ झाला. कोल्हापूरच्या बाजूकडील ब्रह्मपुरी परिसरात पुलाचा काही भाग येतो. हा परिसर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. त्या परिसरात १३ मोठी झाडे आहेत. काम करण्यासाठी ती तोडावी लागणार आहेत. महामार्ग प्रशासनाकडून वृक्षतोडीची परवानगी महानगरपालिकेकडे २८ मार्च २०१३ रोजी मागितली. त्यानंतर वृक्षतोडीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर गेला. त्यावेळी सहायक नगरचना आणि पुरातत्त्व विभागाचा ‘ना-हरकत दाखला’ लागणार असल्याचे समोर आले. सहायक नगररचना विभागाकडून ना-हरकत दाखला त्वरित मिळाला; पण पुरातत्त्व विभागाकडून अद्याप मिळालेला नाही. सध्या पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. ‘ना-हरकत’ नसल्याने झाडे तोडता येत नाहीत. झाडे न तोडल्यामुळे उर्वरित ३० टक्के काम पूर्ण होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. वेळोवेळी पाठपुरावा केल्याने राज्याचे पुरातत्त्व विभागाचे अधिकारी रेंधे-पाटील यांनी २५ आॅगस्ट २०१५ रोजी पाहणी केली. वस्तुस्थितिजन्य अहवालासह ना-हरकतीचा प्रस्ताव त्यांनी राष्ट्रीय स्मारक समितीकडे दिला आहे. नागपूर येथे १० आॅक्टोबर २०१५ रोजी या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत ना-हरकतीसंबंधी चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)