शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

यंत्रमाग कामगार शेतीच्या कामावर

By admin | Updated: August 14, 2015 00:05 IST

संपाचा फटका : गेल्या बावीस दिवसांपासून हजारो कामगार बेकार

गणपती कोळी -कुरुंदवाड  इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसाय गेल्या बावीस दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे हजारो कामगार बेकार झाले असून, हाताला काम मिळविण्यासाठी ग्रामीण भागाकडे वळत असून शेतामध्ये काम आहे का? अशी विचारणा करत शेतीच्या कामाला लागले आहेत. कामगार संपामुळे शहराची तसेच कामगारांची आर्थिक घडी विस्कटली असून, संप न ताणवता लवकर मिटविण्याची मागणी कामगार वर्गातूनच होत आहे.इचलकरंजी शहराला वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते. यंत्रमाग व्यवसायाला सर्वच पूरक व्यवसाय निर्माण झाल्याने जवळपासच्या खेड्यातूनही मोठ्या प्रमाणात यंत्रमाग झाले आहेत. कामगारांची संख्या वाढल्याने त्यांचे संघटन करून नेतृत्व करणारे नेतेही पुढे आले. प्रारंभी संप हा कामगार आणि मालक यांच्यापुरता मर्यादित राहून दोघांच्यामध्ये चांगले संबंध ठेवून कामगार नेतेही समन्वय चर्चा घडवून संप मिटवत असत. मात्र, अलीकडच्या काळात संपाला राजकीय वलय लागल्याने कामगार-मालक यांच्या हितापेक्षा स्वप्रतिष्ठा वाढल्याने कामगार-मालक यांच्यामध्ये कटुता निर्माण होत आहे.सायझिंगच्या कामगारांना किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या बावीस दिवसांपासून सायझिंग कामगार संपावर आहेत. त्यामुळे बीम तयार होत नसल्याने यंत्रमाग ठप्प झाला आहे. लूम्स, अ‍ॅटोलूम्स, सायझिंग, वार्पिंग, प्रोसेसिंग ही सर्व कारखानदारी एकमेकांवर अवलंबून असल्याने यातील एक घटक बंद पडला, की संपूर्ण यंत्रमागांचा खडखडाट थांबतो. या सर्व कारखान्यांतून सुमारे एक लाखापर्यंत कामगार वर्ग आहे. शिवाय कुरुंदवाड, टाकवडे, अब्दुललाट, शिरदवाड, आदी शहरांच्या परिसरातील यंत्रमाग थांबल्याने कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.मालकाविरुद्ध लढाई असल्याने रोजचा चरितार्थ चालविण्यासाठी अ‍ॅडव्हान्स रूपात रक्कम मागू शकत नाही. तसेच उलाढाल ठप्प झाल्याने यंत्रमाग व्यावसायिकही आर्थिक अडचणीत आहेत. या व्यवसायातील बहुतांश कामगारवर्ग कर्नाटकासह परराज्यातील आहेत. त्यामुळे अनेक कामगार गावाकडे परतत असले, तरी शिक्षणासाठी मुले असलेल्या कामगारांची गोची झाली आहे. एकूणच संपामुळे कामगारांची आर्थिक घडी विस्कटली असून, मालक आणि कामगारांच्या दोघांच्या हिताचा निर्णय घेऊन व्यवसाय चालू करून हाताला काम देण्याची मागणी कामगार वर्गातूनच होत आहे.तुटपुंजा पगाररोजचा चरितार्थ व शिक्षणाचा खर्च चालविण्यासाठी वस्त्रोद्योगातील कामगार आता ग्रामीण भागाकडे शेतीच्या कामाच्या शोधात लागले आहेत. शेतीच्या कामाची सवय नसतानाही घरचा चरितार्थ चालविण्यासाठी नाइलाजास्तव काम करणे भाग पडत आहे. मिळणारे तुटपुंजे पगार घेऊन घरी परतत असताना अनेक कामगारांचे डोळे पाणावत आहेत.