शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

रांगड्या कुस्ती निवेदनाचे ‘पावशतक’

By admin | Updated: January 12, 2017 22:10 IST

गावची यात्रा ते हिंदकेसरी स्पर्धा : दोनवडेच्या यशवंतअण्णांचा थक्क करणारा प्रवास

प्रकाश पाटील --कोपार्डे १९८०ला यवलूज (ता. पन्हाळा) येथील कुस्ती मैदानात यशवंत पाटील यांनी स्वत: कुस्ती केली आणि आपल्या दोनवडे (ता. करवीर) गावातील कुस्ती मैदानाची जाहिरात वाचण्यास माईक हातात घेतला अन् तेथूनच त्यांच्या कुस्ती मैदानातील निवेदनाचा प्रवास सुरू झाला. गावची यात्रा ते हिंदकेसरी स्पर्धेतील कुस्त्यांचे निवेदन त्यांनी केले. ‘हिंदकेसरी’ या चित्रपटातील दारासिंग व पै. हरी पाटील (महे) यांच्यात झालेल्या कुस्तीचे निवेदनही यशवंत पाटील यांनीच केले.मैदानात कुस्ती चालू असताना मल्ल एकमेकांवर कोणत्या डाव-प्रतिडावांचा वापर करतात याची माहिती आपल्या दमदार आवाजात ते सांगतात. अगदी पणजोबांपासून कुस्तीपरंपरा त्यांच्या घराण्यात असल्याचे ते आवर्जून सांगतात. आर्थिक अडचणींमुळे त्यांना स्वत:ला कुस्तीक्षेत्रात पैलवान म्हणून फार काम करता आले नाही; पण अनेक होतकरू मल्लांना त्यांनी पुढे आणले.आपल्या ‘कुस्ती निवेदक’ म्हणून सुरू झालेल्या प्रवासाची पाने उलगडताना त्यांनी सांगितलेली ही आठवण मोठी रंजक आहे. १९८० मध्ये यवलूज येथील कुस्ती मैदानासाठी यशवंत पाटील गेले होते. तेथे आपल्या गावातील कुस्ती मैदानाची तारीख व जाहिरात वाचण्यासाठी त्यांनी माईक हातात घेतला. नेमके याचवेळी या मैदानात निवेदन करणाऱ्या निवेदकांचा आवाज बसल्याने त्या जाहिरात वाचणाऱ्या मुलाला बोलवा, असे कुस्ती संयोजकांनी सांगितले आणि त्या दिवशी घेतलेला माईक अजूनही त्यांनी खाली ठेवलेला नाही.१९८१ ला जिल्हा तालीम संघाने कुस्ती मैदान आयोजित केले होते. यावेळी कुस्तीतील भीष्माचार्य बाळ गायकवाड यांनी त्यांची विचारपूस करून निवेदन करण्यास सांगितले. त्यावेळी संयोजक गणपतराव आंदळकर यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी यशवंत पाटील यांना जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्यपद बहाल केले. ते आजही कायम आहे.१९८२ला कोल्हापूर येथे ‘महान भारत केसरी’ची लढत दादू चौगले व सादिक पंजाबी यांच्यात झाली. यावेळी त्यांना साईड कॉमेंट्रीची संधी मिळाली होती. या लढतीवेळी बाळ गायकवाड यांनी, ‘यशवंतच्या हातात माईक द्या’, असे सांगितले आणि ‘राम राम मंडळी’ असं त्यांनी म्हणताच मैदानात एकच जल्लोष झाला. हा आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याचे निवेदक यशवंत पाटील-दोनवडेकर यांनी सांगितले.कुस्तीसम्राट युवराज पाटील व पै. सतपाल यांची ऐतिहासिक कुस्ती झाली. या कुस्तीचे थेट निवेदन आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणार होते. त्यांच्या आवाजातील रांगडेपणा पाहून निवेदन करण्याची संधी त्यांना देण्यात आली होती. विष्णू जोशीलकर हे ‘महाराष्ट्र केसरी’ झाले, त्यावेळीही संपूर्ण स्पर्धेचे निवेदन त्यांनीच केले होते.१९९५ला यशवंत पाटील यांना कृष्णा कारखान्याच्या कुस्ती निवेदनासाठी बोलविण्यात आले. उद्घाटनाच्या कुस्तीला प्रारंभ झाला व वादाला सुरुवात झाली. त्यांनी निवेदनाला सुरुवात करताच कुस्तीसाठी डोकीफोड करणारी म्हणून प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा शांततेत पार पडली. कुस्ती निवेदनातील या कामाबरोबरच अनेक नवे मल्ल घडविण्याचे कामही त्यांनी केले आहे.