शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

करनूरच्या कुंभार कुटुंबीयांचा कौतुकास्पद पायंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:58 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : सर्वसाधारणपणे रजिस्टर लग्न म्हणजे कुटुंबाचा विरोध म्हणून पळून जाऊन केलेले लग्न ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : सर्वसाधारणपणे रजिस्टर लग्न म्हणजे कुटुंबाचा विरोध म्हणून पळून जाऊन केलेले लग्न असा अनेकांचा ग्रह आहे. काही अपवाद वगळता अ‍ॅरेंज मॅरेज हे रजिस्टर पद्धतीने होत नाही; पण करनूर (ता. कागल) आणि वाकरे (ता. करवीर) येथील बऱ्यापैकी सधन असलेल्या कुंभार कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत असा विवाह केला आहे. हॉलचे भाडे, सजावट, संगीत, बेंडबाजा, आहेर-माहेर असा सर्व खर्च टाळून ती रक्कम सामाजिक दातृत्वासाठी खर्च करण्याचा आणि त्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत रजिस्टर पद्धतीने विवाह करण्याचा कौतुकास्पद पायंडा पाडला.करनूर येथील तानाजी निवृत्ती कुंभार यांचा मुलगा प्रवीण (बी. ई. सिव्हिल) आणि अशोक भिवाजी कुंभार यांची मुलगी पूजा (बी. टेक. फूड टेक्नॉलॉजी) या दोघांचा विवाह बुधवारी (दि. २९) कोल्हापूर येथील रजिस्टर कार्यालयात नोंदणी पद्धतीने झाला. मूळचे कोगनोळी (ता. चिक्कोडी) येथील तानाजी कुंभार हे शेती खरेदीमुळे करनूरकर झाले. प्रगतिशील शेतकरी असलेले कुंभार हे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. आपल्या मुलाचा विवाह रजिस्टर पद्धतीने करून खर्च वाचवायचा व ती रक्कम गरीब घरातील मुलींच्या विवाहासाठी खर्च करायची, असा निर्धार केला होता. पत्नी आक्काताई, व मुले यांनीही मान्यता दिली. मुली पाहताना याची कल्पना ते आधीच देत. वाकरे येथील हे स्थळ जुळले. हे कुटुंबही तसे सधन आहे. पण, केवळ नारळपानाचा विडा एवढ्यावर ठरलं. मुलीचे आजोबा (आईचे वडील) राजाराम कुंभार (रा. कुडित्रे) व आई-वडील यांनाही हा उपक्रम आवडला आणि दीड महिन्यापूर्वी नोंदणी केली.सहा गरीब मुलींच्या नावावर ठेवीथाटामाटाचा, डौलदार पद्धतीचा विवाह टाळल्याने साधारणत: तीन लाख रुपये खर्च वाचला. त्यातील काही रक्कम त्यांनी सहा मुलींच्या नावावर राष्ट्रीयीकृत बॅक आणि एल.आय.सी.मध्ये ठेवली आहे. वयानुसार या रकमा ३५ हजार ते ८0 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच करनूर येथे बोअर मारण्यासाठी दहा हजार रुपये, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी दहा हजार रुपये, तर काही मुलींच्या लग्नांना सढळ हाताने मदत केली आहे. गरीब आणि दोनपेक्षा अधिक मुली ज्या घरात आहेत, अशा ठिकाणी हा खर्च केला आहे.कार्यालयातील कर्मचारीही आनंदले : एरवी ताणतणाव, विरोधाचा दबाव, नातेवाइकांचा अभाव, तक्रारी, साक्षीदारांच्या अनेक तºहा, अशा वातावरणात विवाह नोंदणी करणाºया अधिकारी आणि कर्मचारी वर्गालाही कुंभार कुटुंबीयांच्या या उपक्रमाने उत्साहित केले. नवरा किंवा नवरी यांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते. विशेषत: दोन्हींचे माता-पिता सहीसाठी मिळून आले आहेत. असा प्रसंग नोकरी काळात क्वचितच पाहावयास मिळतो. काहीनी तर गेल्या ३0-३५ वर्षांच्या नोकरीच्या काळात पहिलाच असा विवाह पाहिला, अशा भावना येथील कर्मचाºयानी व्यक्त केल्या.