शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

महिला स्वातंत्र्यसैनिक तांबट, हविरेंच्याही संघर्षाची नोंद व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:47 IST

शिवाजी चौक सुशोभीकरण : खरा इतिहास जनतेला माहिती होणे गरजेचे

कोल्हापूर : ‘लोकमत’मधील १९ जानेवारी २०१७ चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातील लेख वाचला. त्यानंतर २० जानेवारी २०१७ च्या ‘लोकमत’मधील माजी महापौर भिकशेठ पाटील यांची त्यावरील टिप्पणीही वाचली. याबाबत शिवाजी पुतळा सुशोभीकरणाच्या दृष्टीने आमदार राजेश क्षीरसागर यांना समक्ष तारीखवार माहिती मी स्वत: दिली आहे. गव्हर्नर विल्सनचा पुतळा बसविला तो १९२९ मध्ये. या पुतळ्यावर डांबर मारून विद्रूप केला तो १० आॅक्टोबर १९४२ या घटनेस्थापनेच्या दिवशी. या घटनेला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. (‘लोकमत’मध्ये १९९३ मध्ये त्यास शंभर वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख आला आहे, तो चुकीचा आहे.)महिला स्वातंत्र्यसैनिक श्रीमती भागीरथीबाई दत्तोबा तांबट (सोबत त्यांचा चार वर्षांचा मुलगा होता. तो सध्या ८१ वर्षांचा असून, निशिकांत तांबट असे त्यांचे नाव आहे. सध्या ते राजारामपुरी नवव्या गल्लीत राहतात) व श्रीमती जयाबाई सिदलिंग हविरे या बहाद्दर महिलांनी १० डिसेंबर १९४२ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या पुतळ्यावर डांबर, अ‍ॅसिड फेकून तो विद्रूप केला. तो पुतळा नंतर ब्रिटिश प्रशासनाने चार महिने झाकून ठेवला. वर्षभरानंतर शंकरराव दत्तात्रय माने, अहमद शाबाजी मुल्ला यांच्या पुढाकाराने काका देसाई, कुंडल देसाई, शामराव लहू पाटील, नारायण घोरपडे, नारायण जगताप, पांडुरंग बळवंत पोवार, माधवराव घाडगे, आबू जाधव यांनी भर पहाटे पुतळ्यावर घणाचे घाव घातले व तो फोडला. यावेळी माधवराव कुलकर्णी व वासुदेव ऊर्फ बाबूराव देशपांडे यांनी गर्दीचे नियंत्रण केले. अखेर १९४३ मध्ये सरकारला हा पुतळा हटवावा लागला. या जागेवर पुन्हा विल्सनचा पुतळा बसविला जाऊ नये म्हणून शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी १३ मे १९४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिल्पकार बाबूराव पेंटर यांच्याकडून करवून घेतला व तिथे बसविला गेला.विल्सनच्या पुतळ्याला डांबर फासल्याबद्दल भागीरथी तांबट व जयाबाई हविरे यांना अटक झाली. या गोष्टीला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यामध्ये न्यायालयास बांगड्यांचा आहेर केल्याबद्दल, न्यायालयाच्या अवमानाबद्दल त्यांना दीड वर्ष शिक्षा ठोठावण्यात आली. राजबंदी कैद्यांची माहिती तत्कालीन सरकारी गॅझेटमध्ये नोंद आहे. तुरुंगातील शिक्षेची प्रमाणपत्रेही आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे आता सुशोभीकरण होत असताना हा देदीप्यमान इतिहास आजच्या पिढीला समजणे महत्त्वाचे आहे. म्हणून या महिला स्वातंत्र्यसैनिक, पुतळा फोडणारे स्वातंत्र्यसैनिक व शिवभक्त भालजी पेंढारकर यांची नोंद नव्याने सुशोभीकरण होताना घेतली जाणे आवश्यक आहे. ती घेतली जावी व खरा इतिहास जनतेला माहीत व्हावा, यासाठीच हा पत्रप्रपंच केला आहे.- शरद तांबट२०१ अ, शिवाजी पेठ, कोल्हापूर(मो : ९४२३८६०८४०)