शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

महिला स्वातंत्र्यसैनिक तांबट, हविरेंच्याही संघर्षाची नोंद व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:47 IST

शिवाजी चौक सुशोभीकरण : खरा इतिहास जनतेला माहिती होणे गरजेचे

कोल्हापूर : ‘लोकमत’मधील १९ जानेवारी २०१७ चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भातील लेख वाचला. त्यानंतर २० जानेवारी २०१७ च्या ‘लोकमत’मधील माजी महापौर भिकशेठ पाटील यांची त्यावरील टिप्पणीही वाचली. याबाबत शिवाजी पुतळा सुशोभीकरणाच्या दृष्टीने आमदार राजेश क्षीरसागर यांना समक्ष तारीखवार माहिती मी स्वत: दिली आहे. गव्हर्नर विल्सनचा पुतळा बसविला तो १९२९ मध्ये. या पुतळ्यावर डांबर मारून विद्रूप केला तो १० आॅक्टोबर १९४२ या घटनेस्थापनेच्या दिवशी. या घटनेला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. (‘लोकमत’मध्ये १९९३ मध्ये त्यास शंभर वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख आला आहे, तो चुकीचा आहे.)महिला स्वातंत्र्यसैनिक श्रीमती भागीरथीबाई दत्तोबा तांबट (सोबत त्यांचा चार वर्षांचा मुलगा होता. तो सध्या ८१ वर्षांचा असून, निशिकांत तांबट असे त्यांचे नाव आहे. सध्या ते राजारामपुरी नवव्या गल्लीत राहतात) व श्रीमती जयाबाई सिदलिंग हविरे या बहाद्दर महिलांनी १० डिसेंबर १९४२ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या पुतळ्यावर डांबर, अ‍ॅसिड फेकून तो विद्रूप केला. तो पुतळा नंतर ब्रिटिश प्रशासनाने चार महिने झाकून ठेवला. वर्षभरानंतर शंकरराव दत्तात्रय माने, अहमद शाबाजी मुल्ला यांच्या पुढाकाराने काका देसाई, कुंडल देसाई, शामराव लहू पाटील, नारायण घोरपडे, नारायण जगताप, पांडुरंग बळवंत पोवार, माधवराव घाडगे, आबू जाधव यांनी भर पहाटे पुतळ्यावर घणाचे घाव घातले व तो फोडला. यावेळी माधवराव कुलकर्णी व वासुदेव ऊर्फ बाबूराव देशपांडे यांनी गर्दीचे नियंत्रण केले. अखेर १९४३ मध्ये सरकारला हा पुतळा हटवावा लागला. या जागेवर पुन्हा विल्सनचा पुतळा बसविला जाऊ नये म्हणून शिवभक्त भालजी पेंढारकर यांनी १३ मे १९४५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिल्पकार बाबूराव पेंटर यांच्याकडून करवून घेतला व तिथे बसविला गेला.विल्सनच्या पुतळ्याला डांबर फासल्याबद्दल भागीरथी तांबट व जयाबाई हविरे यांना अटक झाली. या गोष्टीला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यामध्ये न्यायालयास बांगड्यांचा आहेर केल्याबद्दल, न्यायालयाच्या अवमानाबद्दल त्यांना दीड वर्ष शिक्षा ठोठावण्यात आली. राजबंदी कैद्यांची माहिती तत्कालीन सरकारी गॅझेटमध्ये नोंद आहे. तुरुंगातील शिक्षेची प्रमाणपत्रेही आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे आता सुशोभीकरण होत असताना हा देदीप्यमान इतिहास आजच्या पिढीला समजणे महत्त्वाचे आहे. म्हणून या महिला स्वातंत्र्यसैनिक, पुतळा फोडणारे स्वातंत्र्यसैनिक व शिवभक्त भालजी पेंढारकर यांची नोंद नव्याने सुशोभीकरण होताना घेतली जाणे आवश्यक आहे. ती घेतली जावी व खरा इतिहास जनतेला माहीत व्हावा, यासाठीच हा पत्रप्रपंच केला आहे.- शरद तांबट२०१ अ, शिवाजी पेठ, कोल्हापूर(मो : ९४२३८६०८४०)