शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

महिलांचा आहार

By admin | Updated: March 31, 2016 00:33 IST

डॉ. शिल्पा जाधव

आज प्रगतिशील देशांसमोर ज्या समस्या आहेत, त्यामध्ये ‘कुपोषण’ ही अतिशय भीषण समस्या आहे. गरीब घरातील व्यक्तींना अन्नपदार्थांचा तुटवडा असल्याने त्यांचे कुपोषण होत असते. त्याबरोबरच श्रीमंत सुखवस्तू घरातील व्यक्तीसुद्धा संतुलित आहाराबाबत अज्ञान, दुर्लक्ष या गोष्टींमुळे कुपोषित राहतात. या दोन्ही वर्गांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असते.घरी अन्नधान्याची सुबत्ता असूनही वजन कमी करण्याच्या मागे लागून अनेक स्त्रिया उपाशी राहतात किंवा भीतीमुळे अनेक पदार्थ वर्ज्य करतात आणि अधिकाधिक कुपोषित होतात. आपण कुपोषित आहोत का हे कसे ओळखायचे? त्वचा कोरडी होणे, त्वचेवर, नखांवर डाग येणे, डोळ््यांखाली सूज येणे व काळी वर्तुळे दिसणे, दात पिवळसर होणे, ओठ फुटणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा, शरीरावर सूज येणे, हाडांमधून आवाज येणे, दम लागणे, चेहरा निस्तेज दिसणे, उदास वाटणे, चिडचिड होणे, पाळीच्या तक्रारी, अंगदुखी, वजन कमी अथवा जास्त असणे ही कुपोषणाची काही लक्षणे. आपल्याला यातील एक किंवा एकाहून अधिक समस्या असतील तर आपल्या आहारामध्ये पोषणमूल्यांची कमतरता आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. खाण्याच्या वेळा सांभाळणे हे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल आपण मागील लेखांमध्ये बोललो. तसेच आपल्या दिवसभराच्या आहारात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे योग्य प्रमाणात आहेत का, याबाबतही आपण दक्ष असले पाहिजे. नेहमी ताजे व स्वच्छ अन्न खावे. अन्नपदार्थ जेवढा शिळा होत जातो, तेवढे त्यातील पोषकतत्त्वांचे प्रमाण कमी होत जाते व जीवाणू, विषाणूंचे प्रमाण वाढत जाते. भाज्या व फळे ही ताजी व अखंड स्वरूपात खावीत. त्यांचा रस काढू नये. दिवसातून एक ते दोन कपांवर चहा, कॉफी नको. उत्तेजक पेये, सोडा, फेसाळती पेये यांच्या अतिरिक्त सेवनामुळे स्नायूंची, हाडांची घनता कमी होते. बऱ्याच स्त्रिया या आठवड्यात कोणते ड्रेस, कोणत्या साड्या परिधान करायच्या याचे नियोजन करतात, तसेच नियोजन आठवड्याच्या आहाराचे व त्यासाठी लागणाऱ्या चीजवस्तूंचे करा. आठवड्यातून दोन वेळा तरी भाजी, फळे आणून ठेवा. एकदम आठ-दहा दिवसांसाठी भाज्या, फळे फ्रीजमध्ये कोंबून ठेवू नका. एकाच वेळी खूप जास्त खाणे टाळा. त्यापेक्षा तोच आहार थोड्या थोड्या वेळाने विभागून खात राहा. एकदम भरपेट खाणे व नंतर उपवास करणे या दोन टोकाच्या गोष्टी करीत राहिलात, तर तुम्हाला शारीरिक वा मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. एका जागी स्थिर बसून शांतचित्ताने जेवण घ्या. जेवताना टी.व्ही., मोबाईल, लॅपटॉप बंद करून ठेवा. आपल्या खराब मुडस्चा, रागाचा, अपमानाचा प्रभाव आपल्या खाण्या-पिण्यावर पाडणे हे चूकच. आपले पारंपरिक पदार्थ व त्यातील घटक जे आपले पूर्वज खात आलेले आहेत, ते घटक पचविण्यासाठी आपले शारीर निरनिराळ्या एन्झाइम्सची निर्मिती करीत असते. या गोष्टी सोडून पाश्चिमात्य पदार्थांचे स्तोम माजवून आपण आरोग्य व पैसा हे दोन्ही व्यर्थ खर्च करीत असतो. प्रक्रिया केलेले अन्न शक्य होईल तेवढे टाळा. आपले शरीर आपल्याला भुकेची जाणीव करून देत असते. त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि इतर कुणी आपल्याला हे वर्ज्य करा, ते खावा असे सल्ले देत असेल, तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वत:ची बुद्धी वापरा; कारण आपले शरीर हे अमूल्य आहे, एकमेव आहे. शरीराचे योग्य भरणपोषण करून ते सुदृढ ठेवणे, निरामय ठेवणे ही आपल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे असे समजा. कुपोषणाची समस्या वेळीच ओळखा. वेळीच रोखा. संतुलित आहाराचा अवलंब करा व निरोगी राहा.