शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

स्त्रियांनी स्वावलंबी होण्याची गरज

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

भारती पाटील : मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे--ज्ञानदीप व्याख्यानमाला

सोनी : स्त्रियांनी स्वावलंबी आणि धाडसी बनावे. कोणतेही कार्य करताना समाज काय म्हणेल, याचा विचार न करता जर आपले काम चोख व प्रामाणिकपणे केल्यास समाजात वेगळे स्थान नक्कीच मिळेल. यासाठी शिक्षण आवश्यक असल्याने मुलींच्या शिक्षणाकडे पालकांनी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्त्रियांनी नेहमी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे समाजात स्त्रियांना मान-सन्मान मिळेल, असे मत कवयित्री डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.सोनी (ता. मिरज) येथे ज्ञानदीप ग्रुपतर्फे आयोजित ज्ञानदीप व्याख्यानमालेत गुरव यांनी ‘स्त्रियांचे समाजातील आजचे स्थान’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. त्या म्हणाल्या की, आज मुलींना शिक्षण दिले जात आहे. काळ बदलला, पण ग्रामीण भागात २० ते ३० टक्केच परिवर्तन दिसते. स्त्रियांना अजूनही हवा तेवढा पोषण आहार मिळत नाही, ही खंत आहे. चाळीशी पार केल्यानंतर सर्वसाधारण सर्वच स्त्रियांमध्ये मानसिक कमकुवतपणा येतो. या काळात खरं तर त्यांना मानसिक आधाराची गरज असते व ती मिळणे गरजेचे असते. शासनाने चालू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून स्त्रिया सक्षम व स्वावलंबी व्हाव्यात, हा हेतू आहे. पण त्यातून कर्ज काढण्याव्यतिरिक्त कोणतेच काम केले जात नाही. बचत गटातील पैशातून स्त्रियांनी लहान-मोठे उद्योग करावेत, त्यासाठी गटातील प्रत्येक स्त्री ही मनाने एकरूप झाली पाहिजे. राजकारण व समाजकारणामध्ये आता स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत असून, या क्षेत्रातही महिलांनी अभ्यासू व कार्यक्षम होणे गरजेचे आहे. यावेळी पाटील यांनी स्त्री जीवनावरील काही कविता सादर केल्या. यावेळी वातावरण भावूक झाले होते. नरेंद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पी. बी. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)