शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांनी स्वावलंबी होण्याची गरज

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

भारती पाटील : मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे--ज्ञानदीप व्याख्यानमाला

सोनी : स्त्रियांनी स्वावलंबी आणि धाडसी बनावे. कोणतेही कार्य करताना समाज काय म्हणेल, याचा विचार न करता जर आपले काम चोख व प्रामाणिकपणे केल्यास समाजात वेगळे स्थान नक्कीच मिळेल. यासाठी शिक्षण आवश्यक असल्याने मुलींच्या शिक्षणाकडे पालकांनी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्त्रियांनी नेहमी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे समाजात स्त्रियांना मान-सन्मान मिळेल, असे मत कवयित्री डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.सोनी (ता. मिरज) येथे ज्ञानदीप ग्रुपतर्फे आयोजित ज्ञानदीप व्याख्यानमालेत गुरव यांनी ‘स्त्रियांचे समाजातील आजचे स्थान’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. त्या म्हणाल्या की, आज मुलींना शिक्षण दिले जात आहे. काळ बदलला, पण ग्रामीण भागात २० ते ३० टक्केच परिवर्तन दिसते. स्त्रियांना अजूनही हवा तेवढा पोषण आहार मिळत नाही, ही खंत आहे. चाळीशी पार केल्यानंतर सर्वसाधारण सर्वच स्त्रियांमध्ये मानसिक कमकुवतपणा येतो. या काळात खरं तर त्यांना मानसिक आधाराची गरज असते व ती मिळणे गरजेचे असते. शासनाने चालू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून स्त्रिया सक्षम व स्वावलंबी व्हाव्यात, हा हेतू आहे. पण त्यातून कर्ज काढण्याव्यतिरिक्त कोणतेच काम केले जात नाही. बचत गटातील पैशातून स्त्रियांनी लहान-मोठे उद्योग करावेत, त्यासाठी गटातील प्रत्येक स्त्री ही मनाने एकरूप झाली पाहिजे. राजकारण व समाजकारणामध्ये आता स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत असून, या क्षेत्रातही महिलांनी अभ्यासू व कार्यक्षम होणे गरजेचे आहे. यावेळी पाटील यांनी स्त्री जीवनावरील काही कविता सादर केल्या. यावेळी वातावरण भावूक झाले होते. नरेंद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पी. बी. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)