शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

महिला शेतमजुरांना मदतीचा हात

By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाचा निर्णय : मृत्यू झाल्यास २०, अपंगत्वास १० हजार

आयुब मुल्ला - खोची .. ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही अशा शेतमजूर महिलेचा आपदग्रस्त होऊन किंवा अपघातात मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून वीस हजार रुपये देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतला आहे. तसेच अपंगत्व आल्यास दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. असा निर्णय जाहीर करणारी राज्यातील ही पहिलीच जिल्हा परिषद आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागातही भविष्याची तरतूद म्हणून विमा उतरविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अपघातपश्चात कुटुंबातील लोकांना संरक्षण तसेच आधाराच्या दृष्टीने विम्यात गुंतवणूक केली जाते. यामध्ये नोकरदार, व्यापारी वर्गाचा मोठा सहभाग आहे. ग्रामीण भागातही जमीनदार कुटुंबांत विमा गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासन खातेदार शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ राबविते. ही योजना ज्यांच्या नावावर शेती आहे अशांसाठीच उपयुक्त ठरते. परंतु, ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अशी कुटुंबे आधाराविनाच राहतात. याचाच विचार करून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने वरील निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात शेतमजुरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. अशा शेतमजूर महिलेचा जर अपघाताने मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबीयांना कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. त्यामुळे गरिबीत गुजराण करणारे कुटुंबीय पुन्हा आर्थिक अडचणीत सापडते. यासाठी कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून वीस हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शारीरिक अपंगत्व आल्यास किंवा जखमी होऊन एखादा अवयव निकामी झाल्यास दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.अशी मदत मिळण्यासाठी पोलीस ठाण्यातील माहिती, मृत्यूचा दाखला, वैद्यकीय दाखला, वयाचा दाखला, रहिवाशाचे नाव, वारसदाराचे नाव, अपघातग्रस्ताशी नाते, बॅँकेचा तपशील या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. १८ ते ६५ वयोगटातील विवाहित महिलांच्या बाबतीत हा निर्णय लागू आहे. त्यासाठी १ लाख रुपये उत्पन्न मर्यादा असावी, असेही नमूद करण्यात आले आहे.