शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

महिला शेतमजुरांना मदतीचा हात

By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाचा निर्णय : मृत्यू झाल्यास २०, अपंगत्वास १० हजार

आयुब मुल्ला - खोची .. ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही अशा शेतमजूर महिलेचा आपदग्रस्त होऊन किंवा अपघातात मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून वीस हजार रुपये देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतला आहे. तसेच अपंगत्व आल्यास दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. असा निर्णय जाहीर करणारी राज्यातील ही पहिलीच जिल्हा परिषद आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागातही भविष्याची तरतूद म्हणून विमा उतरविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अपघातपश्चात कुटुंबातील लोकांना संरक्षण तसेच आधाराच्या दृष्टीने विम्यात गुंतवणूक केली जाते. यामध्ये नोकरदार, व्यापारी वर्गाचा मोठा सहभाग आहे. ग्रामीण भागातही जमीनदार कुटुंबांत विमा गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासन खातेदार शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ राबविते. ही योजना ज्यांच्या नावावर शेती आहे अशांसाठीच उपयुक्त ठरते. परंतु, ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अशी कुटुंबे आधाराविनाच राहतात. याचाच विचार करून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने वरील निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात शेतमजुरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. अशा शेतमजूर महिलेचा जर अपघाताने मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबीयांना कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. त्यामुळे गरिबीत गुजराण करणारे कुटुंबीय पुन्हा आर्थिक अडचणीत सापडते. यासाठी कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून वीस हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शारीरिक अपंगत्व आल्यास किंवा जखमी होऊन एखादा अवयव निकामी झाल्यास दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.अशी मदत मिळण्यासाठी पोलीस ठाण्यातील माहिती, मृत्यूचा दाखला, वैद्यकीय दाखला, वयाचा दाखला, रहिवाशाचे नाव, वारसदाराचे नाव, अपघातग्रस्ताशी नाते, बॅँकेचा तपशील या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. १८ ते ६५ वयोगटातील विवाहित महिलांच्या बाबतीत हा निर्णय लागू आहे. त्यासाठी १ लाख रुपये उत्पन्न मर्यादा असावी, असेही नमूद करण्यात आले आहे.