शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डालग्यातून रुग्णालयात नेताना महिलेची वाटेतच प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST

कोल्हापूर-गारगोटी : घटना दिनांक ६ जूनची, गर्भवतीची प्रकृती बिघडली, काट्याकुट्याची वाट तुडवून रस्त्याला लागेपर्यंत बाळाने जन्मापूर्वीच जग सोडले, त्यानंतर ...

कोल्हापूर-गारगोटी : घटना दिनांक ६ जूनची, गर्भवतीची प्रकृती बिघडली, काट्याकुट्याची वाट तुडवून रस्त्याला लागेपर्यंत बाळाने जन्मापूर्वीच जग सोडले, त्यानंतर बरोबरच १२ दिवसांनी आणखी एक गर्भवती अडली, डालग्याच्या डोलीतून खांद्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत नेईपर्यंत वाटेतच प्रसूती झाली आणि तीही भरपावसात, थंडी वारा झेलत बाळ या जगात प्रवेशकर्ते झाले.

भुदरगड तालुक्यातील वासनोली व एरंडपे या धनगर वाड्यावर १२ दिवसांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटना धनगरवाड्यावरील लोकांच्या जगण्याचे दशावतार मांडणाऱ्या आणि आधुनिक जगात आहोत, असे म्हणण्याची लाज वाटणाऱ्या, सेंकदाच्या वेगाने धावणाऱ्या या जगात दोन-तीन किमीचे अंतर म्हणजे एक-दोन मिनिटांचा खेळ, पण जंगलातील वाड्यावस्त्यातील लोकांसाठी मात्र हाच जीवनमरणाचा खेळ ठरत आहे. मुख्य रस्त्यालगत जाणारा अवघा दोन किमीचा पक्का रस्ता नसल्याने जीवनमृत्यूशी टोकाचा संघर्ष करत देवाच्या भरवशावर जगणे सोडणाऱ्या या घटनांकडे मात्र प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्षच जात नाही, हे त्यापेक्षाही दुर्देैवी!

भुदरगड तालुक्यात एरंडपे धनगरवाडा हा मुख्य रस्त्यापासून अवघा तीन किमी अंतरावर. पण पक्का रस्ता नसल्याने रुग्णांना येथून रस्त्यावर नेणे तितकेच अवघड काम. सुनीता सचिन फाेंडे या २४ वर्षीय गर्भवतीला या रस्त्यावरून वेळेत उपचारासाठी पोहचता आले नाही आणि बाळाला जीव गमवावा लागला. त्यानंतर असाच प्रकार वासनोली या धनगरवाड्यावर देखील घडला. संगीता वैभव पटकारे या २३ वर्षीय गर्भवतीला प्रसववेदना सुरू झाल्याने उपचारासाठी घेऊन जायचे तर रुग्णवाहिकाच येऊ शकत नव्हती. मग कुटुंबीय, शेजारपाजाऱ्यांनी डालग्याची डोली करून खांद्यावरून भर पावसात नेण्यास सुरुवात केली. अर्धी वाट तुडवल्यानंतर भरपावसात डोलीतच बाळाचा जन्म झाला. त्यानंतर मुख्य रस्त्याला येऊन तेथे थांबलेल्या रुग्णवाहिकेतून तिला दवाखान्यात पोहोचवण्यात आले.

चौकट

अजून किती आणि कुठंवर सोसायचे?

धनगरवाड्याकडे जाण्यासाठी अजूनही पायवाटच आहे. तेथे रस्ते व्हावेत, अशी मागणी करूनदेखील काेणीही याकडे लक्ष देत नाही. रस्ता नाही म्हणून उपचार नाही आणि उपचार वेळेत नाही म्हणून जीव वाचत नाही, अशा घटना कायम घडतात. त्यातही पावसाळ्यात याचे प्रमाण जरा जास्तच असते. गेल्या वर्षी म्हासुर्ली धनगरवाड्यावर सर्पदंश झालेला शाळकरी मुलगा व गर्भवती महिलेला वेळेत दवाखान्यात नेता आले नाही, म्हणून जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अजून किती आणि कुठंवर साेसायचे असा प्रश्न ही पिढी विचारू लागली आहे.

१९०६२०२१-कोल-धनगरवाडा

फोटो ओळ : भुदरगड तालुक्यातील वासनोली धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाडीवर रुग्णवाहिका जात नाही. मग डालग्याची डोली करून खांद्यावरून असे बाळंतीण महिलेस मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन यावे लागते.