शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

निराधार मुलांची बालगृहे अधीक्षकांविना

By admin | Updated: April 23, 2015 00:36 IST

शासनाकडून उपेक्षित वागणूक : कर्मचारी भरती नाही, लोकप्रतिनिधींचे प्रश्नांकडे दुर्लक्ष

कोल्हापूर : शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरीसह राज्यातील अन्य जिल्ह्यांतील बहुतांश बालगृह/ निरीक्षणगृहांतून अनेक वर्षांपासून अधीक्षकांची नियुक्ती झालेली नाही. परिणामी कुटुंबाचे छत्र हरपलेल्या मुलांच्या नशिबी निरीक्षणगृहांतूनही ‘विना पालकत्वा’चे जिणं आले आहे. शासन अधीक्षक व मंजूर पदे भरण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. लोकप्रतिनिधींनाही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यात वेळ नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.बालगुन्हेगार, निराधार, अनाथ मुलांचे पालनपोषण, शिक्षण देणे ही निरीक्षणगृहांची मुख्य जबाबदारी आहे. बालगुन्हेगारांना जामीन मिळेपर्यंत निरीक्षणगृहात ठेवले जाते. जामीन मिळाल्यानंतर त्यांना पोलीस आई-वडिलांकडे देतात. इतरवेळी समाजातील निराधार अशा ६ ते १८ वर्षे वयोगटांतील मुले शिक्षणाचे धडे घेत असतात. राज्यात अनुदानित स्वयंसेवी संस्थांची १२ आणि २४ शासकीय निरीक्षणगृहे आहेत. या संस्थांतील प्रत्येक मुलास दरमहा ६३५ रुपये दिले जातात. हे पैसेही वेळेवर मिळत नसल्याच्या संस्थाचालकांच्या तक्रारी आहेत.कागलमध्ये असलेल्या निरीक्षणगृहात १०० मुलांची मान्यता आहे. तेथे सध्या ५५ मुले आहेत. अधीक्षक पद रिक्त आहे. बालकल्याण संकुलात जिल्हा परीविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांच्या निरीक्षणगृहात ७२ मुले आहेत. अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, लिपिक, एक स्वयंपाकी, दोन काळजीवाहक पदे रिक्त आहेत. सौ. नलिनी शा. पंत वालावलकर मुलींचे निरीक्षणगृहात ७८ मुली आहेत. अधीक्षक, एक शिक्षक, दोन काळजीवाहक पद रिक्त आहेत.सांगलीत दादूकाका भिडे मुलांचे व मुलींचे निरीक्षणगृहही अधीक्षकांविना आहे. काळजी वाहकांची तीन पदे रिक्त आहेत. सातारा येथील जिल्हा परीविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांच्या निरीक्षणगृह, कऱ्हाडमधील मुलांचे निरीक्षणगृहासह रत्नागिरी, लांजा, सिंधुदुर्ग येथेही अधीक्षक नाहीत. निरीक्षणगृहातील अधीक्षकांसह विविध रिक्त पदे भरावीत यासाठी येथील आभास फौंडेशनतर्फे २०१२ पासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, दखल न घेतल्यामुळे शासन उदासीनता स्पष्ट होत आहे. निरीक्षणगृहात अधीक्षकसारखे महत्त्वाच्या पदाच्या नियुक्तीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. हे गंभीर आहे. कुटुंबातील पालकत्वापासून पोरक्या झालेल्या मुलांना निरीक्षणगृहातही अधीक्षकांच्या रूपाने पालकत्व न मिळणे खेदाची बाब आहे. शासनाकडे आभास फौंडेशनतर्फे पाठपुरावा केला जात आहे.- प्राजक्ता देसाई, सचिव, आभास फौंडेशन, कोल्हापूर राज्यातील निरीक्षणगृहातील सुमारे ३५६ कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर २०१४ पासून पगार झालेला नाही. एक कोटी २३ लाखांची पगाराची दर महिन्याची रक्कम होते. शासनाने पगारच जमा केला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कर्ज काढून जगण्याची वेळ आली आहे.