शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

दर वाढविल्याशिवाय आगामी साखर हंगाम घेणेच अशक्य!

By admin | Updated: July 1, 2015 00:42 IST

साखरेच्या व उसाच्या दराबद्दल शेतकरी संघटनांनी कितीही आक्रमक भूमिका घेतली तरी

कोल्हापूर : खुल्या बाजारातील साखरेचा दर वाढल्याशिवाय शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देणे शक्य नाहीच; परंतु आगामी हंगामही घेणे कारखानदारीस शक्य नसल्याचे इंडियन शुगर मिल असोसिएशन (इस्मा) व इंडियन को-आॅप. शुगर फेडरेशन (एनएफसीएसएफ) यांनी स्पष्ट केले आहे. कधी नव्हे ते पहिल्यांदाच या संस्थांनी वृत्तपत्रांत जाहिरात देऊन त्यासंबंधीची भूमिका आताच मांडली आहे. त्याची शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.साखरेच्या व उसाच्या दराबद्दल शेतकरी संघटनांनी कितीही आक्रमक भूमिका घेतली तरी राज्य साखर संघ असो की राष्ट्रीय सहकारी साखर संघ असो, त्यांनी कधीच कारखानदारीची बाजू शास्त्रीय पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे कारखानदार लुटारू आहेत आणि त्यांची क्षमता असूनही ते शेतकऱ्यांना उसाचे पैसे द्यायला तयार नाहीत, असे चित्र प्रत्येक वर्षी हंगामात तयार होत असे. एका बाजूला आक्रमक संघटना आणि दुसऱ्या बाजूला दडपणाखाली असलेली कारखानदारी, असा अनुभव कायमच येई. यंदा पहिल्यांदाच ‘इस्मा’ व फेडरशनने या उद्योगाची वस्तुस्थिती मांडणारी माहिती वृत्तपत्रांना जाहिराती देऊन प्रसिद्ध केली आहे. त्यातून येणारा हंगाम गेलेल्या हंगामापेक्षा जास्त अडचणींचा असल्याचे स्पष्टच दिसत आहे.देशभरातील कारखान्यांची ‘एफआरपी’ची देणी तब्बल २१००० कोटी रुपये थकीत आहे. म्हणजे ३५ टक्के उसाची बिलेच देता आलेली नाहीत. ऊस बिले न मिळालेल्या शेतकऱ्यांची देशभरातील संख्या ५० लाखांवर आहे. कारखान्यांना दुरुस्ती, ऊस विकास, पगार, वेतन किंवा खेळत्या भांडवलासाठी निधीच मिळू शकणार नाही. ऊस गाळपाविना पडून राहण्याची भीती व्यक्त केली आहे. देशात गेल्या सहा वर्षांत सर्वांत जास्त ४० लाख टन साखर साठा शिल्लक आणि भाव सर्वांत कमी आहेत. साखरेच्या सध्याच्या बाजारातील किमती उत्पादन खर्चापेक्षा आठ ते नऊ रुपयांनी कमी आहेत. साखरेच्या किमती गेल्या नऊ महिन्यांत किलोमागे सरासरी सहा रुपयांनी घसरल्या आहेत. यातून मार्ग निघायचा असेल तर केंद्र शासनाला उसाची व साखरेची किंमत यांना जोडणारा फॉर्म्युला शोधावा लागेल. त्यासाठी केंद्राने ऊस उत्पादकांना गहू, धानासारखेच थेट साहाय्य केले पाहिजे, अशीही मागणी या संस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)