शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

दर वाढविल्याशिवाय आगामी साखर हंगाम घेणेच अशक्य!

By admin | Updated: July 1, 2015 00:42 IST

साखरेच्या व उसाच्या दराबद्दल शेतकरी संघटनांनी कितीही आक्रमक भूमिका घेतली तरी

कोल्हापूर : खुल्या बाजारातील साखरेचा दर वाढल्याशिवाय शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ देणे शक्य नाहीच; परंतु आगामी हंगामही घेणे कारखानदारीस शक्य नसल्याचे इंडियन शुगर मिल असोसिएशन (इस्मा) व इंडियन को-आॅप. शुगर फेडरेशन (एनएफसीएसएफ) यांनी स्पष्ट केले आहे. कधी नव्हे ते पहिल्यांदाच या संस्थांनी वृत्तपत्रांत जाहिरात देऊन त्यासंबंधीची भूमिका आताच मांडली आहे. त्याची शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.साखरेच्या व उसाच्या दराबद्दल शेतकरी संघटनांनी कितीही आक्रमक भूमिका घेतली तरी राज्य साखर संघ असो की राष्ट्रीय सहकारी साखर संघ असो, त्यांनी कधीच कारखानदारीची बाजू शास्त्रीय पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे कारखानदार लुटारू आहेत आणि त्यांची क्षमता असूनही ते शेतकऱ्यांना उसाचे पैसे द्यायला तयार नाहीत, असे चित्र प्रत्येक वर्षी हंगामात तयार होत असे. एका बाजूला आक्रमक संघटना आणि दुसऱ्या बाजूला दडपणाखाली असलेली कारखानदारी, असा अनुभव कायमच येई. यंदा पहिल्यांदाच ‘इस्मा’ व फेडरशनने या उद्योगाची वस्तुस्थिती मांडणारी माहिती वृत्तपत्रांना जाहिराती देऊन प्रसिद्ध केली आहे. त्यातून येणारा हंगाम गेलेल्या हंगामापेक्षा जास्त अडचणींचा असल्याचे स्पष्टच दिसत आहे.देशभरातील कारखान्यांची ‘एफआरपी’ची देणी तब्बल २१००० कोटी रुपये थकीत आहे. म्हणजे ३५ टक्के उसाची बिलेच देता आलेली नाहीत. ऊस बिले न मिळालेल्या शेतकऱ्यांची देशभरातील संख्या ५० लाखांवर आहे. कारखान्यांना दुरुस्ती, ऊस विकास, पगार, वेतन किंवा खेळत्या भांडवलासाठी निधीच मिळू शकणार नाही. ऊस गाळपाविना पडून राहण्याची भीती व्यक्त केली आहे. देशात गेल्या सहा वर्षांत सर्वांत जास्त ४० लाख टन साखर साठा शिल्लक आणि भाव सर्वांत कमी आहेत. साखरेच्या सध्याच्या बाजारातील किमती उत्पादन खर्चापेक्षा आठ ते नऊ रुपयांनी कमी आहेत. साखरेच्या किमती गेल्या नऊ महिन्यांत किलोमागे सरासरी सहा रुपयांनी घसरल्या आहेत. यातून मार्ग निघायचा असेल तर केंद्र शासनाला उसाची व साखरेची किंमत यांना जोडणारा फॉर्म्युला शोधावा लागेल. त्यासाठी केंद्राने ऊस उत्पादकांना गहू, धानासारखेच थेट साहाय्य केले पाहिजे, अशीही मागणी या संस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)