शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
6
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
7
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
8
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
9
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
10
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
11
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
12
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
13
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
14
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
15
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
16
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
17
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
18
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
19
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
20
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

इको झोनही पाण्याविना; जंगलतोड, वणव्यांची भर

By admin | Updated: April 30, 2017 23:58 IST

प्राण्यांचे बळी : पोटासाठी प्राणी शेती, मानवी वस्तीकडे येत असल्याने हल्ले; पाणवठ्यांच्या पुनर्जीवनाबरोबरच शिकारीवर बंदीची गरज

आर. एस. लाड ल्ल आंबाइको सेन्सेटिव्ह झोन म्हणून शाहूवाडीतील ५२ गावे व जंगल परिसर तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत आंबा, तळवडे, केर्ले, चांदोली, वाकोली ही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट आहेत. या जंगलातील वन्यजीव संपदा निसर्गचक्र पूर्ण करते. पण हेच वन्यजीव अधिवासातील पाण्याअभावी तडफडत आहेत. काही प्राणी पाण्याविना बळी जात आहेत. एकीकडे पाऊस कमी होत आहे. तर दुसरीकडे जंगलतोड, वणवे जंगलातील पाणी, चारा टंचाईला कारणीभूत ठरत आहे. साहजिकच पाण्यासाठी नदीकडे वळणारा जंगली प्राणी कडवी, कासारी व कानसा नदीच्या काठावरचे हिरवे पीक ओरबडतो आणि त्यातून कधी मानवावर तर कधी प्राण्यांवर हल्ले होताना दिसत आहेत. गेल्या सहा महिण्यांपूर्वी लोळाणे येथे एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ला-प्रतिहल्ल्यात बिबट्या ठार झाला. वणव्यामुळे जंगलातील चारा टंचाईची स्थिती गंभीर बनली आहे. पाण्यासाठी कडवी नदीकडे मोर्चा वळवणारे गवे-डुकरे नदीकाठच्या हिरव्या पिकात घुसून धुडगूस घालत आहेत. गेल्या आठवड्यात कडवी नदीकडे आलेला गवा जंगलाकडे परतताना घोळसवडे येथे डबरीवरून पडण्याचे निमित्त होऊन मृत्यू पावला. त्यापाठोपाठ तुरूकवाडीतही एक गवा जखमी झाला. पावसाळा आणखी दीड महिना दूर असताना पाणीटंचाईमुळे नदी व पाणीसाठ्याकडे वळणारे जंगली प्राणी शेतकऱ्यांच्याही तोंडचे पाणी पळवत आहेत.इको झोन, बफर झोन यामध्ये तालुक्यातील जंगलयुक्त ५२ गावे समाविष्ट असताना वन्य जिवांच्या चारा व पाण्याच्या उपलब्धतेसाठी निधी मिळत नाही. जैवविविधतेचे रक्षण करताना स्थानिकांचा सहभाग मोलाचा अपेक्षित असला तरी परिसरातील शेती टिकवण्यासाठी जंगली प्राण्यांचा उपद्रव होणार नाही, यासाठी वन्यजीव व वनविभागाने धडक मोहीम हाती घेऊन पुरेसा चारा व पाण्याचे रूपांतर पाणवठ्यात करण्याची आवश्यकता आहे.जंगल व वस्ती यादरम्यान चरखुदाई करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात वणवे पेटवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पाण्याचे दुर्भिक्ष आणि संधीसाधू शिकारी यांच्यासाठी जंगलातील पाणीटंचाई संधी ठरते. झरा परिसरात प्राण्यांच्या शिकाऱ्यांसाठी बंकर उभे केलेले दिसते. सभोवताली डहाळ्याचे कुंपण करून आत लपून बसण्यासाठी जागा शिकारी करतो. मात्र वनविभाग यापासून अनभिज्ञ राहतो, याचे आश्चर्य वाटते. वनविभागाने पाणवठ्याच्या पुनर्जीवनाबरोबर शिकारीवर निर्बंध घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे. (समाप्त)