शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

इको झोनही पाण्याविना; जंगलतोड, वणव्यांची भर

By admin | Updated: April 30, 2017 23:58 IST

प्राण्यांचे बळी : पोटासाठी प्राणी शेती, मानवी वस्तीकडे येत असल्याने हल्ले; पाणवठ्यांच्या पुनर्जीवनाबरोबरच शिकारीवर बंदीची गरज

आर. एस. लाड ल्ल आंबाइको सेन्सेटिव्ह झोन म्हणून शाहूवाडीतील ५२ गावे व जंगल परिसर तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत आंबा, तळवडे, केर्ले, चांदोली, वाकोली ही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट आहेत. या जंगलातील वन्यजीव संपदा निसर्गचक्र पूर्ण करते. पण हेच वन्यजीव अधिवासातील पाण्याअभावी तडफडत आहेत. काही प्राणी पाण्याविना बळी जात आहेत. एकीकडे पाऊस कमी होत आहे. तर दुसरीकडे जंगलतोड, वणवे जंगलातील पाणी, चारा टंचाईला कारणीभूत ठरत आहे. साहजिकच पाण्यासाठी नदीकडे वळणारा जंगली प्राणी कडवी, कासारी व कानसा नदीच्या काठावरचे हिरवे पीक ओरबडतो आणि त्यातून कधी मानवावर तर कधी प्राण्यांवर हल्ले होताना दिसत आहेत. गेल्या सहा महिण्यांपूर्वी लोळाणे येथे एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ला-प्रतिहल्ल्यात बिबट्या ठार झाला. वणव्यामुळे जंगलातील चारा टंचाईची स्थिती गंभीर बनली आहे. पाण्यासाठी कडवी नदीकडे मोर्चा वळवणारे गवे-डुकरे नदीकाठच्या हिरव्या पिकात घुसून धुडगूस घालत आहेत. गेल्या आठवड्यात कडवी नदीकडे आलेला गवा जंगलाकडे परतताना घोळसवडे येथे डबरीवरून पडण्याचे निमित्त होऊन मृत्यू पावला. त्यापाठोपाठ तुरूकवाडीतही एक गवा जखमी झाला. पावसाळा आणखी दीड महिना दूर असताना पाणीटंचाईमुळे नदी व पाणीसाठ्याकडे वळणारे जंगली प्राणी शेतकऱ्यांच्याही तोंडचे पाणी पळवत आहेत.इको झोन, बफर झोन यामध्ये तालुक्यातील जंगलयुक्त ५२ गावे समाविष्ट असताना वन्य जिवांच्या चारा व पाण्याच्या उपलब्धतेसाठी निधी मिळत नाही. जैवविविधतेचे रक्षण करताना स्थानिकांचा सहभाग मोलाचा अपेक्षित असला तरी परिसरातील शेती टिकवण्यासाठी जंगली प्राण्यांचा उपद्रव होणार नाही, यासाठी वन्यजीव व वनविभागाने धडक मोहीम हाती घेऊन पुरेसा चारा व पाण्याचे रूपांतर पाणवठ्यात करण्याची आवश्यकता आहे.जंगल व वस्ती यादरम्यान चरखुदाई करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात वणवे पेटवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पाण्याचे दुर्भिक्ष आणि संधीसाधू शिकारी यांच्यासाठी जंगलातील पाणीटंचाई संधी ठरते. झरा परिसरात प्राण्यांच्या शिकाऱ्यांसाठी बंकर उभे केलेले दिसते. सभोवताली डहाळ्याचे कुंपण करून आत लपून बसण्यासाठी जागा शिकारी करतो. मात्र वनविभाग यापासून अनभिज्ञ राहतो, याचे आश्चर्य वाटते. वनविभागाने पाणवठ्याच्या पुनर्जीवनाबरोबर शिकारीवर निर्बंध घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे. (समाप्त)