शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

दुर्घटना झाल्यानंतरच लक्ष देणार का ?

By admin | Updated: January 7, 2015 00:05 IST

अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न : सुरक्षा वाढविण्याची 'एटीएस'ची सूचना; जबाबदारी कोणाची ?

कोल्हापूर : भारतात घडत असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जावी, अशी सूचना गेल्या पाच वर्षांत किमान दहावेळा तरी झाली आहे; पण ही जबाबदारी पोलीस, जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती आणि महापालिका अशा शासकीय यंत्रणांमध्ये विभागली गेल्याने ही जबाबदारी सगळ्यांचीच; पण कुणालाच त्याची फिकीर नाही. त्यामुळे या सूचनेची गेल्या पाच वर्षांत अंमलबजावणी झालेली नाही. दुर्घटना झाल्यानंतरच लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी (एटीएस)ने काल, रविवारी अंबाबाई मंदिराची व परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी व मंदिराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी सूचना केली. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही अनेकवेळा केंद्र व राज्य पातळीवरच्या सुरक्षा संस्थांनी व ‘एटीएस’ने अंबाबाई मंदिराची पाहणी करून सुरक्षा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यावर फारशी अंमलबजावणी झालेली नाही. मंदिराच्या अंतर्बाह्य परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यात आले. सुरक्षा कर्मचारी, पोलीस नेमले, तरी मंदिराची सुरक्षा यथातथाच आहे.अंबाबाई मंदिर सध्या जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका आणि देवस्थान समिती या चार विभागांत वाटले गेले आहे. एखादा निर्णय घ्यायचा किंवा त्यावर कार्यवाही करायची म्हटली की, प्रत्येक विभाग दुसऱ्याकडे बोट दाखवितो. काहीवेळा अडचणी सांगितल्या जातात. या सगळ्यांत निर्णय प्रलंबितच राहतात. खरे तर अंबाबाई मंदिराची सर्वस्वी जबाबदारी देवस्थान समितीचीच. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने समितीने सुसज्ज राहणे अपेक्षित आहे. सुरक्षेसाठी सशस्त्रधारी पोलीस तैनात करणे ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची; पण त्यांना लागणारी सर्व यंत्रणा अगदी सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर, एक्स-रे स्कॅनर... ही उपकरणे पुरविण्याची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची. मंदिराबाहेरचा परिसर महापालिकेच्या अखत्यारीत येतो. येथील अतिक्रमण हटविण्यापासून ते फेरीवाल्यांच्या स्थलांतराचे अधिकार महापालिकेच्या हातात आहेत. मात्र, देवस्थान समिती आणि महापालिकेलाच सुरक्षेचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. काही घटना घडली, नवरात्र असले की चार दिवस सुरक्षेचा बाऊ केला जातो. नंतर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती पाहायला मिळते. (प्रतिनिधी)ढीगभर यंत्रणा; तरीही असुरक्षित मंदिराच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने चारही दरवाजांवर दोन महिला, दोन पुरुष अशा चार म्हणजे एकूण १६ पोलिसांची नेमणूक केली आहे; तर गाभाऱ्यात चौघेजण असतात. देवस्थान समितीने रक्षक ग्रुपच्या ३३ सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. तसेच लष्कराचे १७ कर्मचारी आहेत. शिवाय होमगार्ड आहेत. अशा रीतीने मंदिराच्या सुरक्षेसाठी जवळपास शंभरजणांची नेमणूक करण्यात आली आहे. नवरात्रात ही संख्या दुप्पट असते. याशिवाय गाभारा व बाह्य परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हॅँड मेटल डिटेक्टर, डोअर मेटल डिटेक्टर आहेतच. मात्र, सुरक्षेच्या या दोन्ही यंत्रणा अनेकदा तर बंदच असतात. तरीही एवढी ढीगभर सुरक्षा यंत्रणा असूनही कुणाचा कुणाला ताळमेळ नाही.