शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू कराची आश्वासनपूर्ती होणार का?

By admin | Updated: March 14, 2016 00:10 IST

अर्थसंकल्पाकडे लक्ष : करामुळे व्यापारी, शेतकरी, कामगारांसह हमालांचा प्रश्न गंभीर

संदीप बावचे -- जयसिंगपूर-अनुत्पादित तंबाखूवरील मूल्यवर्धित साडेबारा टक्के कराचा प्रश्न सोडविण्याबाबत एक वर्षानंतर पुन्हा अर्थ व नियोजन मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे़ यामुळे आश्वासनांचा हा पूर केव्हा ओसरणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे़ येत्या अर्थसंकल्पातून हा कर हटवू, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिल्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे व्यापारांच्या नजरा आता येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत़तत्कालीन आघाडी शासनाने अर्थसंकल्पात सर्व प्रकारच्या अनुत्पादित तंबाखूवर साडेबारा टक्के मूल्यवर्धित कर प्रस्तावित केला होता़ हा कर जयसिंगपूर शहरातील तंबाखू पेठेचे अस्तित्व पुसून टाकणारा ठरला़ गेल्या तीन वर्षांपासून अनुत्पादित तंबाखूवरील साडेबारा टक्के कराचा प्रश्न भिजत पडला आहे़ १९७१ पासून तंबाखू व इतर शेतीमालाच्या व्यवसायासाठी शहरातील व्यापारी पुढे आला़ यामुळे तंबाखू पेठेसह शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. कर्नाटक सीमाभागातील बहुतेक शेतकरी जयसिंगपूरमध्ये तंबाखू घेऊन येतो. येथील व्यापारी हा तंबाखू गेल्या नऊ दशकापासून देशभरातील विक्रेत्यांकडे पाठवितात, तर या व्यवसायावर १००० माथाडी कामगार, ५००० महिला कामगार, १०० बैलगाडी वाहतूकदार अवलंबून आहेत़ व्हॅटमुळे तंबाखू उद्योगातील महिला, हमाल, गाडीवान यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही शासनाच्या लक्षात आणून दिले होते़ अनुत्पादित तंबाखू कराचा प्रश्न ‘जैसे थे’च असल्यामुळे प्रक्रिया केलेला तंबाखू पुरवठा करणाऱ्या जयसिंगपूर पेठेचे अस्तित्व मूल्यवर्धित करामुळे जवळपास संपुष्टात आले आहे़ येथील तंबाखू पेठेवर घाला घालणारा हा कर रद्द करून या व्यवसायाला चालना देण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाच्या प्रतिनिधींना अनेकवेळा साकडे घातले आहे़ मात्र, आत्तापर्यंत आश्वासनापलीकडे काहीच हाती लागलेले नाही़तंबाखूवरील मूल्यवर्धित कर येत्या अर्थसंकल्पातून हटवू, असे आश्वासन अर्थमंत्री मुनगुंटीवार यांनी एक वर्षापूर्वी दिले होते़ त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील यांच्या स्वतंत्र शिष्टमंडळाला अर्थमंत्र्यांनी कर प्रश्नी सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते़ गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अर्थमंत्र्यांनी पुन्हा आश्वासन दिले आहे़ यामुळे व्हॅटप्रश्नी शासन कशाप्रकारे हा प्रश्न सोडवून व्यापाऱ्यांना दिलासा देते याकडे लक्ष लागून राहिले आहे़‘व्हॅट’चा प्रश्न सुटणार का?तंबाखूवरील मूल्यवर्धित कर येत्या अर्थसंकल्पातून हटवू, असे आश्वासन अर्थमंत्री मुनगुंटीवार यांनी दिल्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे जयसिंगपुरातील व्यापाऱ्यासह या घटकावर अवलंबून असणाऱ्या कामगार वाहतूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे़ यावेळी तर हा प्रश्न सुटणार का, की तो पुन्हा लांबणीवर पडणार. ‘व्हॅट’मुळे येथील व्यापारी कर्नाटकात हा व्यवसाय स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत़ यामुळे सुमारे दहा हजार लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे़ शाहू महाराजांच्या काळापासून सुरू असलेला हा व्यवसाय शासनाने मोडीत काढू नये़ व्हॅटप्रश्नी निर्णय घेऊन कामगारवर्गाला दिलासा द्यावा़ - कॉ़ रघुनाथ देशिंगे