शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शांतता बिघडवणाऱ्या घटना खपवून घेणार नाही

By admin | Updated: July 31, 2014 00:51 IST

अंगद जाधवर : चंदगडला शांतता समितीची बैठक

चंदगड : वैयक्तिक स्वार्थासाठी जगणे सोडून सर्वांनी समाजासाठी योगदान दिल्यास समाजातील सारेच घटक गुण्या-गोविंदाने नांदतील. त्यामुळे दुर्जनांचा नाश करण्यासाठी सज्जनांचा दबाव वाढला तरच गुंडगिरीला आळा बसेल, दुसऱ्याचे घर जळत असताना मजा बघण्याच्या प्रवृत्तीमुळेच समाजाचे नुकसान होत आहे. काही समाजकंठकांकडून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापुढे तो खपवून घेतला जाणार नसल्याचा निर्धार सर्वांनी करा, असे आवाहन चंदगडचे पोलीस निरीक्षक अंगद जाधवर यांनी केले.चंदगड येथील कै. एस. एन. पाटील सभागृहात आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. शाहू काजू कारखान्याचे अध्यक्ष मोहन परब यांनी स्वागत केले. जाधवर म्हणाले, अन्यायाविरोधात संघटितपणे लढा दिला तरच प्रशासनावर दबाव येतो. अन्याय करणाऱ्यावर प्रशासनाला कारवाई करणे भाग पडते. आमच्या निष्क्रियतेमुळेच २०-२५ लोकांनी तालुक्याला लुटले. प्रत्येकाजवळ एक आत्मशक्ती आहे, त्या जोरावरच स्वाभिमानाची ठिणगी पेटावी, अन्यायाविरोधात पेटून उठा.तालुक्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जाधवर यांनी तालुक्यातील व्यापारी, सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, आदींची बैठक बोलविली होती. भर पावसातही या बैठकीला लोकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी अन्याय झालेल्या अर्जुन पटेल, रेखा पुजारी, विष्णू पाटील, विद्या तावडे यांच्यासह माजी सरपंच अरुण पिळणकर, विजयकुमार दळवी, बाळासाहेब पाटील, राजू व्हटकर, प्रा. एन. एस. पाटील, प्रल्हाद जोशी, आदींनी मनोगत व्यक्त केले.चर्चेत अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, प्रताप सूर्यवंशी, नामदेव सुतार, संजय काणेकर, स्वाभिमानीचे नितीन पाटील, संभाजी कुरणे, आदींनी भाग घेतला.यावेळी सभापती ज्योती पाटील, सरपंच सुजाता सातवणेकर, उपसरपंच सचिन बल्लाळ, काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, खेडूतचे सचिव प्रा. आर. पी. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)