शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

ऊसतोडीसाठी अतिरिक्त रक्कम देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST

हुपरी : ऊसतोडीसाठी अतिरिक्त रक्कम देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करून रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांनी ऊसतोडीबाबत होत असलेल्या अडवणुकीची ...

हुपरी : ऊसतोडीसाठी अतिरिक्त रक्कम देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करून रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांनी ऊसतोडीबाबत होत असलेल्या अडवणुकीची कैफियत निवेदनातून सर्व साखर कारखान्यांसमोर मांडली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल सर्वच कारखान्यांनी घेत, ऊसतोड मजूर व वाहनधारकांना कोणीही ऊसतोडीसाठी आगाऊ पैसे घेऊ नयेत, अन्यथा शेतकऱ्यांची अडवणूक करणारी टोळी व मुकादमांचे काम बंद करण्याचा लेखी आदेश तातडीने बजाविला आहे.

ऊसतोड मजूर, मुकादम अथवा वाहनधारकांकडून अशा प्रकारची अडवणूक होत असल्यास त्यांनी कारखान्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चालू हंगाम गेल्या वर्षीपेक्षा एक महिना आधीच बंद होणार असून, गाळपाला कमी प्रमाणात ऊस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस वेळेत तुटणार नाही अशी भीती मनातून अगोदर काढून टाकावी. उसाला तोड देणे व त्याचे गाळप करणे ही कारखान्याची जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवून ऊस तोडणी कामगार , वाहनचालक यांना खुशाली देणार नाही व देऊ देणार नाही या मताशी ठाम राहावे. कारखाना आपल्या सोबत आहे, असा विश्वास जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला. यावेळी राजू कोल्हापुरे, दत्ता पाटील, किरण वाळके, रामदास पाटील, मोहन खोत, विनायक मेथे, बाळासाहेब शिंदे, आदित्य पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी - रेंदाळ येथील शेतकऱ्यांनी ऊसतोडीबाबत होत असलेल्या अडवणुकीबाबतच्या कैफियतचे निवेदन जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना दिले. यावेळी मोहन खोत, राजू कोल्हापुरे, दत्ता पाटील, किरण वाळके, रामदास पाटील, विनायक मेथे, बाळासाहेब शिंदे, आदित्य पाटील, आदी उपस्थित होते.