शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

रस्त्यावरील आंदोलन सुरूच ठेवणार

By admin | Updated: December 7, 2014 00:56 IST

भाजप, शिवसेना यांचे दायित्व वाढले : टोलविरोधी कृती समितीची आज बैठक

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील टोलसंदर्भात दिलेला निर्णय काहीही असला तरी, लोकशाहीत मिळालेल्या अधिकारांचा वापर करीत रस्त्यावरची लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार येथील सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने केला आहे. टोलविरोधात यापुढे आंदोलन कशा पद्धतीचे असावे, याची व्यूहरचना आखण्यासाठी उद्या, रविवारी दुपारी चार वाजता कृती समितीची बैठक होणार असून, त्यात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, आमचे सरकार सत्तेत आल्यास शहर टोलमुक्त करू, अशी ग्वाही कोल्हापूरकरांना देणारे भाजप-शिवसेना पक्ष राज्यात सत्तेत आल्यामुळे त्यांच्यावरील दायित्व वाढले आहे. न्यायालयात निर्णय काहीही झाला असला, तरी टोलविरोधात रस्त्यावरील लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने केला असल्याने नजीकच्या काळात कोल्हापुरात पुन्हा एकदा टोल विरोधातील आंदोलन पेटणार आहे. भविष्यातील आंदोलन कशा प्रकारचे असावे, याचा विचारविनिमय करण्यासाठी उद्या, रविवारी येथील विठ्ठलमंदिरात कृती समितीची बैठक होत आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे मार्गदर्शन करून पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची या बैठकीत उपस्थिती असणार आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांवर टोलच्या होत असलेल्या बळजबरीबद्दल या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. काल, शुक्रवारी सायंकाळी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांच्याशी हुज्जत घालीत टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी काही काळ गोंधळ घातला होता. कृती समितीच्या निमंत्रकावरच जर अशा पद्धतीने अरेरावी होत असेल, तर सर्वसामान्य वाहनधारकांची काय अवस्था होत असेल, असा सवाल यानिमित्ताने पुढे आला आहे. त्याचे पडसादही या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. शब्द पाळण्याचे नैतिक बंधन महायुतीवर राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी ‘टोलमुक्त कोल्हापूर’ असे गाजर भाजप-शिवसेनेने कोल्हापूरकरांना दाखविले होते. आता त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कोल्हापुरातील टोल रद्द करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शिवसेनेचे सहा, तर भाजपचे दोन असे दहांपैकी आठ आमदार निवडून दिले आहेत. त्यामुळे दिलेला शब्द पाळण्याचे नैतिक बंधन महायुतीवर आले आहे. सध्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर यांनी टोलविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलनात भाग घेतला होता.(प्रतिनिधी)