शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

देशात तालिबानी निर्माण करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:27 IST

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटकांत प्रचंड असंतोष आहे. अशाप्रकारे कामकाज करत सरकार देशात ...

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटकांत प्रचंड असंतोष आहे. अशाप्रकारे कामकाज करत सरकार देशात तालिबानी, नक्षलवादी निर्माण होण्यास प्रवृ़त्त करणार आहे का असा उपरोधिक असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी उपस्थित केला. पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी पदयात्रेने जाऊन ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेणाार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका अनेक घटकांना बसला आहे. यातूनच अस्वस्थता निर्माण होत आहे. अशा मानसिकतेमुळे नक्षलवादी निर्माण होण्याचा धोका असतो. निराशा आणि असंतोषामुळेच गांजा लावण्याची परवानगी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

महापूरग्रस्तांच्या वाढीव भरपाईसाठी आणि नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान मिळावे, यासाठी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढल्यानंतरही सरकारकडून हालचाली नाहीत. १ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजता प्रयाग चिखलीतील दत्त मंदिरात अभिषेक घालून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रा पंचगंगा काठावरून जाईल. यात्रा ५ सप्टेंबरला दुपारी नृसिंहवाडीत पोहचेल. तिथे पंचगंगा नदीच्या संगमाच्या ठिकाणी स्वाभिमानीच्या हजारो कार्यकर्त्यासह जलसमाधी आंदोलन होईल. पत्रकार परिषदेस स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

झाडाला लटकलेला शेतकरी

केंद्र सरकारने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोयाबीनचा क्विंटलमागे चार हजारांनी दर कमी झाला. याचा मोठा आर्थिक फटका राज्यातील सोयाबीन उत्पादकांना बसणार आहे. अशाप्रकारे शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यास शिवारातील झाडाला लटकवून आत्महत्येस प्रवृत्त करायचे की चांगला भाव मिळवून देऊन खुश झालेल्या शेतकऱ्यांना पाहायचे, हे सरकारने ठरवण्याची वेळ आली आहे असे, शेट्टी यांनी सांगितले.