शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

देशात तालिबानी निर्माण करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:27 IST

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटकांत प्रचंड असंतोष आहे. अशाप्रकारे कामकाज करत सरकार देशात ...

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटकांत प्रचंड असंतोष आहे. अशाप्रकारे कामकाज करत सरकार देशात तालिबानी, नक्षलवादी निर्माण होण्यास प्रवृ़त्त करणार आहे का असा उपरोधिक असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी उपस्थित केला. पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी पदयात्रेने जाऊन ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेणाार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका अनेक घटकांना बसला आहे. यातूनच अस्वस्थता निर्माण होत आहे. अशा मानसिकतेमुळे नक्षलवादी निर्माण होण्याचा धोका असतो. निराशा आणि असंतोषामुळेच गांजा लावण्याची परवानगी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

महापूरग्रस्तांच्या वाढीव भरपाईसाठी आणि नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान मिळावे, यासाठी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढल्यानंतरही सरकारकडून हालचाली नाहीत. १ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजता प्रयाग चिखलीतील दत्त मंदिरात अभिषेक घालून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रा पंचगंगा काठावरून जाईल. यात्रा ५ सप्टेंबरला दुपारी नृसिंहवाडीत पोहचेल. तिथे पंचगंगा नदीच्या संगमाच्या ठिकाणी स्वाभिमानीच्या हजारो कार्यकर्त्यासह जलसमाधी आंदोलन होईल. पत्रकार परिषदेस स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

झाडाला लटकलेला शेतकरी

केंद्र सरकारने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोयाबीनचा क्विंटलमागे चार हजारांनी दर कमी झाला. याचा मोठा आर्थिक फटका राज्यातील सोयाबीन उत्पादकांना बसणार आहे. अशाप्रकारे शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यास शिवारातील झाडाला लटकवून आत्महत्येस प्रवृत्त करायचे की चांगला भाव मिळवून देऊन खुश झालेल्या शेतकऱ्यांना पाहायचे, हे सरकारने ठरवण्याची वेळ आली आहे असे, शेट्टी यांनी सांगितले.