शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

देशात तालिबानी निर्माण करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:27 IST

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटकांत प्रचंड असंतोष आहे. अशाप्रकारे कामकाज करत सरकार देशात ...

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्त्या कारभारामुळे शेतकऱ्यांसह सर्वच घटकांत प्रचंड असंतोष आहे. अशाप्रकारे कामकाज करत सरकार देशात तालिबानी, नक्षलवादी निर्माण होण्यास प्रवृ़त्त करणार आहे का असा उपरोधिक असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी उपस्थित केला. पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी पदयात्रेने जाऊन ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह जलसमाधी घेणाार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका अनेक घटकांना बसला आहे. यातूनच अस्वस्थता निर्माण होत आहे. अशा मानसिकतेमुळे नक्षलवादी निर्माण होण्याचा धोका असतो. निराशा आणि असंतोषामुळेच गांजा लावण्याची परवानगी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

महापूरग्रस्तांच्या वाढीव भरपाईसाठी आणि नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजारांचे अनुदान मिळावे, यासाठी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढल्यानंतरही सरकारकडून हालचाली नाहीत. १ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजता प्रयाग चिखलीतील दत्त मंदिरात अभिषेक घालून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रा पंचगंगा काठावरून जाईल. यात्रा ५ सप्टेंबरला दुपारी नृसिंहवाडीत पोहचेल. तिथे पंचगंगा नदीच्या संगमाच्या ठिकाणी स्वाभिमानीच्या हजारो कार्यकर्त्यासह जलसमाधी आंदोलन होईल. पत्रकार परिषदेस स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

झाडाला लटकलेला शेतकरी

केंद्र सरकारने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोयाबीनचा क्विंटलमागे चार हजारांनी दर कमी झाला. याचा मोठा आर्थिक फटका राज्यातील सोयाबीन उत्पादकांना बसणार आहे. अशाप्रकारे शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यास शिवारातील झाडाला लटकवून आत्महत्येस प्रवृत्त करायचे की चांगला भाव मिळवून देऊन खुश झालेल्या शेतकऱ्यांना पाहायचे, हे सरकारने ठरवण्याची वेळ आली आहे असे, शेट्टी यांनी सांगितले.