शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘एमपीएससी’साठी वयोमर्यादा वाढविणार

By admin | Updated: September 13, 2015 00:16 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : राजू शेट्टी यांची मागणी; माहिती जमा करण्याचे आदेश

कोल्हापूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची वयोमर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासन नक्की विचार करील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांना लेखी पत्राद्वारे दिले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व माहिती जमा करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शेट्टी यांनी त्या संदभातील पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. सध्या ही परीक्षेसाठी वयोमर्यादा खुल्या गटातील उमेदवारांसाठी ३३ व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३८ आहे. त्यानुसार खुल्या जागेवरील उमेदवारांची वयोमर्यादा ४० पर्यंत वाढवावी, असे शेट्टी यांचे म्हणणे होते. वयोमर्यादा वाढविण्याच्या या मागणीबद्दल स्पर्धा परीक्षेसंबंधी जाणकार व प्रत्यक्ष उमेदवारांतून मात्र उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. साधारणत: कोणताही तरुण वयाच्या २१ व्या वर्षी पदवीधर होतो. त्यास पुढे चार-पाच वर्षे प्रयत्न करून या परीक्षेत उत्तीर्ण होता येते. त्याने पदवीधर झाल्यानंतर वीस वर्षांनंतर नोकरी लागणार असेल तर हा कालावधी खूप मोठा आहे. चाळिसाव्या वर्षी नोकरी लागल्यावर काम समजून घ्यायलाच त्याला चार-पाच वर्षे लागतात. त्यानंतर पंधरा वर्षांत तो निवृत्त होणार असतो. प्रत्यक्ष सेवेचा कालावधी कमी मिळणार असल्याने त्यातून भ्रष्टाचाराची प्रवृत्ती जास्त वाढीस लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. खुल्या प्रवर्गातील वय ४० केल्यास आरक्षित प्रवर्गाची वयोमर्यादा ४५ होईल. त्यांना तर सेवेची फक्त १५ वर्षेच मिळतील. पोलीस खात्यामध्ये फौजदारास स्वतंत्र पोलीस ठाणे मिळण्यास १५ वर्षे लागतात. याचाही विचार वयोमर्यादा वाढविताना व्हावा. ३३ वय वाढवलेच तर ३५ पर्यंत करता येऊ शकेल. शिवाय जे तरुण या परीक्षेत यशस्वी होतात, ते पहिल्या दोन-तीन प्रयत्नांत होतात आणि जे अनुत्तीर्ण होतात त्यांना वारंवार प्रयत्न करूनही त्यात यश मिळत नाही. त्यामुळे वयोमर्यादा वाढविली म्हणजे तरुणांना त्यामध्ये जास्त संधी मिळेल, ही शक्यताही धूसर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)